टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सी. चंद्रशेखर राव, बाबूल सुप्रियो, किशोर बियाणी, पृथ्वीराज चव्हाण आणि केजरीवाल
  • Thu , 24 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan नरेंद्र मोदी Narendra Modi अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal

१. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आल्याचं मोदींनी सिद्ध केलं तर मोदींसाठी जोरजोराने टाळ्या वाजवेन, रस्त्याकडेला उभे राहून मोदी, मोदी असं ओरडेन : अरविंद केजरीवाल

केजरीवाल, आता तरी काहीतरी वेगळं करा. आताही तुम्ही सदासर्वकाळ तेच करत असता. लोकांना फरक कळणार कसा? निदान थोडा गॅप तरी ठेवा.

……………………………………

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीविषयक गदारोळाला उत्तर द्यायला संसदेत का हजर राहत नाहीत, या विरोधकांच्या प्रश्नाची खिल्ली उडवताना केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो म्हणाले की, जब छोटे बच्चे ही इनका जवाब दे सकते है, तो ‘डॅडी’ को आने की क्या जरूरत है?

बाबूल बेटा, डॅडी मोठे तुमच्यासाठी? लोकशाहीत संसद सर्वोच्च आहे. तिथे ‘मेरे डॅडी शक्तिमान’ म्हणून कडक्या पोरांनी बेडक्या फुगवत नाचायचं नसतं. डॅडींनी येऊन जबाबदारीने उत्तरं द्यायची असतात. डॅडींनी थेट इथं आणण्याआधी चांगल्या शाळेत घातलं असतं तर बरं झालं असतं बच्चेकंपनीला.

……………………………………

३. आता एटीएमबरोबरच ‘बिग बझार’च्या आस्थापनांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करून पैसे काढता येणार. दोन हजार रूपयांची मर्यादा : बिग बाझार समूहाचे अध्यक्ष किशोर बियाणी यांचं ट्वीट.

या वेगाने आणखी काही दिवसांत स्वायपिंग मशीन असलेल्या सगळ्याच आस्थापनांमध्ये ही व्यवस्था करावी लागेल. सहकारी बँका मात्र रिझर्व्ह बँकेच्या लेखी बिग बाजारइतक्याही विश्वासार्ह नाहीत, हे मनोज्ञ आहे.

……………………………………

४. सातारची स्वाभिमानी जनता आता ‘बारामती’चा आदेश मानत नाही, हे काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या विजयावरून स्पष्ट झालं आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

बापरे, सातारची काँग्रेस स्वयंभू झाली की काय! यापुढे ती दिल्लीचे आदेश घेणार नाही? हे काय बोलताय ते मॅडमना कुणी कळवलं तर काय होईल बाबा?

……………………………………

५. आपण बारबाहेर, दारूच्या दुकानाबाहेर रांग लावतोच ना, तर मग देश प्रामाणिक बनवण्यासाठी बँकेबाहेर रांग लावण्यात अडचण काय? : मल्याळी सुपरस्टार मोहनलालच्या विधानावरून केरळात वादंग

फारच असहिष्णू आहेत बुवा हे मल्याळी लोक. मोहनलालगारू कोणत्या रांगेतून कोणत्या रांगेत आले असतील, याचा अंदाज घेऊन सोडून द्यायचं ना त्यांचं विधान. जाने दो, पियेला है, म्हणतात, ते उगाच का!

……………………………………

६. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नव्या आलिशान घरातील बाथरुमही बुलेटप्रूफ, एक लाख चौरस फुटापेक्षा मोठया घरात दोन बेडरुमही बुलेटप्रूफ, ५० सुरक्षारक्षकही तैनात, सुरक्षा अधिकाऱ्यांचीही २४ तास नजर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावांना रिक्वेस्ट करून एक बेडरूम मिळवायला हरकत नाही. एका राज्याचं निम्मं पोलिस दल जर एकाच माणसाच्या सुरक्षेसाठी नेमलं गेलं असेल, तर तिथं त्यांना 'जान का खतरा' असण्याचा सवालच नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......