टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • विराट कोहली, सिद्दरमय्या, स्मार्टफोनवरील महिला, नोटबंदी आणि स्टिव्ह फोर्ब्स
  • Tue , 27 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नोटाबंदी Demonetisation नरेंद्र मोदी Narendra Modi विराट कोहली Virat Kohli सिद्दरमय्या Siddaramaiah

१. एका सर्वेक्षणानुसार आज भारतातल्या अर्ध्याधिक लोकांकडे स्मार्टफोन आहेत. भारतीय पुरुषांच्या तुलनेत महिलाच सर्वाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवतात. महिला ८० टक्के वेळ फेसबुकवर घालवतात, असंही निदर्शनास आलं आहे.

सतत बायकांच्या हातात असतो, म्हणूनच या फोनला 'स्मार्ट' फोन म्हणतात, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झालेलं नाही. शिवाय, फेसबुकच्या नावाचा आणि त्यावरच्या स्त्रियांच्या उपस्थितीचा काहीही अन्योन्य संबंध नाही, हेही स्पष्ट करायला हवं होतं.

……………………………………………

२. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर अर्धा टक्क्यानं खाली येईल, असं भाकीत खुद्द रिझर्व्ह बॅंकेनं केलं असताना ‘फोर्ब्स’ मासिकाचे मुख्य संपादक स्टिव्ह फोर्ब्स यांनी या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली. सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण न करता हा निर्णय घेऊन केंद्र सरकारनं एक प्रकारे लोकांच्या संपत्तीवरच डल्ला मारला आहे, असं ते म्हणाले.

जगातल्या, देशातल्या धनाढ्य, पॉवरफुल व्यक्तींच्या याद्या छापणाऱ्या मासिकाच्या मालक-संपादकपदी एक समाजवादी, फेक्युलर, काँग्रेसी, देशद्रोही (अर्रर्र, हे दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत, नाही का?) व्यक्ती असावी, हे आश्चर्यच! त्यांना भारताची शंभरेक वर्षानंतर निश्चितपणे होणारी नेत्रदीपक प्रगती आतापासूनच साहवत नाहीये असं दिसतंय.

……………………………………………

३. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा 'फोर्ब्ज इंडिया'च्या यादीनुसार देशातील सर्वांत लोकप्रिय व्यक्ती ठरला आहे. विराटने लोकप्रियतेत सलमान खान आणि शाहरुख खान या फिल्मी सिताऱ्यांबरोबर क्रिकेट जगतातील महेंद्रसिंग धोनी आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर या दोन मातब्बर खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.

विराटचं कौतुक आहेच. पण, बातमी वाचल्यानंतर सलमान, शाहरुख, धोनी आणि तेंडुलकर यांचंच अधिक कौतुक वाटतं. सलमान आणि शाहरुख विराटच्या दुप्पट वयाचे आहेत, त्यांनी पदार्पण केलं, त्या आसपास विराटचा जन्म झाला असावा. धोनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि सचिन तर निवृत्त होऊनही बराच काळ लोटला आहे. तरीही ताज्या दमाच्या विराटच्या पिढीलाही या महानुभावांशीच तुलना करावी लागते आहे, हे त्यांचंच यश म्हणावं लागेल ना?

……………………………………………

४. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवसांनी सर्वसामान्यांचा त्रास कमी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ठासून सांगत असले तरी, येणारं नवं वर्षही सर्वसामान्यांसाठी नोटा‘तंगी’चं असणार आहे. ३० डिसेंबरनंतरही बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा कायम राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या म्हणण्याचा नेहमीप्रमाणे विपर्यास करतो आहे बिकाऊ मीडिया. त्रास कमी होईल, असं त्यांनी म्हटलेलं नाहीचै. रांगा लावाव्या लागतील, आपलेच पैसे चोरासारखे भरावे आणि काढावे लागतील, ठिकठिकाणी रोख रकमेवाचून हात आखडेल- हे सगळं होतच राहील आता आणखी दोनेक वर्षं… नव्या वर्षात त्रास कमी होईल तो सवयीमुळे. ५० दिवसांत कशाचीही सवय लागू शकते ना निमूटपणे आज्ञापालन करणाऱ्यांना!

……………………………………………

५. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी मैसूरमध्ये सोबत असलेल्या एका व्यक्तीकडून बुटाच्या लेस बांधून घेतल्यानं वादाचं मोहोळ उठलं आहे. मुख्यमंत्र्यांची चरणसेवा करणारा माणूस कोणी सरकारी कर्मचारी नाही, तर सिद्दरामय्या यांचा नातेवाईक आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयानं दिलं आहे.

सत्ताधीशांचे बूट चाटणाऱ्यांची देशात कुठेही कमतरता नसताना ते बांधून देणाऱ्या माणसावरून गदारोळ करायचं काहीच कारण नाही. अनेक कार्यकर्तेही आपला जन्म नेत्यांच्या चपला उचलण्यासाठीच झालेला आहे, असं समजून वागत असतात; इथं तर मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक आहे. इतक्या पॉवरफुल नातेवाईकासाठी हे काम त्याने भक्तिभावानं केलं, तर त्यात काय बिघडलं?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......