पुरुषांचा ‘बँड’ वाजवणाऱ्या बायका!
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • या लेखातील सर्व छायाचित्रं ही बीबीसी, डीएनए आणि हिंदू या वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळावरून घेतलेली आहेत. त्यांचे सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत
  • Tue , 20 December 2016
  • नारी गुंजन सरगम बँड Nari Gunjan Sargam Band बिहार Bihar दानापूर Danapur महादलित महिला Mahadalit women

बँड पथक हे नेहमी पुरुषांचं असतं. त्यामुळे ‘त्याचा बँड वाजला!’ हे विधानही पुरुषांविषयीच केलं जातं. बिहारमधील महादलित समाजाच्या १२ महिलांनी मात्र पुरुषांचा हा बँड दोन्ही पद्धतीनं वाजवायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचं बँड पथक आपली कला सादर करतं आणि त्यांच्या गावातील बायकोला बडवणाऱ्या पुरुषांचाही प्रसंगी ‘बँड’ही वाजवतं. त्याचं नाव आहे, ‘नारी गुंजन सरगम बँड’!

याची सुरुवात झाली ती २०१३मध्ये. बिहारमधील महादलित समाजाच्या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा वर्गीस यांना ही कल्पना सुचली. त्यांनी बिहारची राजधानी, पटनापासून जवळ असलेल्या दानापूर गावातील १२ शेतमजूर महिलांना बँडचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

शेतमजुरी करणाऱ्या महिलांचा या पथकात समावेश असल्यानं शेतातील व घरातील काम संपल्यावर त्या रोज एक तास बँड वाजवण्याचा सराव करत. सलग सहा महिने सराव केल्यानंतर त्यांचं पथक तयार झालं.

महादलित समाजाच्या महिलांचा बँड पथकापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. घरातील व गावातील पुरुषांनी तर त्यांना विरोध केलाच, पण महिलांनाही विरोध केला. एका महिलेला तर तिच्या नवऱ्यानं बँड पथकात सामील झाल्यामुळे चांगलंच झोडपलं. पण तरीही ती पथकात सामील झाली.

या पथकाला अनेकदा धमक्याही दिल्या गेल्या आहेत. पण या ‘बँड वाजवणाऱ्या’ बायका काही बधल्या नाहीत!

या बँडमधील सर्वच महिला निरक्षर आणि शेतमजूर आहेत, पण त्या बँडवर सहजपणे वेगवेगळी गाणी वाजवतात.

त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नव्या बदलाबरोबर आर्थिक कमाईही वाढली आहे. बँड वाजवून काय पोट भरणार आहे का, असं विचारत बायकोला बडवणाऱ्या नवऱ्याला जेव्हा त्याच्या बायकोनं बँड पथकातील कामाचे पहिले ५०० रुपये दिले, तेव्हा तोही हैराण झाला.

विशेष म्हणजे या बायका पुरुषांचाही बँड वाजवतात! म्हणजे त्या गावातील महिलांच्या मदतीलाही धावून जातात. जो नवरा आपल्या बायकोला मारतो, त्याला धमकावयाला हे पथक कमी करत नाही. कधी कधी त्याची धुलाईही करतात.

उत्तर प्रदेशातील ‘गुलाबी गँग’ आता सर्वांना माहीत झाली आहे. तिच्यावर चित्रपट आला, पुस्तकं आलं. लेखांना तर गणतीच नाही.  ‘नारी गुंजन सरगम बँड’ही दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होवो. असाच पुरुषांचा बँड वाजवत राहो.

या पथकातील महिला या २५ ते ६० या वयोगटातील आहेत. त्यांचं पथक लग्न, स्वागत समारंभ आणि इतर कार्यक्रमांची निमंत्रणं स्वीकारतं. त्यांनी आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या कार्यक्रमापासून पंचतारांकित हॉटेल्स, शिक्षणसंस्था यांच्यासाठीही कार्यक्रम केले आहेत. आता त्यांना राज्याबाहेरूनही कार्यक्रमाची निमंत्रणं येऊ लागली आहेत.

editor@aksharnama.com

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Wed , 21 December 2016

An Interesting Photo Feature!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......