टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • कॅलेंडरवरील नरेंद्र मोदी, कैलाश सत्यार्थी, अमर्त्य सेन, देवेंद्र फडणवीस आणि नोटेची एक बाजू कोरी आलेला अभागी माणूस
  • Fri , 13 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi कैलाश सत्यार्थी Kailash Satyarthi अमर्त्य सेन Amartya Sen देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

१. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या ठाणे-पुणे-मुंबईतील नेते व पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह धरला असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.

ही बातमी शिवसेनेबरोबरच्या युतीच्या संदर्भात आहे, अशीच तुमची समजूत झाली आहे ना? तसं नाहीये. शिवसेनेशी युती केल्याने फारसं काही बिघडत नाही. या निवडणुका स्वबळावर म्हणजे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीटं देऊन लढवाव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयात केलेल्या उसन्या बळावर लढवू नयेत, असं म्हणायचंय कार्यकर्त्यांना. आता 'इलेक्टोरल मेरिट' कधी असतं का सामान्य, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये? मुख्यमंत्री तरी बिचारे काय सांगणार?

…………………………..…………………………..

२. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी आणि बिमल जलान यांच्यापाठोपाठ आता नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणारे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेत आहेत, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.

अहो सेनसाहेब, देशात सर्वांत मोठे अर्थतज्ज्ञ कोण आहेत? सर्वांत मोठे देशभक्त कोण आहेत? सर्वांत कर्तबगार, धडाडीचे नेते कोण आहेत? सर्वांत विद्वान कोण आहेत? सगळ्यांमध्ये निडर, बेडर कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांचं जर एकच उत्तर असेल, तर मग निर्णय कोण घेणार? नरेंद्र मोदीच घेणार ना?

…………………………..…………………………..

३. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात गांधीजींचा फोटो नसलेल्या दोन हजारांच्या नोटा एका शेतकऱ्याला एटीएममधून मिळाल्या होत्या. यावेळी त्याच राज्यातल्या एका रहिवाशाला एटीएममधून एक बाजू पूर्णपणे कोऱ्या असलेल्या नोटा मिळाल्या आहेत.

अहो, घाईघाईत होतं असं. एवढ्या नोटांच्या प्रिंटिंगमध्ये किरकोळ मिस्टेक तर होणारच ना? उलट ही बेस्टच आयडिया सापडली. एकदम वेगळ्या प्रकारच्या नोटांचं डिझाइन होईल हे. बनावट नोटा बनवणारेही गोंधळात पडतील, एकच बाजू छापायची तर कोणती बाजू छापायची म्हणून. शिवाय नोटा कॅन्सल करण्याची वेळ आली की, तेही काम सोप्पं. दोन बाजू रद्द करायला नकोत, एकच बाजू रद्द करायची. म्हणजे निम्म्या खर्चाची बचत. आहे ना खरी अर्थक्रांती!

…………………………..…………………………..

४. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मानवी तस्करीला म्हणजे देहविक्रयासाठी होणाऱ्या स्त्रियांच्या बेकायदा वाहतुकीला, लहान मुलांच्या वाहतुकीला आळा बसेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. पण, या व्यवसायात आता २००० रुपयांच्या नोटेचा सर्वाधिक वापर होत आहे, अशी खंत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

नोबेल पुरस्कार मिळालेला असला आणि आपल्या अभ्यासाचा विषय असला म्हणून काहीही बोलत सुटतात हे लोक. मानवी तस्करीशी कसलाही संबंध नसलेल्या वस्त्रोद्योग खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी स्पष्टपणे सांगितलंय ना की, नोटाबंदीमुळे मानवी तस्करीला आळा बसलाय! मग बसलाय म्हणजे बसलाय! तुम्ही काय त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहात का?

…………………………..…………………………..

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडरवरची चरखा चालवणाऱ्या महात्मा गांधीजींची छबी उडवून त्याजागी आपल्या छबीची प्रतिष्ठापना केली आहे. खादीच्या आणि चरख्याच्या रूपाने स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी प्रतीकं मिळवून देणाऱ्या राष्ट्रपित्याच्या या गच्छंतिविरोधात खादी ग्रामोद्योग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांधीजींच्याच मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कशाला उगाच वेळ घालवतायत ही मंडळी? तो जुना इतिहास विसरा आता. भारताला खरं स्वातंत्र्य मिळालंय २०१४ साली. आता आपले राष्ट्रपती, राष्ट्रपिता, राष्ट्रदादा, राष्ट्रकाका, राष्ट्रमामा सगळं काही एकच आहेत. लवकरच नोटांवरही नव्या राष्ट्रपित्याची छबी विराजमान होईल पाहा.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......