टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नारायण राणे, मनोहर पर्रीकर, ट्रम्प समर्थक आणि अरविंद केजरीवाल
  • Tue , 29 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नारायण राणे Narayan Rane मनोहर पर्रीकर Manohar Parrikar अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal

१. संरक्षण मंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा संरक्षण खात्याच्या कार्यालयात गेलो, तेव्हा मी थरथरत होतो. पण, मी तेव्हा शूर असल्याचा आव आणत होतो : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर.

फेणीच्या प्रदेशातून जाणाऱ्या माणसाने हातपाय थरथरत असताना शौर्याचा आव आणण्याचा प्रयत्न करण्याचे अर्थ किती वेगळे लागू शकले असते पर्रीकर. आता तुम्ही चांगलेच रुळलेले दिसता. आता तुम्ही कधी काय बोलून बसाल आणि कशाकशाचे खुलासे करत बसायला लागाल, या कल्पनेने लष्करी उच्चाधिकारी आणि प्रवक्ते थरथरत असतात म्हणे!

………………

२. काँग्रेसमध्ये वशिल्यावर पदं दिली जातात. सरकारविरुद्ध काँग्रेस आक्रमक नसून ठोस भूमिका घेण्यात कमी पडत आहे. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व गंभीर नाही. काँग्रेसमध्ये गुणवत्ता बघून पदं दिली जात नाहीत, असे टीकास्त्र काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कोकणात स्वबळावर विजय प्राप्त केल्याबरोब्बर सोडले!  

दादानु, काँग्रेस राज्यात 'गुणवत्ते'नुसार पदे देण्याचा धोका का पत्करत नाही, याचा खुलासा तुमच्या याच वक्तव्यातून होतो, हे लक्षात आलं का? नगरपालिका निवडणुका जिंकल्यावर तुम्ही इतकं बोलता, आणखी मोठं यश मिळालं तर आणखी काय काय बोलाल, कराल, याचीच भीती वाटते हो त्यांना.

………………

३. मुंबईतील नागरिकांना मोदी यांचं भाषण ऐकता यावं, म्हणून भाजपतर्फे ‘मन की बात’, ‘चाय के साथ’ कार्यक्रमांचं आयोजन. एक खास बनावटीची छत्री, बसण्यासाठी आसनं, भाषण ऐकण्यासाठी ध्वनिक्षेपक आणि सोबत चहा अशा स्वरूपाचा हा उपक्रम मुंबई व उपनगरात ३२८ ठिकाणी राबवण्यात आला.

खुर्चीवाले, ध्वनीयंत्रणावाले आणि चहावाला यांना चेकने पैसे दिले की पेटीएमने, त्याचा खुलासा नाही बातमीत. की शाखाशाखांवर आधीच कॅशचा बंदोबस्त करून ठेवला होता? बँकांपुढच्या रांगांची स्थिती सुधारली नाही, तर पुढचा कार्यक्रम मन की बात, चाय-नाश्ता-दोपहर के भोजन के साथ असं स्वरूप करायला लागेल कार्यक्रमाचं!

………………

४. अमेरिकेत पेनसिल्वेनियाकडे निघालेल्या विमानात नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकाचा गोंधळ; या तरुणाने आसनांमधल्या जागेत उभे राहून हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांचा अवमान करणारा आरडाओरडा केला. त्याच्यावर कारवाई न केल्याबद्दल विमान कंपनीनं माफी मागितली आहे. 

चला, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही 'भक्त'संप्रदाय मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे तर. यांच्यापुढे आता हळूहळू खुद्द ट्रम्पतात्या मवाळ वाटू लागतील.

………………

५. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे खासदार महेश शर्मा यांच्या मुलीच्या लग्नावरून ट्विटरवर त्यांची टर उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, केजरीवाल यांनी लग्नाचे बिनचूक तपशील न घेता आरोप केल्यामुळे आणि शर्मा यांनी लग्नाचा खर्च धनादेशाद्वारे केला जात असल्याचं सांगितल्यामुळे केजरीवाल तोंडघशी पडले.

आरोपासाठी आरोप करत बसणं हे एकवेळ राजकारणाचा भाग म्हणून मान्य करता येऊ शकतं; पण, एका महत्त्वाच्या राज्याच्या जबाबदार मुख्यमंत्र्याने साधी माहिती न घेता काहीही आरोप करणं, हे त्या पदाची शोभा घालवणारं आहे. इतरांना सच्छिलतेचे धडे देणाऱ्यांनी तरी या चुका करून जोकर बनून करता कामा नये.

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Pashte

Tue , 29 November 2016

केजरीवालांना आवरारे कुणीतरी !! :-) :-)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......