शशिकला तमिळनाडूच्या ‘नव्या अम्मा’ होतील?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • शशिकला नटराजन
  • Thu , 12 January 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar शशिकला नटराजन Sasikala Nataraja जयललिता Jayalalithaa ऑल अंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम All India Anna Dravida Munnetra Kazhagam

तमिळी जनतेच्या ‘अम्मा’ जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूचं राजकारण रंग बदलत आहे. जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन या अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस बनल्या आहेत. द्रमुक पक्षात सरचिटणीस हे पद महत्त्वाचं असतं. या पदावरच्या व्यक्तीकडे पक्षाची सर्व सूत्रं एकवटलेली असतात.

जयललितांचा करिष्मा मोठा होता. चित्रपट ते राजकारण हा त्यांचा प्रवास रोमहर्षक होता. शिवाय एम. जी. रामचंद्रन यांच्यासारख्या विख्यात नट, नेत्याशी नाळ जोडली गेल्याने त्यांचं महात्म्य जास्त वाढलं होतं. स्वत:च्या कर्तबगारीने जयललिता तमिळी जनतेची ‘अम्मा’ बनल्या. लोकांनी त्यांना मनोभावे स्वीकारलं. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तमिळी जनतेमध्ये उमटलेल्या प्रतिक्रियांतून ते दिसलं होतं.

अम्मानंतर कोण हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. करिष्मा असलेला नेता गेल्यानंतर त्याची पोकळी सहजासहजी भरत नसते हे खरंच, पण त्याची जागा तरी कोण घेणार हा प्रश्न होताच. साऱ्या देशाचं त्याकडे लक्ष लागलं होतं. अम्मांची उत्तराधिकारी म्हणून सर्वांत वरच्या क्रमांकावर शशिकला यांचं नाव घेतलं जात होतं. सगळ्यांच्या नजरा त्या दृष्टीने त्यांच्याकडे लागल्या होत्या.

जयललितांच्या आजारपणात आणि नंतर अंत्ययात्रेत शशिकला पुढे होत्या. सर्व परिस्थितीचा ताबा त्यांनी स्वत:कडे घेतला होता. सबंध देशाने ते टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं होतं. अम्मांची उत्तराधिकारी होण्याची शशिकला यांची इच्छा त्यातून लपून राहिली नव्हती.

आता शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस झाल्या आहेत. अण्णा द्रमूक पक्षाची सर्व सूत्रं त्यांनी स्वत:कडे घेतली आहेत. हे सत्तांतरण आता सहज होताना दिसत असलं तरी पुढेही वातावरण असंच सरळ राहील याची खात्री नाही.

शशिकला यांची पुढची वाटचाल साधी, सोपी नक्कीच नसणार. जयललितांना विरोधक म्हणून करुणानिधी यांच्यासारखा मातब्बर नेता होता. आता त्यांनी नव्वदी ओलांडलीय. त्यांनीच द्रमूक पक्षाची सूत्रं त्यांच्या मुलगा स्टॅलिन याच्या गळ्यात अडकवली आहेत. याचा अर्थ सरळ आहे की, करुणानिधींनी तमिळनाडूच्या राजकारणातून जवळपास सक्रिय निवृत्ती घेतली आहे, त्याचे हे उघड संकेत आहेत. यापुढे करुणानिधी त्यांच्या पक्षात सल्लागाराच्या भूमिकेत दिसतील हे स्पष्ट दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर शशिकला यांचा नव्या अम्मा म्हणून तमिळनाडूमध्ये उदय होत आहे. त्या काही कच्च्या गुरूच्या चेल्या नाहीत. त्यांनी जयललितांचं व्यक्तिमत्त्व आणि राजकारण जवळून पाहिलं आहे. राजकारणातले डाव-पेच आखण्यात त्या जयललितांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय होत्या. पण आता त्यांना स्वत:ला निर्णय घ्यावे लागतील. पक्ष सांभाळावा लागेल. शिवाय पक्षातल्या सत्तास्पर्धेतलाही त्यांना हाताळावे लागेल.

शशिकला सुखासुखी सरचिटणीस झाल्या असल्या तरी त्यांच्या सत्तारोहनाला एका प्रसंगाने गालबोट लावलं आहे. हा प्रसंग त्यांच्या वाटेतले काटे किती काटेरी आहेत याचं सूचन करणारा दिसतो. शशिकला यांना त्यांच्याच पक्षाच्या खासदार दुसऱ्या शशिकला पुष्पा यांनी आव्हान दिलं आहे. पुष्पा या शशिकला यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरायला तयार झाल्या होत्या. त्यांचा अर्ज भरायला त्यांचे पती आणि वकील गेले होते. त्यांना शशिकला यांच्या समर्थकांनी मारहाण केली. त्याच्या बातम्या फार प्रसिद्ध झाल्या नाहीत, पण हे प्रकरण गंभीर आहे. पक्षाच्या सत्तासोपानावर चढतानाच शशिकला यांनी विरोधकांचा आवाज दाबला. हा आवाज दाबूनच त्या पक्षाचा ताबा घेतल्या झाल्या आहेत हे लपून राहिलेलं नाही.

या प्रकरणात पुढे एक गंमत झाली. या प्रकरणात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गुंडांना सोडून दिलं आणि ज्यांनी मार खाल्ला त्यांना अटक केली. त्यातून शशिकला यांची सत्तेवरची पकड दिसून आली. तशी सत्तेचा गैरवापर करण्याची झलकही पाहायला मिळाली.

तमिळ जनता व्यक्तिपूजक जास्त. त्यांना हिरो, नेते डोक्यावर बसून घेणं आवडतंच, पण ते पहिल्यांदा काही सहजासहजी त्यांचं मोठेपण स्वीकारत नाहीत. या अनुभवातून सर्वच तमिळ नेत्यांना जावं लागलं आहे. अगदी अण्णादुराई, करुणानिधी, एम.जी.रामचंद्रन आणि जयललिता यांनीही हे भोगलं आहे. त्यांनी अथक मेहनत करून विविध हिकमती लढवून लोकांच्या मनाला साद घातली. मनं जिकंली आणि नंतर लोकांनी त्यांना स्वीकारलं. अर्थात या अग्निदिव्यातून शशिकला यांनाही जावं लागणारच. तमिळी जनतेच्या विविध फुटपट्ट्यांतून त्या पास झाल्या तरच लोक त्यांना नवी अम्मा म्हणून स्वीकारतील.

शशिकला यांना नवी अम्मा होण्यात पहिला अडथळा आहे तो तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम उर्फ ओपीएस यांचा. ते मुरब्बी नेते आहेत. खुद्द जयलिलता यांनी त्यांच्याकडे तीन वेळा मुख्यमंत्री पद सापेवलं होतं. त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे. ग्रामीण जनतेशी नाळ आहे. ओपीएस शशिकला यांना हायकमांड मानतील काय? त्यांच्या इशाऱ्यावर कारभार करतील काय? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत. उद्या या पक्षात शशिकला विरुद्ध ओपीएस असा सत्तासंघर्ष उफाळला तर पक्षच फुटू शकतो. तसं झालं तर या दोघांचीही ताकद कमी होईल.

अशा पक्षफुटी आणि नेतृत्व स्पर्धेची तमिळनाडूत मोठी परंपरा आहे. जे नेतृत्व स्पर्धेत टिकेल आणि जनतेची नाडी ओळखेल, त्याला तमिळी जनता स्वीकारते. शशिकलांचं काय होणार आणि त्यांच्या वाटचालीचं भवितव्य काय हे येत्या काळात ठरेल.

 

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......