टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पंतप्रधान मोदी, अरुण जेटली, अमित शहा, राहुल गांधी आणि मीठ खरेदी करणारे भारतीय
  • Mon , 14 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao Humour विनोदनामा

१. पाचशे-हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने काळाबाजार करणारे, करचोरी करणारे आणि भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवलेल्यांना त्रास होणारच. पण तुम्ही (राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंह यादव) त्यास का विरोध करत आहात,  तुम्ही काळ्या पैशाच्या बाजूने आहात की विरोधात, दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या विरोधात आहात की बाजूने, याबाबत तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा : अमित शाह

अमितुद्दीन मियाँ, जो नोटाबदलीचा टीकाकार तो काळ्या पैशाचा पुरस्कर्ता, ही आयडिया जो सरकारच्या विरोधात, तो देशद्रोही याइतकीच भंपक आहे. या तुघलकी पद्धतीने अंमलात आलेल्या निर्णयाच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ने काळा पैसावाल्यांच्या आधी देशातली हातावर पोट असणारी सामान्य जनता घायाळ झाली आहे. तिच्या वेदनेवर फुंकर घालता येत नसेल, तर मीठ तरी नका चोळू.

..........

२. देशभरात आता मीठटंचाईची अफवा, १४-१५ रुपये किलोचं मीठ दोनशे ते चारशे रुपये किलोनं विकत घेण्यासाठी गर्दी

या अफवा पसरवून मीठ विकणारे जुन्या चलनात नोटा स्वीकारत असतील काय? म्हणजे पाचशेची जुनी नोट तीसेक रुपयांत खिशात घालण्याचीच आयडिया. तिचं नव्या चलनात रूपांतर करायला आणखी दीड महिना आहेच. अहा रे काळ्या पैशांवरचा स्ट्राइक.

..........

३. राहुल गांधींनीही रांगेत उभं राहून नोटा बदलून घेतल्या, स्टंटबाजी केल्याची भाजपची टीका

यावर, म्हणजे ही स्टंटबाजी असल्यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय, कारण, एकाही भाजप नेत्याने ती का बरं केली नाही? पंतप्रधान मोदी जपानहून परत येऊन दोन हजाराच्या नोटेसोबत सेल्फी कधी काढतायत, याची वाट पाहत असणार. त्यांच्याआधी सेल्फी काढला तर फाऊल धरत असतील ना पक्षात?

..........

४. नोटांच्या आकारानुसार तांत्रिक बदल करावे लागणार असल्याने एटीएम पूर्ववत व्हायला आणखी दोन ते तीन आठवडे लागतील : अर्थमंत्री अरुण जेटली

म्हणजे आणखी तीन आठवडे बँकांपुढे रांगा, मनुष्यतासांचा चुराडा, व्यापारात खोट, देशाच्या उलाढालीला ब्रेक. नोटा बदलण्यासाठी नव्या नोटा छापण्याची आणि जुन्या नष्ट करण्याची किंमत वेगळीच. या सगळ्याच्या टोटलइतका तरी काळा पैसा बाहेर येईल का या उपद्व्यापातून?

..........

५. काळ्या पैशावर ३० डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळापैसेवाले हसत असतील गालातल्या गालात. त्यांनी सगळी परम्युटेशन-कॉम्बिनेशन करून बांधबंदिस्ती करून टाकली असणार. आता ही बातमी वाचल्यावर धडकी भरणार ती हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना, नोकरदारांना आणि शेतकऱ्यांना. दिवाळीतला बाण कधीकधी उलटी बाटली कलंडून वेडावाकडा शिरतो वस्तीत, तसला प्रकार झाला हा!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......