टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 23 December 2016
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi पेमेंट ऑफ वेजेस Payment Of Wages काँग्रेस Congress कर्नाटक Karnataka सहारा Sahara

१. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात चलनाचा तुटवडा असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाने 'पेमेंट ऑफ वेजेस' अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. या अध्यादेशामुळे १०हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना चेक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून म्हणजे थेट खात्यातच पगार द्यावा लागणार आहे.

पगार थेट खात्यात जमा होणार हा चांगलाच निर्णय आहे! आता तो गरजेला वापरण्यासाठी योग्य वेळी कर्मचाऱ्यांच्या हातात रोख रक्कमरूपात मिळेल, यासाठीही काही विधेयक मंजूर करा. असंख्य सेवासुविधा आजही कॅशलेस झालेल्या नाहीत आणि होणार नाहीत. शिवाय बँकांमध्ये रोख रक्कम नसल्याने त्या पैसे देऊ शकत नसतील, तर त्यांना दंडही भरावा लागत नाही.

………………………………………………….

२. काँग्रेस पक्षाने आझाद मैदानातल्या पक्ष कार्यालयाला चहा पुरवणाऱ्या चहावाल्याचे दोन लाख रुपये थकवल्यामुळे त्याने या कार्यालयाला उधारीवर चहा देणे बंद केले आहे.

पक्षात एवढी मरगळ का आहे, याचं गुपित हे आहे होय? एका चहावाल्याने आपलं दुकान बंद केलं म्हणून सगळ्याच चहावाल्यांवर असा राग काढणं बरं नव्हे. शिवाय, सार्वजनिक जीवनात तरतरी आणण्यासाठी निदान कार्यालयात तरी चहाच पिणं श्रेयस्कर असतं. तोही बंद केलात तर राहुलजींवरच्या जबाबदाऱ्यांत आणखी एक भर पडेल.

………………………………………………….

३. काँग्रेसचे युवा नेते आता कुठे भाषण करायला शिकत आहेत, त्यांना आता कुठे काही गोष्टी कळायला लागल्या आहेत. त्यांनी बोलायला सुरूवात केल्यापासून माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही. ते बोलले नसते तर देशात मोठा भूकंप झाला असता. या भूकंपातून पुढची १० वर्षे सावरेल की नाही, अशी भीती मला वाटत होती. मात्र, त्यांनी आपले मौन सोडले हे चांगले झाले. त्यामुळे देशात भूकंप होणार नाही, हे तरी स्पष्ट झाले. : नरेंद्र मोदी

एकेकाळी काँग्रेसजनांनी पराकोटीचा मोदीविरोध करून त्यांचं नाव गुजरातबाहेरच्या राज्याराज्यात पोहोचवलं होतं आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. ती समारंभपूर्वक भाजपने स्वीकारलेली दिसते आहे. अत्यंत फुटकळ अशा आरोपांचा प्रतिवाद करायला आणि जनता कशी मोदींच्याच बरोबर आहे हे सांगायला फौजा बाहेर पडल्या आहेत. झटपट सर्वेक्षणं होतायत. राहुलची एवढी टिंगल ही त्यांची जाहिरातबाजीच आहे. शिवाय, सहाराच्या डायरीतल्या नोंदींचा नि:संदिग्ध इन्कार सोडून बाकी सगळं बोलणं सुरू आहे, हे जनतेला दिसत नसेल का?

………………………………………………….

४. कर्नाटक सरकारकडून लवकरच राज्यातील खासगी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना १०० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कायद्यात आवश्यक असलेल्या सुधारणांचा मसुदा राज्याच्या कामगार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्द्यानुसार कर्नाटकमधील माहिती व तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान ही क्षेत्रे वगळता अन्य खासगी औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कन्नडिगांसाठी १०० टक्के जागा आरक्षित असतील.

कोण आहे रे तिकडे? राजे जागे झाले असतील तर त्यांना सांगा, आता महाराष्ट्रात भवितव्य, नेते आणि कार्यकर्ते यांच्यापैकी काहीच उरलेलं नसलं तर कर्नाटकात नवनिर्माणाची सुवर्णसंधी आहे. दहा दिवसांत कन्नड बोलायला शिकवणाऱ्या पुस्तकांची ऑर्डर द्यायची की आपली 'खळ्ळ फट्याक'चीच वैश्विक भाषा घेऊन जायचं तिकडे?

………………………………………………….

५. सहारा डायरीमध्ये १००पेक्षा राजकारण्यांचा उल्लेख आहे. भाजप, काँग्रेस, जदयु, राजद, सपा, एनसीपी, जेएमएम, जेव्हीएम, टिएमसी, बीजेडी, बीकेयू, शिवसेना आणि एलजेपीसह १८ राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे या डायरीत आहेत.

अवघ्या भारतवर्षाला मुठ्ठी में करायला निघालेले एक थोर उद्योगपती ऑफ द रेकॉर्ड म्हणाले होते की, 'सब अपनी ही दुकाने है…' त्याची आठवण झाली ना? आपण सगळे सर्वसामान्य भारतीय यांची गिऱ्हाईकं आहोत, हे लिहिण्याची काही गरजही नाही. आपली तर तेवढीही किंमत नाही. 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......