टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • टोलनाका, भाजपचं चिन्ह, सिनेमा थिएटरमधील राष्ट्रगीत, किरीट सोमय्या आणि वेंकय्या नायडू
  • Fri , 02 December 2016
  • विनोदनामा टपल्या नोटाबंदी Demonetization काळा पैसा Black Money वेंकय्या नायडू Venkaiah Naidu Kirit Somaiya राष्ट्रगीत National Anthem

१. निश्चलनीकरणामुळे जारी केलेली टोलमाफी दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीला संपुष्टात आल्यावर रोख रकमेच्या तुटवड्यामुळे होणारे गोंधळ टाळण्यासाठी वाहनचालकांना पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतची कुपन्स दिली जाणार.

आधी टोल हाच एक अपारदर्शक, बेहिशोबी, राजकीय पक्षांना मलिदा चारणारा कोट्यवधी रुपयांचा रोखीतला घोटाळा असताना त्यात कुपनांच्या रूपाने नवे बेहिशोबी, बेकायदा चलन निर्माण करून सरकार काय साध्य करणार आहे? ज्याला पुन्हा टोलनाक्यावर यायचे नाही, त्याच्या गळ्यात अन्यत्र निरुपयोगी कुपनं मारण्यात काय हशील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी आणि शेतकऱ्यालाही कॅशलेस बनवण्याचा विडा उचललेलं सरकार टोलनाके कॅशलेस का बनवू इच्छित नाही?

……………………………..

२. महाराष्ट्रात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले असले तरी नगराध्यक्षपद मिळालेल्या निम्म्यांपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळालेले नाही. परिणामी शहरात विकासकामे राबवताना नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक अशी वादावादी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भाजप सरकार नगराध्यक्षांना जादा अधिकार देणार.

असे जादा अधिकार सरसकट सगळ्या नगराध्यक्षांना देण्याऐवजी फक्त भाजपच्याच नगराध्यक्षांना ते दिले तर? एवीतेवी सरकारला लोकांमधून निवडून आलेल्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना चापच लावायचा आहे ना, मग दुरुस्तीच तशी करून टाकायची! नाहीतरी, संसदीय लोकशाही गुंडाळून राज्य सरकारने आपल्या कठपुतळ्यांमार्फत थेट नगरांचा कारभार हाकण्याची ही फेडरल योजना आहे. जिथे पंतप्रधानच थेट निवडून आलेले 'नगराध्यक्ष' असल्यासारखे वागतात, तिथे वेगळी अपेक्षा काय करणार?

……………………………..

३. नागरोटा हल्ला प्रकरणी संरक्षण मंत्र्यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी करणारी काँग्रेस ही देशाची सुरक्षा आणि जवानांवर राजकारण करते, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. : वेंकय्या नायडू

तुम्ही दहशतवादी हल्ल्यांमधून काही शिकू नका. हल्ला झाला की लष्कराच्या त्रुटी काढायच्या आणि लष्कराने यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला की, तो मात्र आपल्या स्वयंसेवकांनीच केल्यासारखं राजकीय श्रेय ओरपायचं, हे राजकारण नाही का? तुम्हाला गैरसोयीचे ठरणारे प्रश्न विचारणं हेच विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे अण्णा!

……………………………..

४. मुंबईला माफियामुक्त करण्यासाठी भाजप आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढेल : खासदार किरीट सोमय्या

मुंबईत माफियांचं राज्य आहे का? सत्ताधारी तर तुम्हीच आहात शिवसेनेबरोबर? शिवसेनाच माफिया आहे का? मग तिच्याबरोबर सत्तेत सहभाग कशाला घ्यायचा? त्यांना केंद्रात सरकारमध्ये कशाला घ्यायचं? बाळासाहेबांच्या शालीला लोंबकळून लोंबकळून आपण महाराष्ट्रभर पोहोचलो, याचा विसर पडला वाट्टे!

……………………………..

५. देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.

व्हीलचेअरला खिळलेल्या रुग्णांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहायचा की नाही? टोरंटवरून सिनेमे डाउनलोड करून घरी किंवा मोबाइलवर ते पाहणाऱ्या फुकट्यांनी राष्ट्रगीत पण डाउनलोड करायचं का? शेखर कपूर म्हणतो त्याप्रमाणे आधी संसदेत राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करायला पाहिजे… तिथे सिनेमाला लाजवेल एवढा ड्रामा चालतो सदासर्वकाळ.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......