टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पंतप्रधान मोदी, करण जोहर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
  • Tue , 15 November 2016
  • विनोदनामा Vinodnama मोदी Modi करण जोहर Karan Johar डोनाल्ड ट्रम्प Donald Trump Humour

१. काँग्रेसने त्यांच्या वकुबानुसार चार आणे बंद केले, आम्ही आमच्या क्षमतेनुसार पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काका, काँग्रेसने बंद केलेले चार आणे आठ दिवसांनी गुलाबी बनून बाहेर आले नाहीत. ते कायमचे बंद झाले. तुम्ही नोटा कायमच्या रद्द केल्या नाहीत, फक्त चलनबदल केलाय. दोन्हीत फरक असतोय. शिवाय दोन हजाराची नोट वाढलीच की हो!

..........

२. आज गरीब शांतीने झोपत असून श्रीमंत झोपेच्या गोळ्या खात आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्या अर्थव्यवस्थेत गरिबाला अर्धपोटी अवस्थेत शांतीने झोपण्यापलीकडे तसाही काही पर्याय नव्हता, त्यात चलनबदलाचा संबंध काय? आता तर बिचाऱ्यांकडे झोपेच्या गोळ्या सोडा, जहरही खायला पैसे नाहीत. यात कौतुकानं सांगण्यासारखं काही नाही.

..........

३. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर नव्यानं निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्षाला केवळ एका डॉलरचं मानधन घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

‘इस एक डॉलर की कीमत तुम क्या जानो ट्रम्प बाबू?’ असं अमेरिकन नागरिक धास्तावून म्हणत असतील. ट्रम्प यांनी जास्तीत जास्त सुट्या घ्याव्यात, यासाठी देशभर आंदोलनं झाली, तरी आश्चर्य वाटायला नको!

..........

४. ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांनी अमेरिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीत माझा विजय होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे : डोनाल्ड ट्रम्प

लाखो अमेरिकन ही दोन्ही माध्यमं सोडून पळ काढू लागले असतील आणि एव्हाना अघोषित बहिष्कार घातला असेल त्यांनी स्वयंस्फूर्तीनं.

..........

५. ‘सैराट’चे हक्क करण जोहरने घेतल्याची चर्चा

एक असते आर्ची, ती एका श्रीमंत उद्योगपतीची इंग्लंडच्या पॉश कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी असते… परश्या हा भारतातल्या एका गरीब मच्छिमाराचा (फक्त तीन एकराचा बंगला, दोनशे ट्रॉलर आणि तीन हेलिकॉप्टर एवढंच असतं त्यांच्याकडे) मुलगा असतो… त्याची बंद पडलेली फरारी आर्ची किक मारून सुरू करून देते… दोघे इंटरव्हलनंतर अमेरिकेला पळून जातात… एक गरीब भारतीय स्त्री (तिचा फक्त दीडशे एकरांचाच रँच असतो आणि तिच्याकडे फक्त तीन हजारच घोडे असतात) त्यांना आसरा देते… परशा घोड्याला खरारा करण्याची नोकरी करतो… आर्ची कोकाकोलाच्या बाटल्या विसळण्यापासून सुरुवात करते आणि नंतर बाटलीबॉय कंपनीची अध्यक्ष बनते… शेवटी आर्चीचा भाऊ प्रिन्स मॅनहॅटनमधल्या तिच्या अपार्टमेंटवर हेलिकॉप्टरमधून उतरतो, इथपर्यंतचा स्क्रीनप्ले लिहून तयारही आहे म्हणे…

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......