टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, मुलायम-अखिलेश यादव, अरुण जेटली आणि जयललिता
  • Fri , 30 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi अरुण जेटली Arun Jaitley मुलायमसिंह यादव Mulayam Yadav अखिलेश यादव Akhilesh Yadav जयललिता Jayalalitha

१. नोटाबंदीच्या कठोर निर्णयानंतर निर्माण झालेली आर्थिक दु:स्थिती जवळपास संपुष्टात आल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा. हा दावा करताना त्यांच्या भाषणाचा सूर ‘हत्ती गेले अन शेपूट राहिले’ असा होता.

भले रे शाब्बास, खोटे बोलावे तर ते असे रेटून बोलावे. ‘चहापेक्षा किटली गरम’ यातलाच हा प्रकार आहे. तुमच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी ५० दिवसांचा वायदा केला होता. ते पूर्ण झाले. आजची स्थिती ही ‘शेपूट गेले आणि हत्ती राहिला’ अशी आहे हो!

................................................

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी तालकटोरा स्टेडियममधील टाउन हॉल कार्यक्रमात दुपारी तीन वाजता बोलतील, उद्या सायंकाळी साडेसात किंवा आठ वाजता देशाला उद्देशून भाषण करतील आणि येत्या सोमवारी लखनौत होणाऱ्या भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेळाव्यात भाषण करतील. नंतरच्या दोनपैकी एका भाषणात ते अजून एक धमाका करणार असल्याची चर्चा चालू आहे.

मोदी पंतप्रधान आहेत की, भाषणबाज? रोजच्या रोज भाषण ठोकत बसत असतील तर देशाचा कारभार कधी आणि कसा करणार? नाहीतर म्हणा, ‘द मॅन हू किल्ड इंडियन इकॉनॉमी’, हा लौकिक त्यांनी गेल्या पन्नास दिवसांत मिळवलाच आहे. आता नवीन किताब मिळवण्यासाठी नवा धमाका करावा म्हणावा!

................................................

३. नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष कितीही टीका करत असले, तरी हा निर्णय देशाचे व्यापक हित लक्षात ठेवूनच घेण्यात आला आहे – नरेंद्र मोदी

अगदी बरोबर आहे!  रांगेत उभे राहून लोक मरावेत, यातही देशहित आहे. शेतकऱ्यांनी मातीमोल भावाने त्यांचा भाजीपाल विकावा यातही देशहितच आहे. उद्योगधंद्यांनी कामगारकपात करावी यातही देशहितच आहे. बाजारपेठेतील खरेदी-विक्री मंदावण्यातही देशहितच आहे. उद्या तुम्ही म्हणाल की, तीन वेळा जेवण्याऐवजी लोकांनी एकवेळच जेवावे. कारण त्यातच देशहित आहे.

................................................

४. तामिळनाडू सरकार जयललिता यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मद्रास उच्च न्यायालयाने खरे कारण शोधून काढण्यासाठी त्यांचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात का येऊ नये असा सवाल उपस्थित केला आहे.

जयललिता याच एक गूढ होत्या, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमध्ये काही गूढ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उगाच नाही त्यांच्या मृत्यूच्या बातमीने पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता त्यांचे पार्थिव तपासासाठी बाहेर काढले जाईल आणि ते परत दफन करताना अजून काही लोकांचा मृत्यू होईल.

................................................

५. विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी बुधवारी ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री असलेला त्यांचा मुलगा, अखिलेश यांनीही २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यादवांची ही यादवी तशी अपेक्षेनुसारच आहे, त्यात अनपेक्षित असे काही नाही. अखिलेशला पुन्हा सत्तेत यायचे आहे आणि त्याच्या वडलांना त्याला सत्तेतून घालवायचे आहे. त्यामुळे हे असे होणे अटळ आहे.

................................................

६. सरकार भाजपचे किंवा नरेंद्र मोदींचे नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. धार्मिक तेढ वाढविण्याचा दृढ निश्चय करून सत्तेत आलेले हे लोक ‘सब का साथ, सब का विकास’ ही निव्वळ धूळफेक करीत आहेत. या धर्मभेदी लोकांपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी बंधुतेचा विचार नेटाने पुढे न्यायला हवा. – समाजवादी नेते भाई वैद्य

भाई, तुमचे सगळे बरोबर आहे. पण तुम्ही इतकी वर्षं बंधुतेचा विचार पुढे नेण्याचे काम करत होतात, त्यापासून समाजाचे किती रक्षण झाले हो? उलट तुम्ही अल्पसंख्य होत गेलात आणि समाज आहे तिथेच राहिला. मोदींच्या राज्यात पहा, समाज कसा पुढे जातोय. मग सरकार कुणाचे का असेना, त्याने काय फरक पडतोय!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......