टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उत्तर प्रदेश निवडणूक, जयललितांचे ‘अम्मा मिनरल वॉटर’ आणि अनुपम खेर
  • Wed , 07 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या उत्तर प्रदेश निवडणूक Uttar Pradesh Election राहुल गांधी Rahul Gandhi जयललिता Jayalalithaa नोटाबंदी Demonetisation अनुपम खेर Anupam Kher

१. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच्या कालावधीत घेतल्या जाव्यात, यासाठी भाजप आग्रही; यामागे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा उठवण्याची रणनीती.

स्वाभाविक आहे. देशभक्तीच्या घोड्यावर बसवलेले लोक आता घोडं काळ्या पैशाच्या मैदानातून कॅशलेस समाजाच्या निबिड अरण्यात घुसू लागल्यामुळे पटापट उतरू लागले आहेत… काहीतरी भारी घडणार आहे, या समजुतीची नशा त्यांच्या डोक्यातून उतरली, तर ते मतपेटीतून काहीतरी भलतंच घडवतील!  ……………………….

२. देशात २०१४ साली झालेल्या ४,८९,४०० अपघातांच्या संख्येत वाढ होऊन २०१५ साली ५,०१,४२३ इतकी झाली. २०११ व २०१३ च्या दरम्यान रस्ते अपघात, त्यातील जखमींची व मृतांची संख्या यात घट झाली होती, मात्र २०१४ सालापासून ती पुन्हा वाढली आहे.

हे आकडे भक्तजनांपर्यंत जाऊ देऊ नका. नाहीतर ते व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर पाहा पाहा, २०१४पासून केवढी प्रगती झाली, असे ढोल वाजवायला सुरुवात करतील. त्यांना कुठेही वाढलेले आकडे दिसले की, ‘अच्छे दिन’ आल्याचा साक्षात्कार होतो! आकडे कसले आहेत, हे पाहण्याची तसदी ते घेतीलच, याची खात्री नाही.

……………………….

३. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी त्या राज्यात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी अम्मा उपाहारगृहे, दहा रुपयांत अम्मा मिनरल वॉटर, सर्व प्रमुख हॉस्पिटलांमध्ये स्वस्त दरात औषधं देणारी फार्मसी, नवजात अर्भकांसाठी मोफत बेबी किट, १४ रुपये किलोने मीठ, गरिबांसाठी स्वस्त सिमेंट, बचतगटांना स्मार्ट मोबाइल, गरीब महिलांना अम्मा मिक्सर, वाजवी दराने सिनेमे दाखवणारे थिएटर, दूरचित्रवाणी वाहिनी, विवाह कार्यालय, बी बियाणं, कॉलसेंटर, मुलींना सायकल, मुलांना शाळेचं दप्तर, पुस्तकं, गणवेश, ११ लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप, अम्मा जिम्नॅशियम एवढ्या कल्याणकारी योजना चालवल्या होत्या.

या राज्यात 'शिवाजी, द बॉस'सारखा सिनेमा का तयार होतो, लोक अम्मा गेल्यानंतर आत्महत्या का करतात आणि अम्मांच्या पश्चात राज्याच्या राजकारणातली पोकळी भरून काढण्यासाठी रजनीकांतच्या नावाची चर्चा का होते, हे आपोआपच कळून जातं ना या माहितीवरून?

……………………….

४. राहुल गांधी यांना राष्ट्रगीत गाताना पाहायचं आहे; त्यांना राष्ट्रगीतातले शब्द पाठ नसतील, अशी शंका आहे. : अनुपम खेर.

आम्हालाही राष्ट्रीय चारित्र्यवान संघटनेच्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकलेला पाहायचाय, आमच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी १५ लाख रुपये जमा झालेले पाहायचे आहेत आणि मुख्य म्हणजे जर तोंड उघडलं तर आचरटपणाच सुचत असेल, तर काहीही न बोलता गप्प बसलेला अनुपम खेरही पाहायचाय.

……………………….

५. कानपूरमध्ये एका महिलेला नोटाबंदीमुळे बँकेबाहेर लागलेल्या रांगेतच मूल झालं… तिने त्याचं नाव ‘खजांचीनाथ’ असं नाव ठेवलं आहे…

या काळात जी बाळं जन्माला येतील, त्यांची नावं गुलाबो, पिंकेश, कॅशियर, टेलर (Teller), मॅनेजर, रखवालदार, प्यून कुमार अशीच ठेवली जातील आणि ही बाळं जन्मजात 'क्यू'ट आहेत, असं म्हटलं जाईल. आईवडिलांना आपला मुलगा डॉक्टर-इंजीनियर बनण्यापेक्षा क्लार्क-कॅशियर बनावा, असंच वाटू लागेल. हा खजांचीनाथ मोठा होण्याच्या आत त्याच्या आईला पैसे मिळालेले असावेत, हीच शुभेच्छा.

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Sindamkar

Wed , 07 December 2016

रोज रोज इतकं चांगलं कसं काय सुचतं तुम्हाला देव जाणे... !!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......