टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • जितेंद्र आव्हाड, नरेंद्र मोदी-नीतीशकुमार, शरद पवार, सुरेश प्रभू
  • Sat , 07 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi नितीश कुमार Nitish Kumar शरद पवार Sharad Pawar सुरेश प्रभू Suresh Prabhu लालूप्रसाद यादव Lalu Prasad Yadav

१. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांना न्यायालयाची नव्हे तर, मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे, अशी कडक टीका केली आहे.

चांगला मानसोपचारतज्ज्ञ सुचवा अण्णांना, असं आपण बंटीभाऊंना म्हणू शकत नाही… त्यांना तरी अजून कुठे सापडलाय तसा.

………………………………

२. महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी सुरत रेल्वे स्थानकाचा प्रशस्त आणि शांत असा चार नंबरचा प्लॅटफॉर्म लग्न समारंभ, पार्टी, कॉर्पोरेट इव्हेंट यांच्या आयोजनासाठी देता येईल, कल्पना रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे मांडली आहे.

लग्न, मुंजी, बारसं, सत्यनारायण, रेल्वे अपघातात मरण पावलेल्यांचं श्राद्ध, बारावं, तेरावं, एखाद्या कोपऱ्यात अंत्यसंस्कार अशा सगळ्याच सोहळ्यांसाठी ही जागा खुली ठेवायला हरकत काय? शिवाय आपले बारमाही सणही आहेतच. सगळ्याच ठिकाणी हा उपक्रम सुरू झाला तर लवकरच गजबजलेले प्लॅटफॉर्मही शांत-निवांत होतील आणि रेल्वेकडे जागाच जागा उपलब्ध होईल अशा उपक्रमांसाठी.

………………………………

३. बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यातील मतभेदाची दरी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना मंचावर न बसवता प्रेक्षकांच्या रांगेत बसवल्याने राष्ट्रीय जनता दलाने नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाने त्वरित मुंबईत प्रतिनिधी पाठवून सरकारमध्ये राहूनही रोज सकाळी उठल्यापासून पहिल्या घासाला खवट काजू खाल्ल्याप्रमाणे सरकारच्या नावाने कडाकडा बोटं कशी मोडत राहायचं, याचा क्रॅश कोर्स करून घ्यावा. हमखास उपयोगी ठरेल. भेटा अथवा लिहा : शिवसेना भवन अथवा मातोश्री, मुंबई.

………………………………

४. मोदी गडी बोलायला फार हुशार आहे. माझे बोट धरून राजकारणात आल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकून मी मेलोच ना. : शरद पवार

आमचे पवारसाहेब मोदींपेक्षा हुशार. मोदींनी धडधडीत खोटं विधान केल्याचं त्यांनी बाणेदार, परखडपणे सांगून टाकलं… ताबडतोब नाही हो, त्या समारंभाला महिना उलटून गेल्यानंतर. तिकडे मोदीही खूष, इकडे अनुयायीही.

………………………………

५. मध्यप्रदेशात काही शेतकऱ्यांना महात्मा गांधींची प्रतिमा नसलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून शेतकऱ्यांना या सदोष नोटा मिळाल्या होत्या. बँकेने या नोटा परत घेतल्या आहेत.

बनावट नव्हे हो, खऱ्याच नोटा आल्या होत्या त्यांच्या हातात. हळूहळू सगळ्याच नोटांवरून बापूजींची प्रतिमा हटवण्याआधी एक ट्रायल तर घ्यायला नको का? फारच गडबड झाली, तर सगळेच राष्ट्रपुरुष घ्या नोटेवर अशी ठिणगी टाकायला कितीसा वेळ लागतो. शिवाय राष्ट्रपुरुष तर इथे दर गल्लीत दोन आहेत.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......