टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पंतप्रधान मोदी, करण जोहर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
  • Tue , 15 November 2016
  • विनोदनामा Vinodnama मोदी Modi करण जोहर Karan Johar डोनाल्ड ट्रम्प Donald Trump Humour

१. काँग्रेसने त्यांच्या वकुबानुसार चार आणे बंद केले, आम्ही आमच्या क्षमतेनुसार पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काका, काँग्रेसने बंद केलेले चार आणे आठ दिवसांनी गुलाबी बनून बाहेर आले नाहीत. ते कायमचे बंद झाले. तुम्ही नोटा कायमच्या रद्द केल्या नाहीत, फक्त चलनबदल केलाय. दोन्हीत फरक असतोय. शिवाय दोन हजाराची नोट वाढलीच की हो!

..........

२. आज गरीब शांतीने झोपत असून श्रीमंत झोपेच्या गोळ्या खात आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्या अर्थव्यवस्थेत गरिबाला अर्धपोटी अवस्थेत शांतीने झोपण्यापलीकडे तसाही काही पर्याय नव्हता, त्यात चलनबदलाचा संबंध काय? आता तर बिचाऱ्यांकडे झोपेच्या गोळ्या सोडा, जहरही खायला पैसे नाहीत. यात कौतुकानं सांगण्यासारखं काही नाही.

..........

३. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर नव्यानं निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्षाला केवळ एका डॉलरचं मानधन घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

‘इस एक डॉलर की कीमत तुम क्या जानो ट्रम्प बाबू?’ असं अमेरिकन नागरिक धास्तावून म्हणत असतील. ट्रम्प यांनी जास्तीत जास्त सुट्या घ्याव्यात, यासाठी देशभर आंदोलनं झाली, तरी आश्चर्य वाटायला नको!

..........

४. ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांनी अमेरिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीत माझा विजय होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे : डोनाल्ड ट्रम्प

लाखो अमेरिकन ही दोन्ही माध्यमं सोडून पळ काढू लागले असतील आणि एव्हाना अघोषित बहिष्कार घातला असेल त्यांनी स्वयंस्फूर्तीनं.

..........

५. ‘सैराट’चे हक्क करण जोहरने घेतल्याची चर्चा

एक असते आर्ची, ती एका श्रीमंत उद्योगपतीची इंग्लंडच्या पॉश कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी असते… परश्या हा भारतातल्या एका गरीब मच्छिमाराचा (फक्त तीन एकराचा बंगला, दोनशे ट्रॉलर आणि तीन हेलिकॉप्टर एवढंच असतं त्यांच्याकडे) मुलगा असतो… त्याची बंद पडलेली फरारी आर्ची किक मारून सुरू करून देते… दोघे इंटरव्हलनंतर अमेरिकेला पळून जातात… एक गरीब भारतीय स्त्री (तिचा फक्त दीडशे एकरांचाच रँच असतो आणि तिच्याकडे फक्त तीन हजारच घोडे असतात) त्यांना आसरा देते… परशा घोड्याला खरारा करण्याची नोकरी करतो… आर्ची कोकाकोलाच्या बाटल्या विसळण्यापासून सुरुवात करते आणि नंतर बाटलीबॉय कंपनीची अध्यक्ष बनते… शेवटी आर्चीचा भाऊ प्रिन्स मॅनहॅटनमधल्या तिच्या अपार्टमेंटवर हेलिकॉप्टरमधून उतरतो, इथपर्यंतचा स्क्रीनप्ले लिहून तयारही आहे म्हणे…

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......