टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सर्वोच्च न्यायालय, दै. सामना, बिपीन रावत, एटीएमसमोरील रांगा आणि राजू शेट्टी
  • Wed , 04 January 2017
  • विनोदनामा टपल्या नोटाबंदी Demonetization सर्वोच्च न्यायालय Supreme Court राजू शेट्टी Raju Shetty बिपीन रावत Bipin Rawat सामना Samna

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या घोषणा म्हणजे जुना ढोकळा गरम करून वाढण्याचा प्रकार आहे. असे शिळे खाणे हे आरोग्यासाठी घातकच असते : 'सामना'च्या अग्रलेखातली टीका

'अन्नछत्रात जेवणाऱ्याने मिरपूड मागायची नसते' ही म्हण शिवसेनेला ठाऊक नाही का? तुम्ही चटणी-भाकरी-झुणक्याच्या गप्पा मारता मारता थेपले, दालबाटी आणि लिट्टीचोखाही चाखू लागला आहात, तिथे शिळ्या-ताज्याची पर्वा करता की काय? आता भस्म्या झाल्यासारखे कायमस्वरूपी 'आ' वासून बसलाच आहात, तर शिळा ढोकळाही गोड मानावाच लागेल.

……………………………………

२. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही देशभरातील बहुतांश एटीएममध्ये पुरेसे पैसे नसल्याने चलनकल्लोळ कायम आहे. त्यातच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारने एटीएम आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारायला सुरुवात करून लोकांच्या मनस्तापात भर टाकली आहे.

अहो, दोन हजार वर्षांनी कदाचित या निर्णयाची गोड फळं आपल्या पुढच्या पिढ्या चाखतील. त्यांच्याकडे पाहून आज हा त्रास सहन करायला काय हरकत आहे? सरकारने सगळीकडे पोलिओच्या डोसप्रमाणे देशभक्तीच्या लशीचे डोस मोफत पाजायला सुरुवात केल्याशिवाय ही कुरकूर थांबणार नाही देशद्रोह्यांची.

……………………………………

३. नोटाबंदीच्या निर्णयाची सर्वाधिक झळ ही शेतकऱ्यांना नव्हे, तर प्रसारमाध्यमांनाच बसली आहे. कारण सगळी प्रसारमाध्यमे ही काळ्या पैशावर चालतात : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी

बाटग्याची बांग मोठी म्हणतात ते उगाच नाही. हे राजापेक्षा राजनिष्ठ. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या शेट्टींनी आता संघटनेच्या नावातला 'स्वाभिमानी' हा शब्द काढून टाकावा, नावही सुटसुटीत होईल आणि शोभूनही दिसेल. कोणाच्याही मालकीच्या नसलेल्या सोशल मीडियाचाही जरा कानोसा घ्या राजूभाऊ, अर्थात कानांचा आकारही कमलदलांसारखा झाला असेल, तर तो ऐकू येणं कठीणच आहे म्हणा!

……………………………………

४. निवडणूक ही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असते आणि त्याचे पालन केलेच पाहिजे. नेत्यांना धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर मत मागता येणार नाही. : सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाचा चार विरुद्ध तीन अशा बहुमताचा निकाल

अरे देवा, आता मतं मागायची कशाच्या आधारावर? कोणताही पक्ष यापेक्षा वेगळ्या आधारावर मतं मागण्याजोगं करतो तरी काय? मतं मागणाऱ्यांचं सोडा; मतदान करणारे तरी काय पाहून मत देतात? मतदारांनी या आधारांवर मतदान करता कामा नये, अशी काही तजवीज करता येणं अशक्यच आहे. मग हा निकाल व्यर्थच आहे.

……………………………………

५. भारत एकाच वेळी पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्ध करण्यास सक्षम आहे. संबंधित राजकीय नेतृत्त्वाकडून देण्यात आलेली कामगिरी कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. : नवे लष्करप्रमुख बिपीन रावत

अरे वा, छप्पन्न इंची क्लबमध्ये नवी भर पडली वाटतं? अन्यांची सेवाज्येष्ठता डावलून यांची निवड का झाली, हे इतक्या लवकर समजून येईल असं वाटलं नव्हतं. आता पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख या तिघांमध्ये शड्डू ठोकण्याची स्पर्धा लागेल. यांच्या तोंडाळ खुमखुमीपायी २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये जवळपास दुप्पट सैनिकांना सीमेवर हौतात्म्य पत्करावं लागलं, याची देशभक्तांना काय पर्वा म्हणा! त्यांना कुठे सीमेवर जाऊन लढायचंय?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......