टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मनोहर पर्रीकर, महेश शर्मा, उद्धव ठाकरे, राजनाथ सिंह आणि सीता आनंदम
  • Sat , 12 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. अण्वस्त्राचा प्रथम वापर न करण्याचं भारताचं धोरण आहे. पण, वेळ पडली तर भारतही प्रथम अण्वस्त्र वापरू शकतो : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

संरक्षणमंत्र्यांचं हे मत व्यक्तिगत आहे, संरक्षणखात्याचं हे मत नाही, असं स्पष्टीकरण त्या खात्याने दिलं आहे. आपल्याच खात्याकडून टपली खायची हौस तरी किती पर्रीकरांना! संरक्षण मुख्यालय नागपूरला हललेलं नाहीये नाना.

..........

२. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत, तर अमेरिकी जनता त्यांच्या ५६ इंच छातीचे माप काढेल : शिवसेनेचा चिमटा

कुठूनही जाता जाता मोदी आणि भाजप यांचा मुखभंग करण्याची उबळ काही शिवसेना रोखू शकत नाही. पण, ट्रम्पतात्यांनी हा सल्ला मनावर घ्यायचं काही कारण नाही. शिवसेनेने मुंबईचा एवढा सत्यानाश केल्यानंतरही भूमिपुत्रवादाची भूल चढलेली भयभीत जनता इमानेइतबारे निवडून देतेच की शिवसेनेला.

..........

३. भारतात पतीकडून पत्नीवर बलात्कार, ही संकल्पनाच अस्तित्वात नाही; कारण लग्न हे पवित्र बंधन आहे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या सचिव सीता आनंदम यांचं मत

काकू, परस्परआदरावर आणि समानतेच्या तत्त्वावर उभ्या असलेल्या या नात्यात जेव्हा एकतर्फी सुखाची जबरदस्ती होते, तेव्हाच या पवित्र बंधनाचं पावित्र्य नष्ट होतं आणि कायद्याच्या भाषेत त्याला बलात्कार म्हणतात. आणि हो, आपल्याकडे लग्न अजूनही कायदेशीर करारच आहे, बरं का!

..........

४. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा न स्वीकारणाऱ्या रुग्णालयांत केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या कैलाश रूग्णालयाचाही समावेश.

‘दिव्याखाली अंधार आणि लोका सांगे ब्रम्हज्ञान’ यांसारख्या म्हणी अजरामर ठेवण्यात महेश शर्मांसारख्या महानुभावांचा मोठा वाटा आहे. अर्थात निर्लज्जाच्या बुडावर घातला पाला, गार लागतंय, अजून घाला, ही म्हणही तेच जिवंत ठेवतील, यात शंका नाही.

..........

५. ट्रम्प यांनी अमेरिकेत असं सांगितलं की मी अमेरिकेचा राष्ट्रपती बनलो, तर अमेरिकेत श्री. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांनुसार काम करीन, त्यामुळेच ट्रम्प यांना विजय मिळाला : उत्तर प्रदेशातल्या सभेत राजनाथ सिंह

काही तांत्रिक अडचणी नसत्या आणि मोदी निवडणुकीला उभे राहू शकले असते, तर ते भारतात राहूनही निव्वळ थ्री डी प्रोजेक्शनच्या साह्याने अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूकही जिंकू शकले असते आणि त्यांनी व्हाइट हाऊसमधून चीन आणि रशिया यांचाही कारभार हाकला असता, यात मुळातच कुणाला काही संशय नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......