टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • औषधे, हिवाळी अधिवेशन, राहुल गांधी, वेंकय्या नायडू आणि रामदेव बाबा
  • Sat , 10 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या बाबा रामदेव Baba Ramdev राहुल गांधी Rahul Gandhi वेंकय्या नायडू Venkaiah Naidu

१. मूल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना ‘देव निर्माता आहे’ हे शिकवण्याचा प्रकार संविधानाच्या तरतुदीचे उल्लंघन करणारा ठरतो काय, अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाने मनुष्यबळ विकास खात्याला केली आहे. सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील न्यायवैद्यक औषध केंद्राचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी याविषयी सविस्तर अहवाल सादर करून माहितीच्या अधिकाराअंतर्गत थेट पंतप्रधान कार्यालयास विचारणा केली होती.

यावर विद्यमान मनुष्यबळ विकास खात्याकडून अपेक्षित दिलगिरी येणेप्रमाणे : साक्षात पंतप्रधान महोदय भूतलावर असताना सर्व गोष्टींचा निर्माता परमेश्वर आहे, असे सांगण्याची अक्षम्य आगळीक काही शाळांमध्ये सुरू आहे. त्याची गंभीरपणे दखल घेऊन ताबडतोब योग्य ती दुरुस्ती करून घेतली जाईल, याची खात्री बाळगून एकडाव माफी करावी.

…………………………………….

२. सनातन संस्थेत साधकांना छिन्नमनस्कता व इतर मानसिक रोगावरची औषधे दिली जात होती : पानसरे-दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या पत्नीच्या जबानीतून खुलासा

यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? डोक्यावर परिणाम झालेला नसेल आणि व्यक्तिमत्त्व दुभंग-त्रिभंगलेलं नसेल, तर कोण जाईल अशा आश्रमांमध्ये?

…………………………………….

३. पतंजली आयुर्वेद कंपनीचा उत्तराधिकारी कोणी व्यापारी असणार नाही. संन्यासी पुरुष आणि महिलाच हा विशाल कारभार सांभाळतील : रामदेव बाबा

हेही विधान पतंजली कंपनीच्या एकंदर जाहिरातबाजीला साजेसंच आहे. आधी मुळात संन्यासी ही कल्पनाच त्यांनी मोडीत काढलेली आहे. घटकाभर त्यांना संन्यासी मानलं तरी ते कंपनीच्या माध्यमातून व्यापारच करणार आहेत, म्हणजे फारफारतर व्यापारी संन्यासी म्हणता येईल त्यांना. काही दिवसांनी बाबा ‘संसारी संन्यासी’ अशीही एक वेगळी ब्रँच काढतील बहुतेक.

…………………………………….

४. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवरून सुरू असलेल्या गोंधळात सत्ताधारी आणि विरोधकांत कशाच्याही बाबतीत एकमत झालं नाही. मात्र, सोमवारी ईद ए मिलादची सुटी घ्यायची का, या विषयावर मात्र 'सुटी घ्यायची' यावर शून्य मिनिटांत सर्वपक्षीय एकमत झालं.

सदनाची पातळी इतकी शाळकरी असल्यावर तिथे फार गंभीर चर्चांची अपेक्षा ठेवण्यात मतलब काय? सदन सुटल्यानंतर सदस्य 'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणून ओरडत बाहेर येतात का, हे एकदा पाहिलं पाहिजे.

…………………………………….

५. नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून मला याबाबत संसदेत बोलायंच आहे. मी तिथं सर्व बोलणार आहे. संसदेत मला बोलण्याची परवानगी दिल्यास राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. : राहुल गांधी

अहो, मग आपल्या खासदारांना आरडाओरडा बंद करायला सांगा. संसदेचं कामकाज चालूद्यात आणि हवा तेवढा वेळ बोला मनात जे काही असेल ते. तुम्ही राजकीय भूकंप घडवून आणू शकलात, तर बिचाऱ्या देवांचीही सुटका होईल… काँग्रेसजनांनी कधीपासून पाण्यात बुडवून ठेवलंय त्यांना.

…………………………………….

६. काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, हे ते विसरत आहेत. त्यांना आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार काय? : वेंकय्या नायडू

अण्णा, तुमच्या सत्ताकाळात जवानांच्या शवपेट्यांचाही भ्रष्टाचार झाला. तुम्ही लष्करावर बोलणं सोडलंत का?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......