टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रणब मुखर्जी, देवेंद्र फडणवीस, अनिल कुंबळे, अडाणी-अंबानी आणि उद्धव ठाकरे
  • Fri , 18 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अडाणी अंबानी Adani Ambani देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis प्रणब मुखर्जी Pranab Mukherjee

१. नोटबदलाबद्दल अडाणी-अंबानी यांना आधीपासून माहिती होतं : भाजप आमदाराचा आरोप

कुछ नयी बात करो… हे आम्हाला आधीपासून माहिती नसेल का? अहो, सगळी त्यांचीच दुकानं आहेत, तर तुमचं काही वेगळं असेल का? सगळ्या दुकानांत माल एकच, फक्त पाट्या वेगवेगळ्या!

...............

२. मॅच निर्विघ्न पार पडावी, यासाठी कुंबळेच्या उपस्थितीत पिचची पूजा; त्यात गैर काय, कोहलीचा सवाल

आता आयपीएलमध्ये तरी त्या चीअरगर्ल्सच्या शेजारी वेगळा प्लॅटफॉर्म उभारून त्यावर 'चीअरभटजी' बसवा आणि दोन्ही टीम्सच्या वतीने जोरदार होमहवन चालूद्यात. एखादा गडी बाद होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवायचे, मृत्युंजय मंत्राचा जाप करायचा. तेही वेगळ्या प्रकारचं लोकप्रिय मनोरंजन ठरेल. कोहली वगैरे मंडळींना कद नेसून पाठवा बॅटिंगला आणि रात्री जी टीम जिंकेल, तिने सत्यनारायणाची पूजा घालायची!

...............

३. ५० दिवस त्रास सहन करणं, हीच खरी देशभक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांच्या अनुभवानंतर आता एक दुरुस्ती करायला हरकत नाही… तुमच्या देशभक्तीच्या भंपक, सोयीस्कर आणि स्वस्त कल्पना सहन करणं, हे बँकांबाहेरच्या रांगेत उभे राहण्याच्या त्रासापेक्षा असह्य काम आहे… त्या सहन करत राहणं, हीच खरी देशभक्ती मानायला हवी.

...............

४. मोदी सरकारचा मोहम्मदी कारभार, १२५ कोटी जनतेला त्रास देणं हा राष्ट्रीय अपराध, जनतेच्या आक्रोशाचे लाउडस्पीकर होणारे बाळासाहेब हवे होते : उद्धव ठाकरे

अजूनही तेच हवे होते? तुम्ही कशाला आहात मग? तुम्हाला कशाला नेमून गेलेत ते? तुम्ही एकीकडे मोहम्मदाच्या डीजेवर नाच करणार आणि वर आमचा लाऊडस्पीकर हरपला, म्हणून रडूनही दाखवणार? यापेक्षा लाऊडस्पीकर हरपल्याबरोब्बर आपला ब्रास बँड बंद करून टाकायचा होता ना!

...............

५. नव्या निर्णयानुसार आता नागरिकांना लग्नकार्यासाठी बँक खात्यातून अडीच लाखांची रक्कम काढता येणार आहे.

भूक लागली? लग्न करा! घटस्फोटांसाठीही रक्कम काढण्याची तरतूद करून टाका लगेहाथ. म्हणजे विवाहित लोक घटस्फोट घेऊन परत लग्न करतील… देशासाठी लग्न करण्याची अशी सुवर्णसंधी परत मिळणार आहे का दुसरी?

...............

६. गेल्या वर्षी देशभरात केवळ एक लाख ३५ हजार रोजगारांची निर्मिती झाली. सात वर्षांतील हा नीचांक आहे. हे चित्र कायम राहिल्यास देश महासंकटाच्या खाईत जाईल : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

राष्ट्रपती महोदय, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरचे मजूर मोजले नसणार तुम्ही. त्यांना पगार मिळत नसला म्हणून काय झालं; हाताला काम तर आहे ना!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......