टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमृता फडणवीस, भाऊ कदम यांची मर्सिडीझ, देवेंद्र फडणवीस आणि वेंकय्या नायडू
  • Thu , 01 December 2016
  • विनोदनामा टपल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis वेंकय्या नायडू Venkaiah Naidu नोटाबंदी Demonetization काळा पैसा Black Money

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाटच नव्हे, तर जनतेच्या मोदी यांच्यावरील विश्वासाची सुनामी आहे. त्यामुळेच भाजपला यश मिळाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपचा विजय साजरा केला.

१६४ मतदारसंघांमध्ये ५२ नगराध्यक्ष, त्यातले निम्मे विदर्भातले, निवडून आलेल्या सर्वाधिक नगरसेवकांची ८५१ ही संख्या दुसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसपेक्षा जेमतेम १०० ने जास्त, त्यातही निम्मे विदर्भाचे, युती आणि आघाडी यांच्यातली तफावत तर जेमतेम ८० जागांची; ही सुनामी असेल तर ती कोणत्या जलशिवारात उसळली आहे, तेही सांगून टाकायला हरकत नाही, अध्यक्षमहोदय!

……………………………

२. प्रश्नोत्तरांच्या तासात काँग्रेसने जाणूनबुजून सभात्याग केला आहे. चर्चेमध्ये आपण उघडे पडू अशी त्यांना भीती वाटत आहे. हे खूपच दुर्दैवी आहे. देशातली जनता अशा राजकारणाला वैतागली आहे. या कृत्याने काँग्रेस नागरोटामधील शहीदांचा अपमान करत आहे : वेंकय्या नायडू.

देशातली जनता अशा राजकारणाला वैतागली असती, तर २०१४आधीच्या दहा वर्षांत तुम्ही हेच करत आलात, त्याची बक्षिसी २०१४च्या बहुमताने दिली गेली नसती. आपण सभागृह बंद पाडतो तेव्हा त्यासाठीचं कारण तेवढं महत्त्वाचं असतं, असं एकेकाळी तुम्हाला वाटत होतं, आता काँग्रेसला वाटतं.
……………………………

३. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलाला वाढदिवसाला मर्सिडीझ भेट दिली. त्यांना अनेक महागड्या गाड्यांचा शौक असून विक्रोळीच्या चाळींमध्ये दारिद्र्यात बालपण व्यतीत केल्यानंतर त्यांनी अतिश्रीमंतीत झेप घेतली आहे. त्यांचं वांद्र्यात तीनमजली घर असून घाटकोपरमध्येही आलिशान बंगला कम कार्यालय आहे.

हे पाहा. गाडीची सगळी रक्कम त्यांनी चेकने दिली आहे, असा खुलासा केलाच आहे. शिवाय, त्यांच्या खात्यांमधल्या आठ नोव्हेंबरनंतरच्या व्यवहारांची माहिती अमित शहांकडे (हा हा हा हा) जाईलच. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला कसा आळा बसला आहे, हे सांगण्यासाठी ते विविध वृत्तवाहिन्यांवर चमकत होते की नाही? मग त्यांच्या सचोटीवर आणि देशभक्तीवर शंका कशी घेता तुम्ही?

……………………………

४. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'फिर से' या कुणाल कोहली दिग्दर्शित चित्रपटासाठी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ ऑपेरा हाऊस येथे चित्रित, अहमद खान यांच्या नृत्यदिग्दर्शनात अमिताभ बच्चनबरोबर अमृता झळकल्या, भूषण कुमार यांची निर्मिती.

'फिर से' असं अल्बमचं नाव असल्यामुळे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुत्राचा चित्रपट, त्यांनीच रामगोपाल वर्माला घेऊन दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या ताजमहाल हॉटेलचा मारलेला फेरफटका, माजी पंतप्रधानांच्या कविता गाणाऱ्या गायिकेला, त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला लाभलेले राष्ट्रीय सन्मान, अशा विविधरंगी आठवणींचा पट 'फिर से' जागा झाला मनात.

……………………………

५. नोटाबंदी निर्णयानंतर नोकरदारांचा पहिला पगार आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनची रक्कम बँक खात्यात जमा होणार असताना बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा असल्याने बँकांसमोरच्या रांगाही कायम आणि पैसे काढण्यावर सर्वत्र अघोषित मर्यादाही कायम.

या निर्णयाने काल्पनिक काळ्या पैशावाल्यांचं धाबं दणाणणार असल्याच्या आनंदात 'मी मरेन, पण तुला रंडकी करीन' या चेवाने रांगा लावलेल्या तमाम देशभक्तांच्या पदरात आता कॅशलेस इकॉनॉमीचं पिंटुकलं गाजर पडलेलं आहे… पण, आता मारुतीच्या बेंबीत बोट अडकलंय, गार गार लागतंय म्हणण्यावाचून गत्यंतर काय?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......