टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राम मंदिर स्टेशन, लाडूंची तयारी, तुकारामा मुंढे आणि राहुल गांधी
  • Wed , 14 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi राम मंदिर रेल्वे स्टेशन Ram Mandir railway station भाजप BJP लाडू Laddoo नोटबंदी Demonetisation

१. उद्योगपतींनी कर्जे बुडवल्यामुळे देशातील बँका डबघाईला आल्या आहेत. या बँकांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी मोदींना सामान्य जनतेचे पैसे सहा ते सात महिन्यांसाठी बँकांमध्येच अडकवून ठेवायचे आहेत. त्यामुळेच नोटाबंदीचा निर्णय घेऊन सामान्य जनतेचा पैसा बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप

अरे देवा, हाच तो बहुचर्चित, बहुप्रतीक्षित भूकंप होता की काय? मग कठीण आहे. अहो, ही माहिती आता देशातल्या पहिलीत जाणाऱ्या मुलांनाही तोंडपाठ झालेली आहे. बँकांची थकबाकी, उदयोगपतींनी बुडवलेली कर्जं वगैरे सगळे आकडे तोंडपाठ बोलून दाखवतील ती मुलं. तुम्ही किमान दुसऱ्या इयत्तेतलं तरी काही तरी बोला!

………………………….

२. डॉक्टरांच्या अनाकलनीय अक्षरामुळे केमिस्टला औषधयोजना न समजल्याने जगभरात दरवर्षी एकूण सात हजार लोक मरण पावतात. डॉक्टरांचं खराब हस्ताक्षर न समजल्याने केमिस्ट चुकीचं औषध देतात आणि पेशंट दगावतो.

सगळ्या गोष्टींकडे इतक्या नकारात्मक पद्धतीने पाहणं बरोबर नाही. डॉक्टरांच्या खराब अक्षरामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचत असतील, त्याचं काय? डॉक्टरांनी काय प्रिस्क्रिप्शन दिलंय, हे केमिस्टला न कळल्याने त्याच्याकडून चुकून योग्य औषध दिलं गेल्याचं प्रमाण अधिक असेल ना!!!

………………………….

३. नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षाच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्यांची तंबी. मुंढे यांचे कौतुक कराल तर वाईट परिणाम होतील, असा इशारा.

बरोबर आहे. सर्वपक्षीय नेते आणि नगरसेवकांचे गैरधंदे, बेकायदा बांधकामं, विविध प्रकारची 'दुकानं' वाचवण्यासाठी तिकडे नेते मुंढेंना हटवण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत असताना या नगरसेवकांनी मुंढे यांचं कौतुक करणं हा एकप्रकारचा पक्षद्रोहच आहे. आपल्या पक्षाची धोरणं काय आहेत, याचंही भान ठेवायचं नाही म्हणजे टू मचच!

………………………….

४. पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी व गोरेगाव स्थानकांदरम्यान ओशिवरा येथे होऊ घातलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव ‘राम मंदिर’ ठेवण्यावरून वादाचे मोहोळ उठलेले असताना राम मंदिराच्या आवारातले शिवमंदिर राम मंदिराच्या किमान आठ शतकांपूर्वीचे असल्याचे पुरावे समोर आल्याने आता स्थानकाला ते नाव द्यावे, अशी अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.

या परिसरात या दोन्ही मंदिरांपेक्षा प्राचीन दगड नक्कीच सापडतील. स्टेशनला त्यांच्यावरून काही नाव देता आलं तर, त्याने असली नामकरणं करणाऱ्यांचाही 'गौरव' होऊन जाईल.

………………………….

५. बँका आणि एटीएमच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना दिल्ली भाजपतर्फे लाडू वाटले जाणार. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्येक कुटुंबाला लाडवांचे वाटप केले जाणार.

हे तहानलाडू किंवा भूकलाडू असतील का? त्यांची अधिक गरज असेल ना नागरिकांना? पक्षाच्या देशभरातल्या नेत्या-कार्यकर्त्यांकडे रोज सापडत असलेल्या नव्या नोटांमधल्या बेहिशोबी रोख रकमेचं एटीएमबाहेर वाटप करण्याचीही आयडिया बेस्ट राहील. त्यात संतापलेल्या नागरिकांकडून रिटर्न गिफ्ट म्हणून धम्मकलाडू मिळण्याचा धोका नाही!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......