टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमृता फडणवीस, भाऊ कदम यांची मर्सिडीझ, देवेंद्र फडणवीस आणि वेंकय्या नायडू
  • Thu , 01 December 2016
  • विनोदनामा टपल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis वेंकय्या नायडू Venkaiah Naidu नोटाबंदी Demonetization काळा पैसा Black Money

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाटच नव्हे, तर जनतेच्या मोदी यांच्यावरील विश्वासाची सुनामी आहे. त्यामुळेच भाजपला यश मिळाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपचा विजय साजरा केला.

१६४ मतदारसंघांमध्ये ५२ नगराध्यक्ष, त्यातले निम्मे विदर्भातले, निवडून आलेल्या सर्वाधिक नगरसेवकांची ८५१ ही संख्या दुसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसपेक्षा जेमतेम १०० ने जास्त, त्यातही निम्मे विदर्भाचे, युती आणि आघाडी यांच्यातली तफावत तर जेमतेम ८० जागांची; ही सुनामी असेल तर ती कोणत्या जलशिवारात उसळली आहे, तेही सांगून टाकायला हरकत नाही, अध्यक्षमहोदय!

……………………………

२. प्रश्नोत्तरांच्या तासात काँग्रेसने जाणूनबुजून सभात्याग केला आहे. चर्चेमध्ये आपण उघडे पडू अशी त्यांना भीती वाटत आहे. हे खूपच दुर्दैवी आहे. देशातली जनता अशा राजकारणाला वैतागली आहे. या कृत्याने काँग्रेस नागरोटामधील शहीदांचा अपमान करत आहे : वेंकय्या नायडू.

देशातली जनता अशा राजकारणाला वैतागली असती, तर २०१४आधीच्या दहा वर्षांत तुम्ही हेच करत आलात, त्याची बक्षिसी २०१४च्या बहुमताने दिली गेली नसती. आपण सभागृह बंद पाडतो तेव्हा त्यासाठीचं कारण तेवढं महत्त्वाचं असतं, असं एकेकाळी तुम्हाला वाटत होतं, आता काँग्रेसला वाटतं.
……………………………

३. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलाला वाढदिवसाला मर्सिडीझ भेट दिली. त्यांना अनेक महागड्या गाड्यांचा शौक असून विक्रोळीच्या चाळींमध्ये दारिद्र्यात बालपण व्यतीत केल्यानंतर त्यांनी अतिश्रीमंतीत झेप घेतली आहे. त्यांचं वांद्र्यात तीनमजली घर असून घाटकोपरमध्येही आलिशान बंगला कम कार्यालय आहे.

हे पाहा. गाडीची सगळी रक्कम त्यांनी चेकने दिली आहे, असा खुलासा केलाच आहे. शिवाय, त्यांच्या खात्यांमधल्या आठ नोव्हेंबरनंतरच्या व्यवहारांची माहिती अमित शहांकडे (हा हा हा हा) जाईलच. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला कसा आळा बसला आहे, हे सांगण्यासाठी ते विविध वृत्तवाहिन्यांवर चमकत होते की नाही? मग त्यांच्या सचोटीवर आणि देशभक्तीवर शंका कशी घेता तुम्ही?

……………………………

४. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'फिर से' या कुणाल कोहली दिग्दर्शित चित्रपटासाठी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ ऑपेरा हाऊस येथे चित्रित, अहमद खान यांच्या नृत्यदिग्दर्शनात अमिताभ बच्चनबरोबर अमृता झळकल्या, भूषण कुमार यांची निर्मिती.

'फिर से' असं अल्बमचं नाव असल्यामुळे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुत्राचा चित्रपट, त्यांनीच रामगोपाल वर्माला घेऊन दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या ताजमहाल हॉटेलचा मारलेला फेरफटका, माजी पंतप्रधानांच्या कविता गाणाऱ्या गायिकेला, त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला लाभलेले राष्ट्रीय सन्मान, अशा विविधरंगी आठवणींचा पट 'फिर से' जागा झाला मनात.

……………………………

५. नोटाबंदी निर्णयानंतर नोकरदारांचा पहिला पगार आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनची रक्कम बँक खात्यात जमा होणार असताना बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा असल्याने बँकांसमोरच्या रांगाही कायम आणि पैसे काढण्यावर सर्वत्र अघोषित मर्यादाही कायम.

या निर्णयाने काल्पनिक काळ्या पैशावाल्यांचं धाबं दणाणणार असल्याच्या आनंदात 'मी मरेन, पण तुला रंडकी करीन' या चेवाने रांगा लावलेल्या तमाम देशभक्तांच्या पदरात आता कॅशलेस इकॉनॉमीचं पिंटुकलं गाजर पडलेलं आहे… पण, आता मारुतीच्या बेंबीत बोट अडकलंय, गार गार लागतंय म्हणण्यावाचून गत्यंतर काय?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......