टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, पेटीएम लोगो आणि रेड्डी कन्या शाही विवाह
  • Tue , 22 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

१. देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं प्रवास करत असून या लढाईत ५० दिवस मोदींना साथ देणारा माणूस एक शिपाई बनेल, तर जो मोदींना साथ देणार नाही तो देशाचा विरोधक असेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाना फडणवीस तुमचे कोण हो? अगदी सेम टु सेम मुत्सद्देगिरी हो! पण असं आहे की देश आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं चाललाय, अशी तुमची कल्पना आहे. त्यात तुम्हाला शिपाई, खानसामा, अंमलदार जे काही बनायचं असेल ते बना. जो सरकारचा विरोधक तो देशाचा विरोधक ठरवताना आपल्याकडे सगळी मिळून ३१ टक्केच मतं आहेत, याचं भान ठेवलंत तर बरं!

...............

२. कर्नाटकातल्या खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्याला सेवा पुरवणाऱ्या पुरवठादारांची प्राप्तीकर खात्याकडून चौकशी लग्नातल्या उधळपट्टीबदल रेड्डी यांना मात्र अद्याप जाब विचारला गेला नाही.

तो विचारला जाईल याचा काही भरवसाही नाही. रेड्डी यांनी मुलीचं लग्न नोंदणी पद्धतीनं पाच साक्षीदारांच्या साक्षीनंच लावायचं ठरवलं होतं, पण त्यांच्या राजकीय विरोधकांनी कट करून शाही विवाहसोहळा रचला आणि त्या कारस्थानात या दहा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या सहभागी झाल्या, असा निष्कर्ष निघाला, तरी आश्चर्य वाटायचा नको.

...............

३. गिरणा धरणातून नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून मुख्यमंत्र्यांमार्फत जलवाहिनीचे काम मार्गी लावून शहर व परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणार आहे. त्यासाठी  नगर परिषदेत भाजपलाच मतदान करा : पंकजा मुंडे यांचं आवाहन

म्हणजे काय, राज्यात आमची सत्ता असताना विकास हवा असेल, तर आम्हालाच मतदान करा, असं सगळेच राज्यकर्ते मतदारांना खासगीत बजावत असतात. विरोधात गेलेल्या वस्त्यांना नागरी सेवासुविधा पुरवण्यात कुचराई करून त्यांचे हाल हाल करून धडा शिकवण्याचा फंडाही जुनाच आहे. पंकजा मुंडे यांनी तो फक्त बोलून दाखवला, इतकंच.

...............

४. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोबाइल पाकीट सेवा पुरवणाऱ्या पेटीएमची भरभराट, रोज १२० कोटी रुपयांचे ७० लाख व्यवहार; पाच अब्ज डॉलरचं उद्धिष्ट चार महिन्यांपूर्वीच पार पडलं.

मेक इन इंडियाचा गजर करणाऱ्या, चिनी मालावर बहिष्काराचं आवाहन करणाऱ्या विचारसरणीचं सरकार सत्तेत असताना त्याच्या निर्णयाचा लाभ पेटीएममध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या अलीबाबा या चिनी कंपनीला व्हावा, हा योगायोग विलक्षण आहे. आता ही कंपनी सरकारस्नेही उद्योगपतींच्या 'मुठ्ठी में' येते की, पतंजलीचं स्वदेशी मोबाइल पाकीट सुरू होतं, ते पाहायला हवं.

...............

५. नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा नष्ट करण्यासाठी घेतला असताना त्याचा त्रास होण्याचं कारण काय? : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल

असं आहे मोदीजी, हिंदी सिनेमातला एका प्रसंगाप्रमाणे ही स्थिती झाली आहे. नायक मोठ्या आवेशात खलनायकाचा जबडा तोडण्यासाठी फाइट मारायला हात उगारतो आणि त्याच्या तोंडावर फटका मारतो… प्रत्यक्षात त्याने उगारलेल्या हाताच्या फटक्याने त्याच्याच पाठीमागे उभे राहिलेले त्याचेच तीन समर्थक कोलमडून पडतात… तो हात हवेत झेपावतो, तेव्हा आणखी तीन समर्थकांची बत्तिशी तुटते… शिवाय तो हात खलनायकाच्या जबड्याऐवजी लोखंडी खांबावर आदळून हाड मोडतं ते वेगळंच… नायक तरीही ओरडत असतो, मी खलनायकाची बत्तिशी तोडायला निघालेलो असताना तुम्ही सगळ्यांनी ओय ओय ओय ओय ओरडण्याचं कारण काय… ओय ओय ओय ओय…

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......