माध्यमांनी केला लक्ष्मीकांत देशमुखांचा ‘एन्काऊंटर’!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख. सोबतचं रेखाचित्र - संजय पवार
  • Mon , 26 February 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar साहित्य संमेलन Sahitya Sammelan ९१ वे साहित्य संमेलन बडोदा लक्ष्मीकांत देशमुख Laxmikant Deshmukh

यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख हे काही तसे ‘सेलिब्रेटी’ लेखक नव्हेत. ‘पानिपत’कार, ‘मृत्यूंजय’कार, ‘बलुतं’कार किंवा ‘उपरा’कार असा कुठलाही ‘कार’ त्यांच्या नावामागे नाही. ते प्रशासकीय सेवेत राहून साहित्यनिर्मिती करणारे लेखक म्हणून, एका विशिष्ट वर्गात ‘माहीत’ आहेत. ‘लोकप्रिय’ नाहीत. अजूनपर्यंत तरी प्रशासकीय काळातील त्यांचा कुठलाही भ्रष्टाचार बाहेर आलेला नाही किंवा कूजबूज स्वरूपातही कुठे ऐकू येत नाही. अनेक आघाड्यांवर ‘कोरी पाटी’ असलेले देशमुख चर्चेत आले, ते त्यांच्या अध्यक्षीय भाषणावरून! गेल्या अनेक वर्षांतील किंबहुना दशकातील कुणा अध्यक्षाच्या भाषणाची इतकी दखल घेतली गेली. पण त्यात एक गोम आहे. माध्यमांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक करतानाच, कुठे तरी ‘ठिक आहे’, ‘तुम्ही तीर मारताय, पण ते काही तितकं महत्वाचं नाही’ असं म्हणत देशमुखांचा सवाल, मूळातून पंक्चर करण्याचा उद्योग केला, तो म्हणजे एक प्रकारचा बेशरमपणाच!

म्हणजे श्रीपाल सबनीसांच्या १२९ वगैरे पानांचं भाषण, त्याचं वेळीच न झालेलं वितरण, सबनीसांचा बेधडकपणा आणि सनातन्यांच्या धमक्या या पार्श्वभूमीवर त्यांनी नथुराम समर्थकांना झोडपून काढलं, हा ही वेगळा व उल्लेखनीय भाग होता. मात्र सबनीसांची साहित्यिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी ही इथल्या विविध परिवर्तनवादी विचारांसोबत वैचारिक संघर्षाची, समन्वयाची, प्रसंगी विरोधाचीही राहिली. त्यामुळे त्यांनी तशी मांडणी करणं, अपेक्षित नव्हतं, तरी अनपेक्षितही नव्हतं. पण ते संमेलन ‘उणे सबनीस, अधिक पी. डी. पाटील’ असंच लक्षात राहिलं.

विद्रोही संमेलनाचा संस्थापक-सदस्य व दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिल्यानंतर ‘अखिल भारतीय साहित्य संमेलनावर प्रतिक्रिया देणं आम्ही थांबवलं होतं. त्याच त्या उत्सवी स्वरूपावर, अनुदानावर, अध्यक्षनिवडीवर तेच तेच किती तेच तेच बोलायचं? पण हमों सारखा कुणी ब्राह्मणवाद उकरून काढला तर त्याला जागा दाखवायची यात खंड नाही!

देशमुखांच्या भाषणाबाबत माध्यमांनी (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक) जो पक्षपात केला, तो म्हणजे सत्ताधार्‍यांना जसा सत्तेचा दर्प येतो, त्याप्रमाणे माध्यमसत्तेचा दर्प काही विशिष्ट माध्यमांत विशेषत्वाचे जाणवला.

‘राजा तू चूकत आहेस, हे सांगितलं पाहिजे’ हे देशमुखांनी त्या व्यासपीठावरून, तेही बडोद्यात म्हणणं याला निश्चितच महत्त्व होतं, पण अपवाद वगळता बहुसंख्य माध्यमांनी देशमुखांच्या भाषणाची दखल जुजबी, आतील पानांत वगैरे घेतली. त्यांचं भाषण छापण्याची तसदी तर किरकोळीत घेतली गेली. ‘लोकमान्य लोकशक्ती’ वगैरे म्हणणार्‍या दैनिकानं तर देशमुखांऐवजी श्याम मनोहरांची बातमी पहिल्या पानावर ठळक केली!

एकूणात सर्व माध्यमांनी देशमुखांचं भाषण, त्यातील मुद्यांसकट जवळपास कचर्‍यात टाकलं. (याबाबतचा सविस्तर वृत्तांत याआधी ‘अक्षरनामा’वर आलाच आहे.)

यात काही माध्यमांनी ‘अग बाई, केवढी ही गंमत!’ म्हणत वर देशमुखांनाच ‘म्हणजे तुमचा रोख कुणावर?’ वगैरे बालिश प्रश्न विचारले. अर्थात अशा बालिशपणाचा व बिनडोक धैर्याचा मक्ता हा वृत्तवाहिन्यांकडेच जातो. एका वाहिनीच्या पत्रकार मुलीनं हा प्रश्न देशमुखांना असा विचारला की, जणू काही ती विचारतेय की, काल तुम्ही असं काही तरी बोललात, तर मग ते नेमकं काय होतं सांगाल का? देशमुखांनी उत्तर दिलं. त्यांचं उत्तर संपतय न संपतय तोवर तरुणी थेट पोहचली कसलीशी शेव मिसळ का भेळ खायला. मग बडोद्याच्या त्या प्रसिद्ध डिश, हॉटेल्सची साद्यंत माहिती. साहित्य संमेलनात होतं काय, असं नाक वर करून विचारणारे चॅनेलिय पत्रकार/संपादक या निर्बुद्ध भरतीवर कधी बोलतील?

का कशी पण जनाची नाही पण मनाची वाटली आणि माध्यमं देशमुखांच्या भाषणाकडे वळली. पण त्यातही शिरजोरी कायमच! आपणच ‘श्रेष्ठ’ व इतर सारे ‘भुक्कड’ अशा गंडात वावरणार्‍या एका संपादकांनी ‘देशमुख म्हणजे दुर्गा भागवत नव्हेत’ या प्रकारचं भाष्य करून, साहित्यातल्या सृजनशीलतेपासून ते राजकीय नेतृत्वाला धडा शिकवण्याचा मक्ता भागवत संप्रदायापासून सुरू होऊन भागवत संप्रदायापाशीच संपतो हेच अधोरेखित केलं. इथंही पुन्हा ‘म्हणजे देशमुख अभिनंदनास पात्रच आहेत’ असं उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्र दिल्यासारखं, श्रेय देतानाही कंजुषी करत दिलेलं. आता देशमुखांची साहित्यिक कामगिरी (वाचलीच नसल्यानं) त्यावर भाष्य करण्याऐवजी, ते प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी कधी असा प्रश्न विचारला होता का? का आत्ता निवृत्तीनंतरच त्यांना हे धाडस आलं? प्रश्न तर थेट व बिनचूक. पण मग माधव गोडबोलेंचे दोन-दोन पानी लेख छापताना, हा प्रश्न कधी तरी त्यांनाही विचारा की! का गोडबोले तेवढे नीरक्षिरविवेक जपणारे राजहंस आणि देशमुख वगैरे निवृत्तीपश्चात रामशास्त्री?

माध्यमांचा आत्मा इतका सहजासहजी शांत कसा झाला असता? ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चा इव्हेंट समोर असताना, साक्षात बडोद्यात जाऊन अगोचरपणा करणारा कोण हा टिंबक टू देशमुख? ‘राजा, तू चुकत आहेस’ हा सवाल करून देशमुखांनी जणू राजद्रोहच केलाय, अशा पद्धतीनं त्यांना पिंजर्‍यात घेऊन, त्यांच्यावर सरबत्ती करण्यात आली.

या सरबत्ती करणार्‍यात मग काही तर्ककठोर होते, काही धड ना कलावादी, ना स्वच्छंदवादी असेही होते. शिवाय सूत्रसंचालकांकडे हातचा एक असतोच.

यात मग संमेलनाध्यक्ष निवडण्याची प्रक्रियाच किती लोकशाही विरोधी आहे; गटबाजी, पैसा व साधनांचा, संबंधांचा उपयोग-दुरुपयोग यावरून देशमुखांना कोपर्‍यात ढकलायला सुरुवात झाली. वास्तविक हा प्रश्न देशमुखांच्या निवडणुकीपासून सुरू झालेला नाही आणि त्यांच्या कार्यकाळानंतर तो संपणार नाही, हे सर्व चर्चकांना चांगलंच माहीत होतं. (हा प्रश्न कुणी कधी दुर्गा भागवत, गंगाधर गाडगीळ, पुल, श्रीपु यांना विचारला होता? किंवा बदल करा म्हणून धारेवर धरलं होतं?) पण देशमुखांच्या सवालातील हवा काढायला हे निमित्त चांगलं होतं. पत्रकारितेतील ‘अर्णवनीती’ इथं कामी येते! आणि काही वेळा एरव्ही व्यवस्थाविरोधी मान्यवरही नकळत व्यवस्थेच्या मांडीला मांडी लावून मुख्य शत्रूच विसरतात. तसंच इथं झालं.

बाकी ‘भूमिका’ शब्दाचीच एलर्जी असणारे कलावादी कम स्वच्छंदतावादी कम मुक्तप्रतिभावंत, देशमुखांच्या प्रश्नावर डोळ्यात तिखट गेल्यासारखे थयथयाटले! अशांचा थयथयाट समाजमाध्यमांवर अखंड चालू असतो. या लोकांचा एक आवडता प्रश्न असतो- ‘आम्हाला प्रेम कविता लिहाविशी वाटली तर आम्ही लिहायची नाही का? का त्यात काही भूमिका, सामाजिक वगैरे नाही म्हणून ती कविता प्रेमभावनेसहच टुकार?’

टाळी घ्यावा असाच प्रश्न व कोमल वेदना असते. पण आजवर शारदेच्या दरबारातील सारस्वतांनी हाच तर चंद्र, सूर्य, तारे नि झाडे-झुडपांचा खेळ रंगवला! त्याला विरोध नि आडकाठी कशाला? पीकासोबत ‘तण’ ही माजतं, हा तर निसर्गनियम! भूमिकावाल्यांचं म्हणणं एवढंच असतं की, ‘ ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे एकच असतं, तुमचं नि आमचं सेम असतं’ यावर टाळ्या पिटून, खुदकन गाली हसून झालं नि झोका वर जाऊन खाली आला की, कधी तरी साहिरचं ‘इक शहेनशहानं बनवाके हँसी ताजमहाल, हम गरिबोंकी मुहब्बत का उड़ाया है मजाक यारो’, हे समजून घेतलंच तर धारा आणि बुडबुड्यातला फरक कळेल.’ त्यामुळे या अधल्यामधल्या प्रतिभावंतांनी देशमुखांवर चिडून हल्ला केला तर तो हसण्यावारीच नेला पाहिजे.

लक्ष्मीकांत देशमुखांच्या प्रामाणिक, किंचित धाडसी व काही ठिकाणी स्वसाहित्याच्या अनावश्यक तपशीलानं भरलेल्या भाषणाची ‘दखल’ कुठे तरी घेतली गेली आणि पोसलेल्या माध्यमांतल्या एन्काऊंटर स्पेशालिस्टांनी आपली कामगिरी योग्यपणे पार पाडली!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 27 February 2018

अहो पवारसाहेब, माध्यमांनी लक्ष्मीकांत देशमुखांचा एनकाउंटर बिनकाउंटर केलेला नाहीये हो. खरा एनकाउंटर मी केलाय. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वाचकांनी केलाय. लक्षांत येतंय का मी ( म्हणजे सामान्य वाचक बरंका!) काय म्हणतोय ते! आपला नम्र, -गामा पैलवान


rama ranade

Mon , 26 February 2018

"आपणच ‘श्रेष्ठ’ व इतर सारे ‘भुक्कड’ अशा गंडात वावरणार्‍या एका संपादकांनी", "‘लोकमान्य लोकशक्ती’ वगैरे म्हणणार्‍या दैनिकानं"- असे अप्रत्यक्ष उल्लेख करण्याची काय गरज भासते? आपण तर स्वघोषित विद्रोही आहात ना, मग म्हणा की, 'गिरीश कुबेर' आणि 'लोकसत्ता' असे. कुबेरांच्या लोकसत्तेमधे अडाणी आकलन असते, असे स्पष्ट म्हणायला तुम्हाला काय अडचण वाटते, कळत नाही. कुबेर यांनी केवळ दुर्गा भागवत आणि नरहर कुरुंदकर यांचे काही लेख वाचले असावेत आणि गोविंद तळवलकरांचे इंग्रजीतून अनुवादित केलेले काही अग्रलेख वाचले असावेत, असे त्यांच्या मांडणीवरून दिसते. खरे तर ते स्वतः अनेकदा इंग्रजी नियतकालिकांमधले लेख मराठीत अनुवादित करून स्वतःच्या शैलीत लिहितात, असे दिसते. असो. मराठी माध्यमांची हीच कुवत आहे. खरे सांगायचे तर पवारांचा लेख प्रामाणिक असेलही, परंतु तोही आकलनाची अपुरी पातळी राखणाराच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 'सूर्य-चंद्र' यांसंबंधीच्या लेखनावरची घिसीपिटी टीका करण्यात व्यर्थ लेखणी झिजवण्याला विद्रोही म्हणत असतील तर म्हणा बापडे.


Kotibhaskar J

Mon , 26 February 2018

महोदय, आपण दखल घेतली ना त्या नव्या-बोलबच्चन साहेबांची ...मग बास झालं ना ...महाराष्ट्रात १० कोटी लोक राहतात, ते रोज काही ना काही बोलतातच. आता त्या प्रत्येकाची दखल घ्यावयास आम्ही काही रिकामटेकडे नाही आहोत. तुम्हास भरपूर वेळ असल्यास घ्या तुम्ही सवडीने दखल...नाहीतर असे करा ...नाटकच लिहा ना तुम्ही दोघे ..." राजा तू चुकलास...." वगैरे नावाचे ! निदान काही आर्थिक कमाई तरी होईल...तसेच इतर काही मराठी हातांना रोजगारही मिळेल.....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......