टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अर्णब गोस्वामी, रावसाहेब दानवे, चंद्राबाबू नायडू, पेटीएम आणि धसई गाव
  • Mon , 19 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अर्णब गोस्वामी Arnab Goswami कॅशलेस वसाहेब दानवे Raosaheb Danve नोटबंदी Demonetisation चंद्राबाबू नायडू Chandrababu Naiduपेटीएम Paytm

१. ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीचे माजी मुख्य संपादक अर्णब गोस्वामी लवकरच ‘रिपब्लिक’ नावाने नव्या इनिंग्जला सुरुवात करणार आहेत. ‘माझ्या नव्या वाहिनीचे नाव ‘रिपब्लिक’ असेल. मी यासाठी भारतीयांकडे पाठिंब्याचे आवाहन करतो,’ असे गोस्वामी यांनी म्हटले आहे.

अर्णबला सत्ताधाऱ्यांची पाठराखण करता करता त्यांच्या सवयीही जडलेल्या दिसतायत. असंही तो सगळं काही (अंघोळ, भांग पाडणे, पेन्सिल नाचवणे वगैरे सगळं काही) देशाच्या वतीनेच करायचा. म्हणूनच आपल्या व्यवसायाला सगळ्या भारतीयांनी 'पाठिंबा' द्यावा, असं आवाहन केलंय त्याने. अरे बाबा, तू ज्या भाषेत बोलतोस टीव्हीवर ती भाषा (इंग्रजी आणि उद्दामपणाची) या देशात फारच थोड्यांना अवगत आहे. बाकीच्यांसाठी ध्वनीप्रदूषणात भर, यापलीकडे काय अर्थ असणार तुझ्या वाहिनीचा?

……………………………………….

२. नोटाबंदी सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी राज्यातली वाइन शॉप्स आणि तिथले मद्यपी खरेदीदार कॅशलेस व्यवहार करू लागले. वाइन शॉपवर कार्ड स्वाईप करून व्यवहार होऊ लागले. दारूची तहान कॅशलेस व्यवहारांच्या तहानेत परिवर्तित झाली. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मात्र अशी निकड, अशी तहान दिसत नाही. ही मानसिकता असेल, तर देशात डिजिटल क्रांती कशी होणार? : आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

सर्व सरकारी अधिकाऱ्यांना ऑन ड्युटी पेयपानाची मुभा दिली किंवा त्यांच्यावर ती सक्तीच केली, तर देश लवकर कॅशलेस होईल काय? नाहीतरी सरकारचे बरेच निर्णय कसल्या तरी तारेत घेतल्यासारखेच वाटतात सर्वसामान्य माणसांना. निदान आता तसं थेट म्हणायची सोय तरी होईल.

……………………………………….

३. नोटांबदीमुळे लोकांना सहन करावा लागणारा त्रास कमी करण्यासाठी मोदी सरकारने पेटीएमची मदत घेतली. नोटाबंदीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी पेटीएमच्या जाहिरातींमध्ये मोदींचे छायाचिदेखील झळकले. मात्र आता या अॅपद्वारे पेमेंट करताना अनेक अडचणी येत आहेत. इंटरनेटच्या सहाय्याने पेटीएम सेवेचा वापर करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कॅशलेस इंडियासोबतच डिजिटल इंडियाचादेखील फज्जा उडताना दिसत आहे.

कोण आहे रे तिकडे? या बातमीदाराला पाकिस्तानला धाडा. राजाचा लाडका पोपट मेला आहे, असं म्हणायचं नसतं; तो शवासनात गेला आहे, असं सांगायचं असतं, नाहीतर आपल्यावर शवासनात जाण्याची वेळ येऊ शकते, इतका साधा नियम माहिती नाहीये त्याला!

……………………………………….

४. मतदानाच्या आधी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचे स्वागत करा. निवडणुकीची आधीची रात्र खूप महत्त्वाची असते. तुम्हाला अचानक लक्ष्मीदर्शन होईल. अशा अचानक आलेल्या लक्ष्मीचे स्वागत करा. ती परत करू नका. पण मतदानाचा निर्णय पक्का करा. :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

निवडणुकीआधी लक्ष्मी येते घरा, तिचे स्वागत करा, हाच निवडणुका जिंकण्याचा मंत्र खरा. पण, दानवेसाहेब, हे जरा माननीय मुख्यमंत्रीसाहेबांना सांगा, जमल्यास पंतप्रधानांना सांगा; त्यांची अशी गैरसमजूत झालीये की, त्यांनी काळा पैसा खणून काढण्याच्या नावाखाली लोकांवर लादलेली नोटाबंदीची गैरसोयच लोकांना खूप भावली आहे आणि तिला प्रतिसाद म्हणून निवडणुकांमध्ये भाजपला बऱ्यापैकी यश मिळतं आहे.

……………………………………….

५. मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिले रोखरहित गाव असल्याचा गवगवा सरकारी पातळीवरून करण्यात आला असला, तरी या गावातील बहुतांश व्यवहार अजूनही रोखीनेच होत असल्याचे दिसते. रोखरहित व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत व्यवस्थेचा अभाव, दुबळी बँकिंग यंत्रणा तसेच नागरिकांमधील या व्यवहारांबाबतची अनास्था यामुळे ‘कॅशलेस धसई’ फक्त प्रचार आणि घोषणांतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील ग्रामस्थ दैनंदिन खर्चासाठी दररोज लाखो रुपये गावातील बँकेतून काढत असून, डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा आग्रह धरणाऱ्यांची संख्यादेखील सुमारे पाच ते दहा टक्केच असल्याचे दिसते आहे.

एकदा सरकारने आणि परिवारातल्या संघटनांनी एखादी गोष्ट अशी अशी आहे, असं सांगितल्यानंतर वर्तमानपत्राच्या वार्ताहरांनी तिची खातरजमा करण्याचा अगोचरपणा करावाच कशाला? सरकारच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध बोलणं किंवा त्यातले दोष दाखवणं हा द्वेष आणि देशद्रोह आहे, याची कल्पना नाही का या वर्तमानपत्राला?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......