नाव- वरदा, अर्थ- गुलाब, कारनामा- विध्वंसक
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • या लेखातील सर्व छायाचित्रे चेन्नई व परिसरातील आहेत
  • Wed , 14 December 2016
  • वरदा Wardha चक्रीवादळ Cyclone चेन्नई Chennai तामिळनाडू Tamil Nadu आंध्रप्रदेश Andhra pradesh

सोमवारी वरदा हे वादळ उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर थडकले. रविवारी संध्याकाळी ते चेन्नईपासून ३३० किलोमीटरवर होते, पण सोमावरी दुपारी ते चेन्नईमध्ये पोहचले, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. त्यानुसार सीमावर्ती भागात रेस्क्यूसाठी नेव्ही आर्म्ड फोर्सेसला तैनात करण्यात आले आहे.

या चक्रीवादळाने या दोन्ही राज्यांत बरेच नुकसान केले आहे. कालपर्यंत त्यात दहा लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पुढे आल्या आहेत. या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाला आहे. दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात अवकाळी पाऊस पडला. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी १४० किलोमीटर प्रती तास होता.

हे वादळ चेन्नईपासून नेल्लोरपर्यंत म्हणजे ९० किलोमीटरपर्यंत पसरले.

सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे या भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळाने अनेक झाडे मुळापासून उखडली गेली आहेत. घरांवरील पत्रे, जाहिरातींचे फलक, विजेचे खांब कोसळ्याने वाहतूक ठप्प झाली, तसेच स्थावर मालमत्ता म्हणजे वाहने, इमारती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

किनारपट्टीजवळच्या गावांतून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुढील ४८ तास मच्छिमारांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे सरकारने सांगितले आहे. उपनगरी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. विमानतळ बंद करण्यात आला. आज रेल्वे, रस्ते आणि विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

१९९४नंतर चेन्नई किनारपट्टीवर थडकलेले हे पहिलेच भीषण वादळ होय. या वादळाचा वादळाचा केंद्रबिंदू चेन्नई शहरापासून २० किलोमीटरवर असल्याचे सांगितले जाते.

या वादळाने आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतला आहे. मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. खबरदारी म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

या वादळाचे ‘वरदा’ हे नाव पाकिस्तानने ठेवले. भारताच्या सागरी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वादळांना नाव देताना भारतीय हवामान खातं उपखंडातील आठ देशांशी संपर्क करते. सर्वांच्या संमतीने नाव ठरवले जाते. ‘वरदा’ हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘गुलाब’ असा होतो. National Hurricane Center (NHC) आणि The World Meteorological Organization (WMO) या दोन संस्था १९५३ पासून वादळ, चक्रीवादळ यांची नावे ठरवतात. NHCचे कार्यालय अमेरिकेतील मियामीमध्ये आहे, तर WMOचे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात आहे. WMO ही संयुक्त राष्ट्र संघाची एक शाखा आहे. पण उत्तर हिंद महासागरामध्ये उठणाऱ्या चक्रीवादळांना कुठलेच नाव ठेवले गेले नव्हते. जातीय विविधता असणाऱ्या प्रदेशात बरीच सावधगिरी आणि निष्पक्षता पाळण्याची गरज असल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून बरीच काळजी घ्यावी लागली.

२००४मध्ये WMOचे मंडळ रद्द करून त्या त्या देशांना आपापल्या प्रदेशात उठणाऱ्या वादळांना नाव देण्याची मुभा दिली गेली. त्यानंतर भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, मालदिव, ओमान, म्यानमार, श्रीलंका, तायलंड या आठ देशांनी एक बैठक घेतली. त्यात त्यांनी ६४ नावांची यादी तयार केली. प्रत्येक देशात येणाऱ्या वादळांसाठी आठ नावे सुचवली गेली. ही यादी प्रत्येक देशाच्या वर्मानुक्रमानुसार आहे. जून २०१४मध्ये आलेल्या वादळाचे ‘नानुक’ असे नाव म्यानमारने ठेवले होते. सदस्य देशही नाव सूचवू शकतात. २०१३मध्ये भारताच्या दक्षिण-पूर्व तटावर आलेल्या वादळाचे ‘पायलॉन’ हे नाव थायलंडने ठेवले होते. याच भागात आलेल्या आणखी एका वादळाचे नाव नीलोफर हे नाव पाकिस्तानने ठेवले होते. या सूचीत भारताने ‘मेघ’, ‘सागर’, ‘वायू’ अशी साधी नावे सुचवली आहेत. २०१३मध्ये श्रीलंकेकडून ठेवल्या गेलेल्या ‘महासेन’ या नावावरून श्रीलंकन राष्ट्रवादी मंडळींनी आक्षेप घेतल्याने ते बदलून ‘वियारु’ असे केले गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार राजा महासेन यांनी श्रीलंकेत शांती आणि समृद्धी प्रस्थापित केली होती. त्यामुळे त्यांचं नाव एखाद्या वादळाला देणं चुकीचं आहे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......