टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मोहन भागवत आणि मनोहर पर्रीकर, पंकजा मुंडे
  • Thu , 22 December 2016
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi मोहन भागवत Mohan Bhagwat मनोहर पर्रीकर Manohar Parrikar पंकजा मुंडे Pankaja Munde

१. नोटाबंदीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील म्हणजे वाराणसीतील हस्तोद्योगाला मोठा फटका बसला असून सुप्रसिद्ध बनारसी साडीच्या व्यवसायातील कारागिरांवर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. या कामगारांना २५० रुपये रोज मिळत असे. नोटाबंदीमुळे रोख रक्कम बाजारातून नाहीशी झाल्यामुळे त्यांच्या हाताला काम उरलेलं नाही.

यांच्यातले बहुतेक कारागीर मुस्लिम आहेत. त्यांनी फक्त ५० दिवस उपाशी राहून पंतप्रधानांना साथ दिली तर त्यांची देशभक्ती आपोआपच सिद्ध होईल. शिवाय पंतप्रधान यानंतर जेव्हा केव्हा रजत शर्मांच्या 'फिक्सिंग की अदालत' कार्यक्रमात जातील, तेव्हा तेव्हा डोळे मिचकावून कठोर स्वरात 'मैने बनारस में कर दिखाया' असं सांगून योग्य संदेश चाहत्यांपर्यंत पोहोचवतीलच.

……………………………………

२. सहारा उद्योगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४० कोटी रुपये दिल्याच्या शिळ्याच कढीला राहुल गांधी यांनी नव्याने ऊत आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गंगेसमान पवित्र असून त्यांचे संपूर्ण जीवन हे प्रामाणिकपणाचा एक आदर्शच आहे, असा प्रतिवाद भाजपने केला आहे. राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले पार्ट टाईम राजकीय नेते आहेत, असंही भाजपने म्हटलं आहे.

राहुल गांधींनी डोंगर पोखरून उंदीर काढला, हे खरंच. पण, धोतरात उंदीर शिरल्यासारखी पळापळ का सुरू झाली आहे भाजपची? मोदींना गंगेची उपमा देताना गंगेची विद्यमान स्थिती तरी आठवायची होती! 'राम तेरी गंगा मैली' तरी (गंभीरपणे, धबधबादृष्यासाठी नव्हे!) आठवायचा होता. फुलटाइम आणि गंभीर मानल्या जाणाऱ्यांनी देशाची जी काही स्थिती केली आहे दीड महिन्यात, ते पाहता पार्टटाइम नेताच परवडला म्हणायचा!

……………………………………

3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल नाही. सरकारचे निर्णय नागपूरच्या संघ कार्यालयातून होत नाहीत. संघाला हिंदुत्त्वाधारित सशक्त राष्ट्राची निर्मिती करायची आहे. त्यासाठी समाजात योग्य ते बदल करण्यासाठी आणि देशाचे भवितव्य योग्य नेत्यांच्या हातात देण्यासाठी संघ प्रयत्नशील असतो. आम्ही देशाला प्रामाणिकपणे काम करणारा पंतप्रधान दिला आहे. त्यामुळे, सरकारच्या कामकाजात दखल देण्याची संघाला गरज नाही. :  सरसंघचालक मोहन भागवत

आता 'बिट्वीन द लाइन्स' वाचल्यावर कळणारा मथितार्थ येणेप्रमाणे :- संघाच्या रिमोट कंट्रोलने पंतप्रधान नेमला जातो. त्यानंतर बाकी सगळा कारभार हा संघनियुक्त पंतप्रधान संघशाखेत ऐकलेल्या बौद्धिकांतून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर हाकू शकतो. त्यात संघाचा काही 'हात' नसतो. सरकारचं कामकाजच संघनियुक्त पंप्रंच्या हातात असताना वेगळी दखल देण्याची गरजच काय? भले शाबास!

……………………………………

४. १९६८ मध्ये वॉटरगेट प्रकरणावर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना सल्ला देणाऱ्या एका मराठी संपादकांच्या अग्रलेखाची खिल्ली उडवून संरक्षणमंत्री पर्रीकर गोव्यात नुकतेच एका सभेत म्हणाले की, ‘काहींना त्यांच्या मर्यादा माहिती नसतात. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्यासाठी माझ्याकडे काही चांगले सल्ले आहेत. विवस्त्र व्हा आणि नाचा. आणखी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळते.’

यात पर्रीकर काय चुकीचं बोलले? काहींना आपल्या मर्यादा माहिती नसतात, ते वायफळ बडबड करतात, हे दोन जिल्ह्यांच्या राज्याचाच कारभार हाकण्याच्या 'कौशल्या'च्या बळावर केंद्रात पोहोचलेल्या पर्रीकरांकडे पाहूनच कळत नाही का? शिवाय त्यांनी आपल्याच अनुभवातून विवस्त्र नाचल्यावर चांगली प्रसिद्धी मिळते, हे सिद्धही केलं आहे. त्यांना हा सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच आहे.

……………………………………

५. महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची चिक्की घोटाळ्यातून क्लीनचीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटाळ्याची फाईल बंद केली आहे. तसंच यासंबंधीचा अहवालही गृहविभागाला पाठवण्यात आला आहे.

क्रिकेटमध्ये एखाद्या टीमने आपल्याच एखाद्या भिडूला अंपायरिंगला उभं केलं की, तो सरळसरळ आउट असलेल्या आपल्या संघभिडूला आपल्या अधिकारात 'नॉटआऊट' घोषित करतो आणि मग बाकीचे त्या अंपायरला चिकीखाऊ म्हणतात, हे लाचलुचपत विभागाला आणि त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवणाऱ्यांना ठाऊक असेल काय?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......