टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ‘रईस’चे पोस्टर, मोहन प्रकाश, केजरीवाल-मोदी आणि तिरंगा
  • Tue , 13 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal राष्ट्रगीत National anthem रईस Raees

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे धोरण राबवून भारतातील पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्याचवेळी शाहरुख खानने राज ठाकरे यांची भेट घेऊन माहिरा खान या पाकिस्तानी नायिकेची भूमिका असलेल्या 'रईस' या त्याच्या आगामी चित्रपटाला मनसेकडून विरोध होऊ नये, असे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच वेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही सेन्सॉरसंमत सिनेमाला सरकार संरक्षण पुरवेल, त्यासाठी सक्तीची देणगी देण्याची गरज नाही, असं सांगितलं आहे.

यांच्यातल्या कोणालाही पाकिस्तानी कलावंतांचं काहीही पडलेलं नाही, सगळ्यांना पाकिस्तानच्या काठीने आपल्याच धोतरात शिरलेले विंचू मारायचे आहेत, हे किती सहज स्पष्ट होतं नाही? 'रईस'वाले तिन्हीकडे ऐच्छिक 'मार्केटिंग फी' देतील, यात शंका नाही. ती न दिल्यामुळे बिचाऱ्या गौरी शिंदेच्या 'डियर जिंदगी'मध्ये अली जफर हा पाकिस्तानी कलावंत असूनही कोणी त्याविरोधात आंदोलनं करून त्याची पब्लिसिटी केली नाही.

…………………….

२. नोटाबंदीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच पश्चिम बंगाल, तमिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील पुण्यात मोठय़ा प्रमाणावर जमिनींची खरेदी कशी केली, त्यांच्या आमदार, खासदारांच्या घरात कोटय़वधींच्या नव्या नोटा कशा आढळतात, याचे उत्तर काळे धन शोधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम द्यावे, असे आव्हान अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पुण्यात दिले आहे. 

तुम्ही फक्त त्यांची नावं सांगा, पॅन नंबर सांगा, अकाउंट नंबर सांगा. नंबर दोन फकीर आणि नंबर दोन सचोटीवीर अमितभाई शाह हे लगेच सगळ्या संबंधित माणसांच्या अकाउंटवरचे व्यवहार सीएमार्फत तपासून बघतील आणि क्लीनचिट देऊन टाकतील. नोटाबंदीविरोधात काही बोलू-लिहू नका, असा आदेश काढणारी सीए संघटनाही निष्पक्षपणे चौकशी करेल, यात शंका बाळगू नका.

…………………….

३. चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने चेन्नईत तिघांना मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्यांमध्ये एका तरुणाचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. जवळपास २० जणांनी या तिघांना मारहाण केली.

सिनेमागृहात राष्ट्रगीताला कोण उभं आहे, कोण बसलंय, याच्या भोचक उठाठेवी करणाऱ्या अनाम राष्ट्रवीरांनी सिनेमा सुरू असताना आपसांत बडबडणं, फोनवर बडबडून कुणाला तरी पकवणं, दर पाच मिनिटांनी मोबाइल स्क्रीन प्रज्वलित करून आपण फेसबुकवर नसल्याने कोणी आत्महत्या केल्यात काय, याची माहिती घेणं, आपली पोरं गँगवेमध्ये हुंदडायला सोडून देणं, ही राष्ट्रकार्यं करणं थांबवलं तर ते अधिक श्रेयस्कर होईल. हे करून सिनेमाच्या आस्वादात अडथळा आणणाऱ्या सिनेकंटकांना बसवा ना राव जरब; ही अधिक गुन्हेगारी स्वरूपाची कृत्यं आहेत.

…………………….

४. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय राजकारण्यांच्या यादीत केजरीवाल दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या अडीच कोटींहून अधिक आहे.

या दोघांना अनुक्रमे ट्विटरइंडियाचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान घोषित करण्याची काही व्यवस्था आहे का? हवं तर मोदींना आकाशवाणीचेही पंतप्रधान जाहीर करता येईल. म्हणजे, हे दोघे 'आपल्या राज्यात' सुखनैव एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसतील आणि या संवादसाधनांच्या पलीकडे जो आम भारत वसला आहे, त्याला निदान शांततेचं तरी सुख लाभेल.

…………………….

५. केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर अचानक बंदी आणल्याचा सर्वाधिक परिणाम मॅरेज इंडस्ट्रीवर झाला आहे. अनेक शहरांमधल्या मंगल कार्यालयांमध्ये होणारे विवाहसोहळे पुढे ढकलले गेले आहेत. विवाहसोहळ्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना शेकडो कोटींचा फटका बसला आहे.

त्यांनी एक झटपट संघटना बनवून लवकरात लवकर सत्ताधारी 'परिवारा'त शिरावं… तिथे कौटुंबिक लग्नसोहळ्यांनाही तोटा नाही आणि नव्या नोटांनाही तोटा नाही. कितीही साधेपणाने केली, तरी काहीशे कोटींच्या खाली लग्नंच होत नाहीत त्यांच्यात. सगळ्यांनी मिळून त्या लग्नांची कंत्राटं घेतली तरी तोटा भरून निघेल सगळा. शिवाय रेड वगैरे पडण्याचा धोका नाही, तो फायदा वेगळाच!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......