‘मेरा नाम जोकर’ आणि ‘गोपी’ पडले, मधल्या मध्ये ‘जॉनी मेरा नाम’ चालला!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Sat , 27 July 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar उद्धव ठाकरे Udhhav Thackeray राज ठाकरे Raj Thackeray शिवसेना Shivsena भाजप BJP मनसे MNS

सत्तरच्या दशकातले तीन मोठे सितारे राज कपूर, दिलीपकुमार आणि देव आनंद म्हणजे त्यावेळच्या सिंगल स्क्रीनचे बादशहाच! तिघांचे स्वतंत्र व एकत्रित फॅनही होते.

आज या तिघांची आठवण यायचं कारण पूर्णत: वेगळं आहे. आज ना त्यांच्यापैकी कुणाची जयंती वा पुण्यतिथी, ना कसलं स्मरण, ना रेकॉर्ड. पण हे तिघं आणि त्यांचे हे विशिष्ट सिनेमे आठवायचं कारण सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण.

‘मेरा नाम जोकर’, ‘गोपी’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ हे सिनेमे एकाच वेळी वा आसपास लागले. यापैकी ‘मेरा नाम जोकर’ची खूप हवा होती. राज कपूरचा ड्रीम प्रोजेक्ट, रशियन तरुणी, चार तासांचा सिनेमा, दोन इंटरवल वगैरे वगैरे. गाणी गाजत होतीच. त्यामानाने ‘गोपी’ची प्रसिद्धी भव्यदिव्य न राहता नेहमीप्रमाणे दिलीपकुमार हे खणखणीत नाणं ही मोठीच जमेची बाजू. या दोघांच्या तुलनेत देव आनंदचा ‘जॉनी मेरा नाम’ म्हणजे कुपोषित बालकच. त्यामुळे तो स्पर्धेत धरलाच नव्हता कुणी!

पण झाली अशी गडबड की, ‘मेरा नाम जोकर’ पडला (की पाडला ही चर्चा होती). त्याच्या पडेल पाठीवर ‘गोपी’नं मांड ठोकली. तरीही या दोन्ही सिनेमांची तिकिटं न मिळालेले ‘जॉनी मेरा नाम’कडे वळले! आणि काही दिवसांतच चित्र पूर्ण पालटलं! विजय आनंदच्या दिग्दर्शनाची कमाल! देव आनंद, हेमामालिनी, कल्याणजी आनंदजींचं टायटल ट्रॅकसह गाजलेलं संगीत आणि या सर्वांवर चेरी म्हणजे पद्मा खन्नाचा ‘हुस्न के लाखो रंग’ हा कॅब्रे! या कॅब्रेनं तर पडदाच जाळला! आजही इतका कामुक कॅब्रे दुसरा नाही! आणि हा तर सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला!!

या अशा कामगिरींना पुढे ‘डार्क हॉर्स’ म्हणायची पद्धत आली. प्रचलित झाली.

आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. तर सध्या देशात आणि पर्यायानं महाराष्ट्रातही भाजपचं वारं आहे. वादळी वारंच म्हणाना. ते इट क्रिकेट, स्लिप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेटसारखं इट भाजप, स्लिप भाजप, ड्रिंक भाजप अशीच स्थिती आहे.

.............................................................................................................................................

सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवं भान देणाऱ्या मराठीतल्या या पहिल्याच पुस्तकाचं मन:पूर्वक स्वागत - प्रा. संजय तांबट, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4986/Social-Media?fbclid=IwAR1Fa3_2jO7gy5f-tvrrrGJupZCxtsVVHc_uhdIS608hrd2ufcEtxCP3nK0

.............................................................................................................................................

महाराष्ट्रात तसे चार प्रमुख पक्ष- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना. याशिवाय मनसे, सपा, बसपा, शेकाप, नव्याने उदयाला आलेले एमआयएम, वंचित बहुजन आघाडी इ. इ. परंतु प्रमुख चारच. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांची युती. आघाडी आणि युतीत कुठली तरी एक आरपीआय हल्ली असतेच.

२०१४च्या मोदी लाटेनंतरही महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं १५ वर्षांच्या कारभारानंतर बरीच बरी कामगिरी केली. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि विरोधी पक्षांची पडझड सुरू झाली. महाराष्ट्रात तर विरोधी पक्षनेतेच भाजपवासी झाले आणि काँग्रेसला दणका बसला. मुळात विखे पाटलांना पक्षांतरं नवी नाहीत. त्यांचं म्हणजे मी जिथं आहे तो पक्ष! आणि लोकही ते निमूट मान्य करतात. २०१९च्या लोकसभा निवडणूक निकालांनंतर तर टांगा पलटी, घोडे फरार अशी स्थिती झाली. दिल्लीत राहुल गांधींनी राजीनाम्याचा न बदललेला निर्णय ना पक्षाला पुढे घेऊन गेला, ना मागे. देशातला सर्वांत जुना व देशव्यापी पक्ष सध्या निर्नायकी व विनोदाचा विषय झाला आहे. इतर पक्षांचीही साधारण तीच स्थिती. महाराष्ट्र काँग्रेस इंदिरा गांधींच्या काळापासून जी परावलंबी आहे, ती तर आता पाटीपुरती तरी राहते की नाही, अशा स्थितीत आहे.

या अशा निराशाजनक वातावरणात एकटे शरद पवार काय ते लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये फिरताहेत. बाकी सर्वत्र शांतता. काँग्रेसवाले प्रकाश आंबेडकरांचा शर्ट धरून आहेत, तर राष्ट्रवादीला मनसेसाठी आघाडीत पायवाट करून द्यायचीय. पैकी लोकसभेला वंचितनं मतं घेतल्यानं ते तेजीत आहेत, तर मनसेची घडी अजून काही बसत नाही.

अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला धक्का बसला. सचिन अहिर म्हणजे वरळीचे आव्हाड! साहेबांची माया तशीच, वाव तसाच नि वाढही तशीच. आव्हाड वृत्तवाहिन्यांवर वगैरे आरडाओरड करतात, विधानसभा पायऱ्यांवर लक्षवेधी कृती करतात, घोषणा देतात. सचिन अहिरांचा आवाजच येत नाही. वरळीत दहीहंडी असो की गणपती, सेलिब्रेटींची रांग लागते. पण अहिर पती-पत्नी सायलेंट मोडवर असल्यासारखे.

आता आपण पुन्हा सिनेमाच्या मुद्द्याकडे जाऊया. तर सध्या भाजपकडे प्रवेशासाठी इतकी गर्दी वाढलीय की, मध्यंतरी दादा पाटलांनी की महाजनांनी आवाहन केलं की, आता काहींनी सेनेत प्रवेश करा! नाहीतर भाजपला सर्व तिकिटं बाहेरून आलेल्यांनाच द्यावी लागतील! याचा अर्थ भाजप प्रवेश इच्छुकांनी आता अकरावी प्रवेशाप्रमाणे पसंती क्रमांक दोनवर शिवसेना असं लिहावं! भाजपमध्ये सरप्लस होणारे सेनेत पाठवले जाणार! सचिन आहेर हे पहिले सरप्लस तर नव्हेत ना? तसंही वरळी ते भायखळा या भागात भाजप कमी सेना जास्त... काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी, किंचित कम्युनिस्ट. तर अशा प्रकारे शिवसेनेला आता भाजप सरप्लसांसाठी जागा ठेवावी लागणार!

ज्यांना भाजपच्या पहिल्या (मेरा नाम जोकर)-दुसऱ्या (गोपी)ची तिकिटे मिळणार नाहीत, त्यांनी वेळ न दवडता शिवसेनेच्या (जॉनी मेरा नाम)ची तिकिटं काढून टाकावीत! नंतर तीही शिल्लक राहणार नाहीत!

याचाच दुसरा अर्थ असा, पालघर लोकसभेला भाजपनं सेनेला मतदारसंघ तर दिलाच, वर उमेदवार दिला. तो निवडून आणला! तसंच आता भाजप शिवसेनेत कुणी कधी जायचं, कुठून निवडणूक लढवायची हेही ठरवणार! सेनेला ‘हो’ म्हणण्याशिवाय पर्याय नाही. कारण सेनेनं बाणा दाखवत एखादा सरप्लस नाकारला तर भाजप त्याला काँग्रेससह कुठेही पाठवून निवडून आणवू शकतं!

पूर्वी हे शरद पवारांबद्दल बोललं जायचं की, विरोधी पक्षनेतासुद्धा पवारच ठरवतात.

तर या सर्व निवडणूक पूर्व राजकारणात सेनेचा भाव परभारे वाढत चाललाय. आता शिवसेना हीच खऱ्या अर्थानं भाजपची ‘बी टीम’ झालीय. भाजपसाठी सेनेच्या जागाही त्यांच्याच असल्यासारख्या. फक्त युतीधर्म पाळावा म्हणून ते शिवसेनेचे आमदार थेट घेत नाहीत. पण भाजपनं राष्ट्रीय स्तरावर राज्यसभेत जो विलयाचा नवा मंत्र आणलाय, तो महाराष्ट्रात वापरणारच नाहीत असं नाही.

शिवसेनेला भविष्यात ‘अवघा (भगवा) रंग एकचि झाला!’ हे म्हणावं लागणारच नाही, याची खात्री कोण देईल?

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......