टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नित्यानंद राय
  • Tue , 21 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya नित्यानंद राय Nityanand Rai आधार Aadhaar मानुषी छिल्लर Manushi Chhillar शशी थरूर Shashi Tharoor विश्व हिंदू परिषद Vishwa Hindu Parishad सुरेंद्र जैन Surendra Jain

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील खासदार नित्यानंद राय यांनी केलं आहे. असंख्य अडथळे पार करून मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा व्यक्तींकडे बोट दाखवणाऱ्यांविरोधात आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी भाजप समर्थकांना केलं आहे. उजियारपूरमधून लोकसभेत निवडून गेलेले नित्यानंद राय म्हणाले की, मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे आपण सर्वांनी मिळून हात तोडले पाहिजेत किंवा थेट कापले पाहिजेत.

घ्या आता, आणखी किती अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवं आहे या देशातल्या पुरोगाम्यांना? इथे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या चमचेगिरीमध्ये तिसऱ्या माणसाचे हात तोडण्याची भाषा करतो, त्याला कोणी अडवत नाही. एका प्रदर्शित न झालेल्या सिनेमात एका काल्पनिक व्यक्तिरेखेची बदनामी झालीच आहे, असं एकतर्फी ठरवून टाकून लोकांची डोकी छाटण्याचे, नाक कापण्याचे फतवे निघतात, त्याला सत्ताधारी समर्थन देतात, हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा परमोच्च आविष्कार नाही का? की एखाद्याचा हात, डोकं, नाक खरोखरच कापलं गेल्याशिवाय अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास बसणार नाही या पुरोगाम्यांचा?

.............................................................................................................................................

२. २१० सरकारी वेबसाइट्सवरून आधार कार्डांचा डेटा सार्वजनिक झाल्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्य केलं आहे. विशेष म्हणजे या २१० वेबसाईट केंद्र आणि राज्य सरकारच्या किंवा त्यांच्याशीच संबंधित आहेत. त्यांच्याद्वारे आधारधारकांचं नाव, पत्ता, शहर यांसारख्या गोष्टींची माहिती लीक झाली आहे. माहितीच्या अधिकारात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आधार कार्डामधील माहिती किती सुरक्षित राहू शकते, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या बँक खाते, मोबाईल नंबर किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड ही महत्त्वाची ओळख ठरली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणं सक्तीचं झालं आहे. अशात ही घटना घडल्यानं आधार कार्डवर असलेल्या माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आधार कार्डासाठी दिलेली माहिती सुरक्षित नाही, हे समजून घ्यायला माहिती अधिकार कशाला वापरायला हवा? पानटपरीसारखी गचाळ आधार सेवा केंद्रं, ती चालवणाऱ्या मंडळींचे झोलर व्यवहार, आधार कार्डासाठी आकारली जाणारी अव्वाच्या सव्वा रक्कम आणि आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेतला भोंगळपणा पाहता आपली माहिती, अगदी बायोमेट्रिक ठशापासून सगळं काही, जग मुठीत घ्यायला निघालेल्या महत्त्वाकांक्षी कंपन्यांकडे ‘सुरक्षित’ पोहोचत असेल, यात शंका नाही. म्हणूनच तर सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं असतानाही बँका आणि मोबाइल कंपन्या आधार लिंकिंगचे बेकायदा संदेश पाठवून लोकांना घाबरवून सोडतायत.

.............................................................................................................................................

३. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या नावाची ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. शनिवारीच मानुषीनं ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. मात्र शशी थरूर यांनी मानुषीच्या आडनावाची खिल्ली उडवली. छिल्लर हे आडनाव त्यांनी नोटाबंदीशी जोडलं. ‘मोदी सरकारनं आमच्या काळात सुरू असलेलं चलन बंद केलं. ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आमच्या काळात असलेली चिल्लरही आता मिस वर्ल्ड झाली,’ या आशयाचं ट्विट शशी थरूर यांनी केलं.

मिस वर्ल्ड किंवा अन्य सौंदर्यस्पर्धांच्या बाबतीत कोणाचंही काहीही मत असलं तरी त्यासाठी तयारी करणाऱ्या स्पर्धक अनेक प्रकारची तयारी करत असतात, मेहनत घेत असतात. मिस वर्ल्डचा किताब देशाला आणि त्या सुंदरीला अनेक नव्या क्षेत्रांची कवाडं उघडून देत असतो. थरूर यांच्या पक्षाच्या राजवटीच्या काळातच या स्पर्धांचा भारतातला दबदबा वाढलेला आहे. अशा वेळी आधीच गुलछबू आणि गुलहौशी अशी प्रतिमा असलेल्या थरूर यांनी इतकी थिल्लर प्रतिक्रिया देऊन चिल्लर पुढाऱ्यांशी बरोबरी करून दाखवण्याची गरज नव्हती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

४. लव्ह-जिहाद देशाच्या सुरक्षेपुढचे सर्वांत मोठं संकट आहे, असं वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केलं आहे. पश्चिमेकडच्या देशात ‘लव्ह जिहाद’ला ‘रोमिओ जिहाद’ असं संबोधलं जातं. आपल्या देशात हा प्रकार वाढीला लागला आहे. लव्ह जिहादची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अनेक मुलींनी माध्यमांसमोर येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली आहे, असंही जैन यांनी स्पष्ट केलं. लव्ह जिहाद हे एक षडयंत्र आहे, वाममार्गाला गेलेल्या लोकांना यातून पैसा मिळतो असाही आरोप त्यांनी केला. देशात स्वतःला सेक्युलर मानणारा समाज लव्ह जिहादवर मूग गिळून गप्प आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका आध्यात्मिक परिषदेत लव्ह जिहादशी संबंधित काही पत्रकं वाटली गेली. हिंदू मुलींनी लव्ह जिहादच्या आहारी जाऊन त्यांचं आयुष्य पणाला लावू नये, अशा आशयाचा मजकूर या पत्रकांमध्ये होता. जे लोक शांतताप्रिय आहेत आणि गुण्यागोविंदानं राहतात, त्यांच्यासाठी लव्ह जिहाद हे संकट आहेच, मात्र यामुळे देशासमोरही मोठं संकट निर्माण झालं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जैन जागे झाले की कोणी कळवेल का? इतकी प्रत्ययकारी स्वप्नं त्यांना कशी पडतात, याचं संशोधन स्वदेशी वैज्ञानिकांनी करणं गरजेचं आहे. देशात लव्ह जिहाद म्हणण्यासारखी किती प्रकरणं घडली? दहशतवादी बनणारा मुसलमान मुलगा एक हिंदू मुलीशी लग्न करून नेमकं काय साध्य करतो? हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केलं की, डायरेक्ट देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचतो, असं सांगण्याला काही आकडेवारीचा आधार आहे का? एकदा या तथाकथित लव्ह जिहादला आळा घातला की, ही मंडळी आंतरजातीय विवाहांकडे वळतील आणि उच्चजातीच्या मुलींनी मागासवर्गीय मुलांबरोबर लग्न करणं हा जातीय जिहाद म्हणून सांगू लागतील.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......