टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दै. महाराष्ट्र टाइम्समधील ५ डिसेंबर २०१७ची बातमी
  • Tue , 05 December 2017
  • विनोदनामाा टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi

१. आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्यासोबत कधीही कॅश बाळगत नाहीत. तसंच त्यांनी आयुष्यात कधी कार्डचा देखील वापर केलेला नाही. स्वत: मुकेश अंबानी यांनीच एका कार्यक्रमात हे सांगितलं की, आपण बालपणापासून ते आतापर्यंत कधीही कॅश किंवा कार्ड सोबत ठेवलेलं नाही. कारण म्हणजे आपल्याला कधीही क्रेडिट कार्ड किंवा पैशांची गरजच भासली नाही. माझ्यावर कुठे खर्च करण्याची वेळ आली, तेव्हा माझ्यासोबत कुणी ना कुणी असायचंच. माझ्यासाठी तेच पेमेंट करत असत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे महिन्याभरापूर्वी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ‘फोर्ब्स’द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या रियल टाइम बिलिनियर्सच्या यादीत ४२.१ अरब डॉलर्स इतक्या संपतीसह अंबानी यांनी चीनच्या हुइ का यान यांना मागे सारत हे स्थान मिळवलं आहे.

अंबानी यांच्यासाठी वेळोवेळी खर्च करणाऱ्या मंडळींचा पगार किती आहे, हे त्यांना कुणी विचारलेलं दिसत नाही. हे अपरिग्रहाचं व्रत करणाऱ्या मंडळींसारखंच झालं. तेही खिशातून एकही पैसा खर्च करत नाहीत. तो खर्च करण्यासाठी सोबत पगारी नोकर नेमलेले असतात. अंबानींकडेही त्यांच्या ऐपतीमुळे असं चालतं-बोलतं पाकीट आहे, एवढाच याचा अर्थ.

.............................................................................................................................................

२. आजचे कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार असतात. सध्या बॉलिवुडचं भाजी मार्केट झालं आहे, अशी टीका अभिनेते धर्मेंद्र यांनी केली आहे. भाजी मार्केटमध्ये जशी भाज्यांची खरेदी-विक्री होते, त्याचप्रमाणे आजचे कलाकार पैशांसाठी कुठेही नाचतात, कुठेही गातात. भाज्यांप्रमाणे ते अगदी स्वत:ला विकायलाही तयार होतात,’ असं ते म्हणाले. आमच्या वेळी मात्र परिस्थिती अशी नव्हती. आमच्या काळी कलाकार पैशासाठी नव्हे, तर आवड म्हणून काम करत. आता चित्रपटसृष्टीत दिखाऊपणाच जास्त चालतो,’ असं ते म्हणाले.

मान्यवर धर्मेंद्र हे आजच्या काळातल्या परिस्थितीबद्दल जे काही बोलतात, ते खरं असेलही; पण, त्यांच्या काळात ते फक्त आवड म्हणूनच काम करत होते, ही अतिशयोक्ती झाली. ‘पर डे’ नावाची, दिवसाला लाखभर रुपयांहून अधिक मेहनताना घेऊन करायची रोजंदारी मुख्य नायकांमध्ये रुजू करणाऱ्यांत त्यांचा समावेश होतो. कोणत्याही सिनेमात असलो तरी ठरीव क्रुद्ध चेहरा करून ‘कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊँगा’ हा एकच डायलॉग आपण डोळे वटारून ओरडत होतो, ते कलेची सेवा म्हणून, असं ते सांगतायत का?

.............................................................................................................................................

३. विदर्भातील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन सरकारविरोधात निषेध आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी अकोला इथं अटक केली. या प्रकरणी सिन्हा यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास खासदार वरुण गांधी, भाजपचे जेष्ठ नेते अरुण शौरी, खासदार शत्रुघ्न सिन्हा हेदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मुख्य मागणीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचंही खासदार नाना पटोले यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री या आंदोलकांशी बोलायला तयार झाले असते, तर तीच खरं तर बातमी होऊ शकली असती, ते बोलणार नाहीत, हे उघडच आहे. मात्र, ही भाजपच्या असंतुष्टांची मांदियाळी एकदम एकत्र एकाच आंदोलनात उतरली आहे, ती समारंभपूर्वक युवराजांच्या राज्याभिषेकाची खास भेट म्हणून प्रतिपक्षाला जाऊन मिळायच्या तयारीत आहे की काय? की हे आतूनच लढणार?

.............................................................................................................................................

निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ, देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291

.............................................................................................................................................

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स ५२ टक्क्यांनी वाढले असल्याचं समोर आलं आहे. #YearOnTwitter2017च्या अहवालात जाहीर करण्यात आलेल्या विश्लेषणातून ही माहिती उघड झाली आहे. जागतिक स्तरावर थेट व सामूहिक संवादासाठीच्या या व्यासपीठावर ४ डिसेंबरपर्यंतचे सर्वाधिक रिट्विट्स केलेले ट्विट्स, घडामोडी, ट्रेंड्स, विविध हॅशटॅग तसेच सर्वाधिक ट्विट्समध्ये वापरात आलेले ट्विटर हँडल यांची माह‌िती जाहीर करण्यात आली. त्यानुसार मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे ट्विटरवाले मोठे मजेशीर आहेत. आधी ही आकडेवारी जाहीर करून टीआरपी खेचतात. नंतर कोणाचे किती फॉलोअर बोगस आहेत, हे सांगून डबल टीआरपी खेचतात. ट्विटरवर कमी फॉलोअर असूनही राहुल गांधींच्या रिट्वीट्सची संख्या आणि प्रभाव जास्त आहे, ही बातमी गेल्या आठवड्यात आली होती. त्यानंतर ही बातमी येणं अपेक्षित होतंच. आता फुगा फुगवला आहेच, तो ट्विटरवाले फोडतात कधी ते पाहायचं.

​​​​​​​.............................................................................................................................................

५. दिल्लीतील वायू प्रदूषणानं किती धोकादायक पातळी गाठली आहे, याचा प्रत्यय रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामनादरम्यान आला. तिसऱ्या दिवशी उपहारानंतरचा खेळ सुरू झाल्यानंतर श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू गमागे प्रदूषणामुळे त्रास जाणवू लागला. त्याला गोलंदाजी करताना धाप लागत होती. यादरम्यान श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी तोंडावर मास्क घातले. मात्र, लाहिरू गमागेला सातत्यानं त्रास होऊ लागल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल यानं पंचांकडे खेळ थांबवण्याची मागणी केली.

श्रीलंकेच्या खेळाडूंना खरोखरच त्रास होऊ लागला की, त्यांनी डावपेचांचा एक भाग म्हणून किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की करण्याची संधी म्हणून हा प्रकार केला, हे सांगणं कठीण आहे. मात्र, तोंडावर मास्क घातलेले खेळाडू हे आपल्या देशाला लाज आणणारं चित्र आहे. सामन्याचा निकाल काहीही लागो, देशाच्या राजधानीची अशी अब्रू निघेल, याचा विचार न करता तिथं सामना ठेवणाऱ्यांनी नकळत एक मोठी हार आपल्या पदरात आधीच घातली आहे.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......