शेतकऱ्यांचं दूध तापलंय. या तापलेल्या दुधाला थंड केलं जाईल की, दूध उतू जाईल? 
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • राष्ट्रीय किसान महासंघाच्या मंचावर देशभरातील १३० शेतकरी संघटना एकत्र येऊन त्यांनी संपाची हाक दिलीय
  • Wed , 06 June 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar शेतकरी संप Shetkari samp Farmers' strike राष्ट्रीय किसान महासंघ Rashtriya Kisan Mahasangh

राष्ट्रीय किसान महासंघानं शेतकऱ्यांचा संप पुकारलाय. १० जूनपर्यंत हा संप तीव्र होईल अशी चिन्हं आहेत. देशभर हा संप आहे असं महासंघ म्हणत असला तरी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब या राज्यात शेतकऱ्यांचा संपाला पाठिंबा मिळतोय. इतर ठिकाणी पुरेसा प्रतिसाद दिसत नसला तरी या संपात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. 

महासंघाच्या मंचावर देशभरातील १३० शेतकरी संघटना एकत्र येऊन त्यांनी या संपाची हाक दिलीय. शेतीमालाला योग्य भाव, पीक विमा, कर्जमाफी असे प्रश्न या संपात अजेंड्यावर आहेत. पण या संपातली खरी कळीची शेतकऱ्यांची मागणी आहे, ती दुधाला ५० रुपये प्रती लिटर भाव देण्याची. संपाच्या पहिल्या दिवसापासून (१ जून) दूध उत्पादक शेतकरी आक्रमक दिसत आहेत. 

महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर येऊन दूध ओतून देतोय. दुधाचे टँकर अडवून ते दूध रस्त्यावर नासवतोय. काही ठिकाणी फुकट दूध वाटप करून शेतकरी कार्यकर्ते प्रतीकात्मक आंदोलन करत आहेत. सरकारनं वेळीच दखल घेतली नाही, तर हे दूध उत्पादकांचं आंदोलन हिंसक होऊ शकतं.

या पूर्वी महाराष्ट्रात ऊस उत्पादकांचं हिंसक आंदोलन आपण बघितलेलं आहे. आता यापुढे दूध उत्पादकांची आंदोलनं बघायची तयारी ठेवली पाहिजे. कारण दूधाचा प्रश्न दिवसेंदिवस स्फोटक बनत चाललाय. शेतकरी संपात यावेळी सरकारनं काही हस्तक्षेप न करताच फुट पडलीय. खासदार राजू शेट्टी आणि कॉम्रेड अजित नवले यांनी वेगवेगळी विधानं करून हा संप फुटला, हे स्पष्ट केलंय. अजित नवले यांनी ७ जूनला शहराचा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा तोडणार असं जाहीर केलंय, तर खासदार शेट्टी यांना ते मान्य दिसत नाहीय. 

शेतकरी संपात फुट उघड दिसत असली तरी दूधाचा प्रश्न पेटलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी सरकारवर चिडलेले आहेत. आजपर्यंत शेतकरी आंदोलनात ऊस, कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्य मुद्दे असत. त्याला कारणही होतंच. कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लॉबी शेतकरी संघटनेत प्रभावी होती. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली ती आंदोलनं करी. पुढे शरद जोशी पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगावकडे गेले. तिथं कांदा उत्पादक मोठ्या संख्येनं होते. तेव्हा कांदा उत्पादकांची आंदोलनं वाढली. नंतर शरद जोशी विदर्भ, मराठवाड्यात गेले. तिथं कापूस उत्पादक शेतकरी बहुसंख्येन होते. त्यामुळे कापूस प्रश्नावर आंदोलन मोठी होऊ लागली. 

आता संपूर्ण महाराष्ट्रात दूध उत्पादकांची संख्या जवळपास ५० लाख इतकी आहे. महाराष्ट्रात  सध्या ७५ लाख लिटर दूधाचं उत्पन्न होतंय. देशात दूध उत्पादनात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. एक नंबर गुजरातचा, दुसरा मध्य प्रदेशचा, तिसरा उत्तर प्रदेशचा आहे. त्यानंतर बिहार, पंजाब, हरयाणा ही राज्यं येतात. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात दूध उत्पन्न ४० लाख लिटरपासून ७५ लाख लिटरवर वाढलं. 

दूध उत्पादनाकडे महाराष्ट्रातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले, कारण इतर पिकांची शेती तोट्यात जाऊ लागली. अगदी ऊस उत्पादकांना ते पीक फायदेशीर ठरेना. कांदा, कापूस, डाळी यांच्या भावांचा सतत चढ-उतार सुरू असतो. ही शेती म्हणजे जवळपास जुगार बनलीय. त्यामुळे हुकमी उत्पन्नाचं साधन म्हणून शेतकरी दूध उत्पादनाकडे वळला. विशेषतः शिकलेले तरुण ग्रामीण भागात दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आहेत. ग्रामीण भागात अनेक प्रत्येक कुटुंबांत जर्सी गायी पाळलेल्या दिसतात. काही मोठे शेतकरी गोठे बांधून दूध उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ करताना दिसतात. गायींच्या दुधाला २४ ते २७ रुपये प्रती लिटर भाव. म्हशीच्या दुधाला दर लिटरला ३३ ते ३५ रुपये भाव सध्या मिळतो. हा भाव पुरेसा नाही. प्रत्येक लिटरला गायीच्या दूधाला ५० रुपये मिळावेत, अशी सध्या संपकरी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या तर गायीचे दूध २७ रुपयांऐवजी १७ रुपये दराने सहकारी आणि खाजगी दुध संघ उत्पादकांकडून खरेदी करतंय. दर लिटरमागे शेतकऱ्याची १० रुपये लुट सुरू आहे. दर लिटरमागे होणारा १० रुपये घाटा सोसावा लागत असल्यानं शेतकरी संतप्त आहे. या संपात दूध पेटलंय  त्याचं खरं कारण ही लूट आहे, असं संपकरी नेते सांगत आहेत.

१० रुपयाची लूट कोण करतंय? शेतकरी नेते या लुटीला सरकारला जबाबदार धरतात. तर दुधमंत्री महादेव जानकर म्हणतात की, कमी दरानं दूध खरेदी करू नका, अशी तंबी आम्ही खाजगी आणि सहकारी दूध संघांना दिलीय. सरकारनं तंबी देऊनही खाजगी आणि सहकारी दूध संघ सरकारचं ऐकत नाहीत. म्हणूनच ही लूट सुरू आहे, असा आरोप शेतकरी नेते करत आहेत.  

दूध उत्पादकांच्या लुटीमुळे होणारा संताप, खाजगी-सहकारी दूध संघांची चालबाजी आणि सरकारची वेळकाढू चालढकल, यात मोठं राजकारण आहे. दूध खरेदी करणाऱ्या खाजगी आणि सहकारी संस्था या बड्या राजकारणी नेत्यांशी सबंधित आहेत. हे नेते सर्वपक्षीय आहेत. त्यांच्यावर कारवाई कोण करणार, हा कळीचा प्रश्न आहे. 

दूध कमी दरानं खरेदी केलं तर या संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना आहेत. पण सर्वपक्षीय नेत्यांच्या दबावामुळे हे अधिकारी कारवाई करू शकत नाहीत. दूध मंत्री हे बोलतात फार, पण त्यांचा या खात्यावर वाचक नाही. या खात्यातले अधिकारी त्यांचं ऐकताना दिसत नाहीत. म्हणून हा सगळा गोंधळ सुरू आहे. त्यात दूध उत्पादकांची लूट सुरू आहे. ५० दूध संघांना नोटीसा दिल्यात, पण त्या संस्था सरकारला घाबरत नाहीत असा हा मामला आहे. दूध कमी दरानं खरेदी करावं का लागतंय? यासाठी करण सांगितलं जात की, दुधाचं उत्पादन वाढलंय. दूध पावडर निर्यात बंदी आहे. दूध पावडरचे आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव घसरले आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर दूध आपल्या राज्यात येतंय. त्यामुळे दुधाचा महापूर आलाय. पुरवठा जास्त, त्यामुळे भाव कमी या तत्त्वानुसार दुध उत्पादकांना कमी भाव मिळतोय. 

कोसळणाऱ्या दूध दरांना सावरण्यासाठी राज्य सरकारनं दूध भुकटी प्रकल्पांना ३ रुपये प्रती किलो अनुदान देण्याची घोषणा केलीय. दूध भुकटी प्रकल्पांनी २० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन करावं म्हणजे त्यांना हे अनुदान मिळेल, अशी अट सरकारनं घातलीय. पण अगोदरच २६ हजार ५०६.७० मेट्रिक टन इतकी दूध भुकटी सध्या राज्यात शिल्लक आहे. ती कुठे विकायची असा त्या संस्थांपुढे प्रश्न आहे. तेव्हा अधिक भुकटी उत्पादन करण्याची, आगीतून फुफाट्यात पडायची या उद्योगाची तयारी दिसत नाही. त्यातून वाढीव दुधाला भाव मिळत नाहीए. दूध उत्पादन वाढलं म्हणून प्रश्न वाढलेत. त्याचा बागुलबुवा दाखवून सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय हे शेतकरी नेत्यांना मान्य नाही. त्यांच्या मते वाढलेल्या दुधाचा प्रश्न सरकारला सोडवता येणं अशक्य नाहीए. शेतकरी नेत्यांच्या मते, दुसऱ्या राज्यातून दूध खरेदी करणं सरकारनं बंद करावं, दुधाची भुकटी परदेशात निर्यात करायला खुला परवाना द्यावा आणि दुधाचा समावेश शालेय पोषण आहारात करावा. सध्या अंगणवाड्या, शाळा, वसतिगृह यात पावणेतीन कोटी बालकं शिक्षण घेताहेत. पहिली ते आठवीच्या वर्गात १ कोटी ६० लाख बालकं शिक्षण घेतात. शाळा, अंगणवाडीमध्ये २ कोटी १३ लाख बालकं आहेत. ही संख्या लक्षात घेतली आणि यांना शालेय पोषण आहारात दूध दिलं तर ५५ लाख लिटर दूध सरकारला खरेदी करता येऊ शकेल. बालकांना सकस आहारात दूध मिळेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल. १९८०-९० च्या काळात राज्य सरकार बालकांना शाळेत दूध देत असे, आता ते बंद केलंय. 

या सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच दुधाचा प्रश्न पेटलाय, असा शेतकरी नेत्यांचा आरोप आहे. ७ जून हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शहरांचा दूध, भाजीपाला तोडण्याचा संपकाऱ्यांचा निर्धार आहे. तापलेल्या दुधाला थंड केलं जाईल की, दूध उतू जाईल? हा प्रश्न सुटला नाही, तर हे आंदोलन कसं वळण घेईल? हे येत्या काळात दिसेलच.  

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Wed , 06 June 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......