टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राम मंदिर स्टेशन, लाडूंची तयारी, तुकारामा मुंढे आणि राहुल गांधी
  • Wed , 14 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi राम मंदिर रेल्वे स्टेशन Ram Mandir railway station भाजप BJP लाडू Laddoo नोटबंदी Demonetisation

१. उद्योगपतींनी कर्जे बुडवल्यामुळे देशातील बँका डबघाईला आल्या आहेत. या बँकांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी मोदींना सामान्य जनतेचे पैसे सहा ते सात महिन्यांसाठी बँकांमध्येच अडकवून ठेवायचे आहेत. त्यामुळेच नोटाबंदीचा निर्णय घेऊन सामान्य जनतेचा पैसा बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप

अरे देवा, हाच तो बहुचर्चित, बहुप्रतीक्षित भूकंप होता की काय? मग कठीण आहे. अहो, ही माहिती आता देशातल्या पहिलीत जाणाऱ्या मुलांनाही तोंडपाठ झालेली आहे. बँकांची थकबाकी, उदयोगपतींनी बुडवलेली कर्जं वगैरे सगळे आकडे तोंडपाठ बोलून दाखवतील ती मुलं. तुम्ही किमान दुसऱ्या इयत्तेतलं तरी काही तरी बोला!

………………………….

२. डॉक्टरांच्या अनाकलनीय अक्षरामुळे केमिस्टला औषधयोजना न समजल्याने जगभरात दरवर्षी एकूण सात हजार लोक मरण पावतात. डॉक्टरांचं खराब हस्ताक्षर न समजल्याने केमिस्ट चुकीचं औषध देतात आणि पेशंट दगावतो.

सगळ्या गोष्टींकडे इतक्या नकारात्मक पद्धतीने पाहणं बरोबर नाही. डॉक्टरांच्या खराब अक्षरामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचत असतील, त्याचं काय? डॉक्टरांनी काय प्रिस्क्रिप्शन दिलंय, हे केमिस्टला न कळल्याने त्याच्याकडून चुकून योग्य औषध दिलं गेल्याचं प्रमाण अधिक असेल ना!!!

………………………….

३. नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षाच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्यांची तंबी. मुंढे यांचे कौतुक कराल तर वाईट परिणाम होतील, असा इशारा.

बरोबर आहे. सर्वपक्षीय नेते आणि नगरसेवकांचे गैरधंदे, बेकायदा बांधकामं, विविध प्रकारची 'दुकानं' वाचवण्यासाठी तिकडे नेते मुंढेंना हटवण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत असताना या नगरसेवकांनी मुंढे यांचं कौतुक करणं हा एकप्रकारचा पक्षद्रोहच आहे. आपल्या पक्षाची धोरणं काय आहेत, याचंही भान ठेवायचं नाही म्हणजे टू मचच!

………………………….

४. पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी व गोरेगाव स्थानकांदरम्यान ओशिवरा येथे होऊ घातलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव ‘राम मंदिर’ ठेवण्यावरून वादाचे मोहोळ उठलेले असताना राम मंदिराच्या आवारातले शिवमंदिर राम मंदिराच्या किमान आठ शतकांपूर्वीचे असल्याचे पुरावे समोर आल्याने आता स्थानकाला ते नाव द्यावे, अशी अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.

या परिसरात या दोन्ही मंदिरांपेक्षा प्राचीन दगड नक्कीच सापडतील. स्टेशनला त्यांच्यावरून काही नाव देता आलं तर, त्याने असली नामकरणं करणाऱ्यांचाही 'गौरव' होऊन जाईल.

………………………….

५. बँका आणि एटीएमच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना दिल्ली भाजपतर्फे लाडू वाटले जाणार. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्येक कुटुंबाला लाडवांचे वाटप केले जाणार.

हे तहानलाडू किंवा भूकलाडू असतील का? त्यांची अधिक गरज असेल ना नागरिकांना? पक्षाच्या देशभरातल्या नेत्या-कार्यकर्त्यांकडे रोज सापडत असलेल्या नव्या नोटांमधल्या बेहिशोबी रोख रकमेचं एटीएमबाहेर वाटप करण्याचीही आयडिया बेस्ट राहील. त्यात संतापलेल्या नागरिकांकडून रिटर्न गिफ्ट म्हणून धम्मकलाडू मिळण्याचा धोका नाही!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......