करोना व्हायरसच्या काळातील सात पापीलोक आणि त्यांची सात पापकर्मे
संकीर्ण - व्यंगनामा
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 01 April 2020
  • संकीर्ण व्यंगनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

१) ज्यांना करोनाविषयी धड माहिती नव्हती किंवा ज्यांनी करोनाविषयीची माहिती धड समजून घेतली नाही, आणि तरीही विशेष म्हणजे त्यांच्यापैकी कुणीही इतरांना ‘करोना प्रवचन’ दिलं नाही किंवा ‘करोना माहात्म्य’ सांगितलं नाही, अशी माणसं ही खरी पापी जमात आहे. त्यांच्या या दुर्गुणांमुळेच ‘करोना’ने सगळ्यांची अवस्था ‘डरो ना…’ अशी करून टाकलीय. त्येंका रवळनाथ सोडणार नाय, घट्ट धरून ठेवणार हाय!

२) ज्यांनी व्हॉटसअ‍ॅपवर बदाबदा येऊन पडणारा कचरा, करोना व्हायरसच्या काळात, त्यातही लॉकडाऊनच्या काळात नेहमीप्रमाणे इतरांच्या अंगणात ढकलून (‘फॉरवर्ड’) दिला नाही; सोप्या किंवा प्रचलित भाषेत सांगायचं तर ज्यांनी करोनाविषयीच्या फेक न्यूज नेहमीच्याच सवयीनं, आंधळेपणानं, गंमत म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, ऑफिसच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवर पाठवल्या नाहीत, असे लोक खरोखरच धन्य आहेत! लॉकडाऊन संपताच त्यांचा शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार केला जाणार आहे. असं कुठं असतं का राव? कुठं फेडाल ही पापं तुम्ही?

३) ज्या प्रतिभावान कवींनी शक्य असून, पुन्हा पुन्हा सुचून, कोऱ्या कागदांनी हाका घालून, करोनाशी संबंधित सगळ्या शब्दांनी हात जोडून विनंती करून, प्रतिभेच्या हाकांकडे दुर्लक्ष करून, रोजच्या रोज टीव्हीवरील दृश्यं पाहून, वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून, व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील खोट्यानाट्या ‘करोना ष्टोऱ्या’ वाचून, सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्रभर करोनासोबत राहून आणि मरणाच्या केवळ कल्पनेनंच कापरं भरूनही, आतापर्यंत करोनाविषयी एकही कविता लिहिली नाही, ते खरे कपाळकरंटे लोक म्हटले पाहिजेत. या कवीलोकांना एकत्र जमवून रायगडावर नेलं जाणार आहे. आणि तेथील टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जाणार आहे. अशा दळभद्री लोकांच्या कर्मदरिद्रीपणामुळेच आजवर मराठी साहित्याचं अतोनात, अपरिमित नुकसान झालेलं आहे! यांसारख्या लोकांच्या आळशीपणामुळेच आजवर मराठी साहित्य नोबेल पुरस्काराच्या तोडीचं होऊ शकलेलं नाही.

४) जे स्वत: बाहेर बोंबलत फिरले नाहीत, ज्यांनी मित्राला बाईकवर मागे बसवून पोलिसांचे रट्टे त्यालाच पडण्याची सोय केली नाही, जुगाड करून सिगारेटची पाकिटं व दारूच्या बाटल्या मिळवल्या नाहीत आणि आपलं नेहमीचं वेळापत्रक काटेकोरपणे, विनासायास पार पाडलं नाही, अशा अभागी, दुर्दैवी लोकांना लॉकडाऊन संपताच समाजातून बहिष्कृत केलं जाणार आहे, नाहीतर वाळीत टाकलं जाणार आहे. यांच्या अशा या पापकर्मांमुळेच तुमच्या-आमच्या जगण्यातली सगळी ‘एक्साईटमेंट’ निघून गेलेली आहे!

५) ज्यांनी ‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता बेंबीच्या देठापासून आरोळ्या ठोकल्या नाहीत, जिवाच्या आकांताने थाळ्या बडवल्या नाहीत, जोर देऊन देऊन टाळ्या वाजवल्या नाहीत, अध्यक्ष महोदय त्यांचं लॉकडाऊन पुढचे सहा महिने चालूच ठेवलं जाणार आहे. त्यांना अशीच अद्दल घडवण्याची गरज आहे.

६) ज्यांनी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून स्वत:ला कुटुंबासह अक्षरक्ष: आणि शब्दश: घरात कोंडून घेतलं नाही, नजरकैदेत असल्यासारखं स्वत:ला आणि स्वत:च्याच कुटुंबाला वागवलं नाही, ‘मी आणि माझं कुटुंब जगलं पाहिजे, बाकीचे मरोत नाहीतर जगोत’ असं मानलं नाही, स्वत: योग्य ती काळजी घेत इतरांनाही त्यासाठी उद्युक्त केलं, अशा ‘देशद्रोही’ लोकांची रवानगी थेट पाकिस्तानात केली जाणार आहे. विमानसेवा पूर्ववत सुरू होताच त्यांच्या तिकिटांची सोय केली जाणार आहे.

७) जे लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्टीचा वापर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमवर वेगवेगळे तथाकथित दर्जेदार सिनेमे वा बेवसीरिज पाहण्यासाठी, आजवर या ना त्या कारणांनी वाचायची राहून गेलेली पण वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं वाचण्यासाठी न करता, घरातली जाळी-जळमटं काढण्यासाठी, कपाटांची-भिंतींची सापसफाई करण्यासाठी, बायकोला स्वयंपाकात मदत करण्यासाठी, मुलांसोबत खेळण्यासाठी करतात, त्यांना लॉकडाऊन संपताच भरचौकात उभं करून चाबकाचे १०० फटके लगावले जाणार आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......