टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • टॉयलेट लोकेटर, गाड्या, अर्णब गोस्वामी, हरविंदर सिंग आणि अनुराग ठाकूर
  • Sat , 24 December 2016
  • विनोदनामा टपल्या टॉयलेट लोकेटर Toilet Locator अर्णब गोस्वामी Arnab Goswami हरविंदर सिंग Harvinder Singh अनुराग ठाकूर Anurag Thakur

१. मोदी सरकारकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत आता सार्वजनिक ठिकाणी शौचालय शोधण्यासाठी टॉयलेट लोकेटर आणण्यात येणार आहे. देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांना विशेषत: महिलांना शौचालय शोधताना येणाऱ्या अडचणी येतात. हीच गरज लक्षात घेऊन ‘गुगल टॉयलट लोकेटर’ सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

'असतील तर दिसतील' ही म्हण मोदी सरकारला ठाऊक असेल काय? पेटीएमवर व्यवहार सुरू झाले की भ्रष्टाचार जसा आपोआप गायब होत नाही, त्याचप्रमाणे गुगलच्या टॉयलेट लोकेटरमध्ये टॉयलेट तयार होत नाहीत; ती बांधावी लागतात. तशी ती बांधली जात असतील, तर टॉयलेट लोकेटरचा उपयोग. अन्यथा, घाईच्या वेळी टॉयलेट लोकेटरबरोबर पाच मिनिटं झटापट केल्यावर जवळपास एकही टॉयलेट नाही, हीच माहिती मिळणार असेल, तर लोक संतापून फोन फेकून देतील टॉयलेटमध्ये!

………………………………………………….

२. रोज नवनवे नियम घोषित करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने आता वाहनांच्या वाढत्या संख्येला ‘लगाम’ घालण्याचे संकेत दिले आहेत. नवीन गाड्यांच्या नोंदणीसाठी पार्किंगच्या जागेचा पुरावा सादर करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. पार्किंग असेल, तरच नवी गाडी मिळेल.

भाड्याने राहणाऱ्या लोकांनी कसला पुरावा द्यायचा? पार्किंगसकट जागा भाड्याने घेतली आहे, असं दाखवून गाडी घेतली आणि ११ महिन्यांनी बिनापार्किंगच्या जागेत स्थलांतर केलं तर काय? आज सगळ्या प्रमुख शहरांमधले रस्ते आधीच बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांनी व्यापले आहेत, बिल्डर लॉबी वाट्टेल त्या किंमतीला पार्किंग स्पेस विकण्याचे अधिकार राखण्यात यशस्वी ठरलेली आहे. आता हे वरातीमागून घोडे काय उपयोगाचे?

………………………………………………….

३. नोटाबंदीमुळे बॅंकिंग क्षेत्राचे रोजचे ३,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. : अखिल भारतीय बॅंक अधिकारी संघटनेचे सरचिटणीस हरविंदर सिंग

अहो, आजचं वास्तव नुकसान पाहू नका, उदयाचा काल्पनिक कॅशलेस, भ्रष्टाचारलेस भारत पाहा. तेवढी किंमत मोजायलाच हवी. मुळात नोटाबंदीच्या विरोधात कोणी कसलंही मत नोंदवता कामा नये, असा अंतर्गत आदेश निघाला असताना हे गृहस्थ असं देशद्रोही विधान करतातच कसे?

………………………………………………….

४. मी राष्ट्रवादी असल्याचा मला अभिमान आहे. भारतीय माध्यमे राष्ट्रवाद आणि देशद्रोहामध्ये अडकली आहेत. देशद्रोह्यांना माध्यमांमध्ये कोणतीही जागा नाही. मी भारत-पाकिस्तानच्या मुद्यावर तटस्थ राहू शकत नाही. मला कोणी विकत घेऊ शकत नाही. : अर्णब गोस्वामी

कोणी 'फुकटच गेला' असेल, तर त्याला विकत घेण्याची गरज काय? या सद्गृहस्थांची (आपण सभ्यता पाळावी म्हणून हा शब्दप्रयोग अन्यथा यांच्यासाठी तो भारतरत्नइतकाच मोठा सन्मान आहे) एकंदर भाषा, आपला राष्ट्रवाद तेवढा जाज्वल्य आणि आपला विरोधक तो थेट देशद्रोही, ही मांडणी पाहता यांची 'रिपब्लिक' वाहिनी 'कमलदला'वरच विराजमान होणार आहे, असं दिसतंय.

………………………………………………….

५. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सध्या ज्या संकाटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहता सध्याचे वातावरण हे क्रिकेटपटूंसाठी हिताचे नाही. : ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर

ठाकूर यांच्यासारख्या राजकारण्यांच्या छत्रछायेला क्रिकेटपटू वंचित झाले की त्यांच्यावर आभाळ कोसळेल, यात शंका नाही. क्रिकेटपटूंच्या माध्यमातून या राजकारण्यांनी पैसानिर्मितीची एक अजस्त्र यंत्रणा उभी केली आहे आणि विविध पातळ्यांवर क्रिकेटपटूंनाही लाभधारक बनवून आपल्या अंकित करून घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयामुळे राजकारण्यांची पकड सैल झाली तर क्रिकेटपटूंना भविष्यात खरोखरच निव्वळ क्रिकेट खेळून गुजराण करावी लागू शकते… दिवस वाईट आहे खरं.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......