टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • किरीट सोमय्या, बिपिन रावत, प्रतीक यादव, मायावती आणि पूनम महाजन
  • Tue , 17 January 2017
  • विनोदनामा टपल्या मायावती Mayawati प्रतीक यादव Prateek Yadav पूनम महाजन Poonam Mahajan बिपिन रावत Bipin Rawat किरीट सोमय्या Kirit Somaiya

१. विधानसभा निवडणुकीत भाजपची मुंबईतील ताकद वाढली आहे, याचे भान आणि ज्ञान शिवसेनेला आहे का? विधानसभा निवडणुकीत मुंबईतील निम्म्यापेक्षा अधिक प्रभागांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत घाटकोपर ते मुलुंड दरम्यान शिवसेनेचे काही आमदार निवडून आले. मात्र या ठिकाणच्या २४ पैकी २१ प्रभागांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे, याचे भान शिवसेनेला असायला हवे. : भाजपचे खासदार किरीट सोमय्या

मुंबईची जनता सगळे काँग्रेसचे खासदार निवडून पाठवते, तेव्हाही महापालिकेत युतीच्या हाती सत्ता सोपवते. वेगवेगळ्या निवडणुकांना लोक वेगवेगळ्या विषयांच्या आधारे मतदान करतात, याचं भान आणि ज्ञान सोमय्यांनी ठेवावं, ही अपेक्षा व्यर्थ आहे. ते सर्वज्ञ आहेत.

……………………………………………………

२. सीमेवरचे काही जवान समस्या मांडण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेत आहेत. याचा परिणाम सीमेवर तैनात शूर जवानांच्या मनोधैर्यावर होतो. जवानांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी इतर पर्याय आहेत. जवान त्यांचा वापर करू शकतात. यातूनही समाधान न झाल्यास जवान थेट माझ्याकडे तक्रार करू शकतात. : लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत

निदान आताच्या प्रकरणात तरी सोशल मीडियाचा मार्गच सगळ्यात प्रभावी असल्याचं दिसून आलेलं आहे. सैन्य शिस्तीवर चालतं, हे खरंच आहे; पण, सैन्य पोटावर चालतं, हे त्याहून अधिक खरं आहे. जवानांचं नीतीधैर्य आणि शारीरिक ताकद कदान्नाने अधिक खचते. रावत किंवा अन्य उच्चाधिकाऱ्यांनी, तक्रार करणाऱ्यांना कारवाईच्या धमक्या देण्याऐवजी, जवानांची अशी हेळसांड करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊ, असं म्हटलं असतं आणि तसं करून दाखवलं असतं, तर सीमेवरच्या जवानांचं नीतीधैर्य अधिक उंचावलं असतं.

……………………………………………………

३. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली सायकल कोणाकडे राहणार, यावरून पिता मुलायम सिंह आणि पुत्र अखिलेश यादव यांच्यात संघर्ष सुरू असताना अखिलेश यांचा सावत्र भाऊ प्रतीक सिंह पाच कोटी रुपये किंमतीची लॅंबोर्गिनी कार घेऊन मौजमजा करताना सोशल मीडियावर झळकला आहे.

त्यात काय विशेष? सायकल जनतेसाठी आणि लँबॉर्गिनी, मर्सिडिझ, बीएमडब्ल्यू, रोल्सरॉइस, रेंजरोव्हर, पजेरो, मेबॅक, जॅग्वार अशा आलिशान गाड्या नेत्यांच्या कुटुंबियांसाठी ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. कार्यकर्त्यांनी वडापाव खाऊन लाठ्या काठ्या झेलायच्या असतात, राडे करायचे असतात; नेत्यांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलांचे उंची सूट आजीवन बुक्ड असतात.

……………………………………………………

४. भारतीय जनता पक्षाने ९० टक्के जनतेला कंगाल केले आहे, तेव्हा या पक्षाने आता निवडणुकीत त्याच्या परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे असा इशारा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी दिला आहे.

तुमच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय काढायचा ताई? सात कोटींवरून सात वर्षांत १३० कोटींवर झेप घेणारा तुमचा भाऊ ९० टक्के माणसांमध्ये गणायचा की, त्याच्याकडे जमा असलेले पैसे ९० टक्के जनतेने वर्गणी काढून दिलेले आहेत, असं समजायचं?

……………………………………………………

५. मागील १५ वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन महापालिकेत सत्ता मिळवली. मात्र या दोन्ही पक्षांनी पुण्याचा कोणत्याही प्रकारे विकास केला नाही. पुणे शहरात पुष्कळ वेळा घड्याळे फिरली, हात फिरले, आता पुणे महापालिकेत कमळ फुलले पाहिजे. : भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन

फुलणार फुलणार, कमळच फुलणार. तुमच्या पक्षासकट सर्व पक्षांनी पुण्याचा असा काही चिखल करून ठेवलाय की, आता त्यात फक्त कमळच फुलू शकतं. आता बिनधास्त तुम्ही खोटी आश्वासनं द्या, पुणेकरांना सवय आहे!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......