टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, पेटीएम लोगो आणि रेड्डी कन्या शाही विवाह
  • Tue , 22 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

१. देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं प्रवास करत असून या लढाईत ५० दिवस मोदींना साथ देणारा माणूस एक शिपाई बनेल, तर जो मोदींना साथ देणार नाही तो देशाचा विरोधक असेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाना फडणवीस तुमचे कोण हो? अगदी सेम टु सेम मुत्सद्देगिरी हो! पण असं आहे की देश आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं चाललाय, अशी तुमची कल्पना आहे. त्यात तुम्हाला शिपाई, खानसामा, अंमलदार जे काही बनायचं असेल ते बना. जो सरकारचा विरोधक तो देशाचा विरोधक ठरवताना आपल्याकडे सगळी मिळून ३१ टक्केच मतं आहेत, याचं भान ठेवलंत तर बरं!

...............

२. कर्नाटकातल्या खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्याला सेवा पुरवणाऱ्या पुरवठादारांची प्राप्तीकर खात्याकडून चौकशी लग्नातल्या उधळपट्टीबदल रेड्डी यांना मात्र अद्याप जाब विचारला गेला नाही.

तो विचारला जाईल याचा काही भरवसाही नाही. रेड्डी यांनी मुलीचं लग्न नोंदणी पद्धतीनं पाच साक्षीदारांच्या साक्षीनंच लावायचं ठरवलं होतं, पण त्यांच्या राजकीय विरोधकांनी कट करून शाही विवाहसोहळा रचला आणि त्या कारस्थानात या दहा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या सहभागी झाल्या, असा निष्कर्ष निघाला, तरी आश्चर्य वाटायचा नको.

...............

३. गिरणा धरणातून नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून मुख्यमंत्र्यांमार्फत जलवाहिनीचे काम मार्गी लावून शहर व परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणार आहे. त्यासाठी  नगर परिषदेत भाजपलाच मतदान करा : पंकजा मुंडे यांचं आवाहन

म्हणजे काय, राज्यात आमची सत्ता असताना विकास हवा असेल, तर आम्हालाच मतदान करा, असं सगळेच राज्यकर्ते मतदारांना खासगीत बजावत असतात. विरोधात गेलेल्या वस्त्यांना नागरी सेवासुविधा पुरवण्यात कुचराई करून त्यांचे हाल हाल करून धडा शिकवण्याचा फंडाही जुनाच आहे. पंकजा मुंडे यांनी तो फक्त बोलून दाखवला, इतकंच.

...............

४. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोबाइल पाकीट सेवा पुरवणाऱ्या पेटीएमची भरभराट, रोज १२० कोटी रुपयांचे ७० लाख व्यवहार; पाच अब्ज डॉलरचं उद्धिष्ट चार महिन्यांपूर्वीच पार पडलं.

मेक इन इंडियाचा गजर करणाऱ्या, चिनी मालावर बहिष्काराचं आवाहन करणाऱ्या विचारसरणीचं सरकार सत्तेत असताना त्याच्या निर्णयाचा लाभ पेटीएममध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या अलीबाबा या चिनी कंपनीला व्हावा, हा योगायोग विलक्षण आहे. आता ही कंपनी सरकारस्नेही उद्योगपतींच्या 'मुठ्ठी में' येते की, पतंजलीचं स्वदेशी मोबाइल पाकीट सुरू होतं, ते पाहायला हवं.

...............

५. नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा नष्ट करण्यासाठी घेतला असताना त्याचा त्रास होण्याचं कारण काय? : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल

असं आहे मोदीजी, हिंदी सिनेमातला एका प्रसंगाप्रमाणे ही स्थिती झाली आहे. नायक मोठ्या आवेशात खलनायकाचा जबडा तोडण्यासाठी फाइट मारायला हात उगारतो आणि त्याच्या तोंडावर फटका मारतो… प्रत्यक्षात त्याने उगारलेल्या हाताच्या फटक्याने त्याच्याच पाठीमागे उभे राहिलेले त्याचेच तीन समर्थक कोलमडून पडतात… तो हात हवेत झेपावतो, तेव्हा आणखी तीन समर्थकांची बत्तिशी तुटते… शिवाय तो हात खलनायकाच्या जबड्याऐवजी लोखंडी खांबावर आदळून हाड मोडतं ते वेगळंच… नायक तरीही ओरडत असतो, मी खलनायकाची बत्तिशी तोडायला निघालेलो असताना तुम्ही सगळ्यांनी ओय ओय ओय ओय ओरडण्याचं कारण काय… ओय ओय ओय ओय…

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......