टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • डोनाल्ड ट्रम्प, शरद पवार, हुकूमसिंग आणि राज ठाकरे
  • Thu , 10 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प

रिपब्लिकन बुशने केलेल्या युद्धखोरीमुळे झालेल्या कर्जाचा डोंगर उपसायला ओबामांना करआकारणी करायला लागली. त्याला वैतागून धाकले बुश परवडले, असं म्हणायला लावणारा आढ्यताखोर, बाईलवेडा, वर्णद्वेष्टा, तोंडाळ आणि शुद्ध आचरट ट्रम्प अमेरिकन जनतेने निवडून दिला आहे… श्रीमंतांचे चोचले थांबवा म्हणून त्यांनी एका अब्जाधीशाला निवडून दिलं आहे… एकंदर काय, तर तिकडेही बागों में बहार है!!!

......

२. भोपाळमधल्या सिमी अतिरेक्यांच्या बराकीत काजू, बदाम, किसमिस, पेंडखजूर आणि अन्न शिजवण्यासाठी भांडी व शेगडीही सापडली…

भिजत घातलेले बासमती तांदूळ, नुकत्याच कापलेल्या बकऱ्याचं मटण आणि दुधात भिजवलेलं केशर सापडलं नाही का? अरेरे, मग बिर्याणी कसे करून खात होते ते? की पार्सल मागवत होते?

......

३. पाचशे, हजारच्या नोटा रद्द केल्यावर आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आपट्याची पानं वाटणार आहे का? : मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा खोचक सवाल

बरोबरच आहे ही काळजी? दोन्ही चुलत पक्षांना ती अडचण नाही… तिथं कोणी कोणाला काही देत नाहीत… फक्त घेण्याचीच सवय… देऊन देऊन देतात काय, तर निवडणुकीच्याआधी टार्गेट ठरवून जाहीरपणे खोपच्यात घेऊन देतात, तेवढंच… तेही कार्यकर्तेच देतात!

......

४. उत्तर प्रदेशातल्या कैरानामधून हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असताना त्यांची बाजू घेतल्याबद्दल सेक्युलरांनी मला जातीयवादी ठरवलं तरी बेहत्तर : भाजप नेते हुकूमसिंग

अहो, पण म्हणजे तुम्ही कपाळावर पट्टीच चिकटवून घेतलेली असताना कोणी तुम्हाला वेगळं काही कसं म्हणेल? तुम्हाला जातीयवादी म्हणण्यासाठी कारण कशाला हवं कसलं?

......

५. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून स्वागत

काल रात्रीपासून त्यांच्यावर आणि बारामतीवर जे विनोद होतायत, त्यांनी ते खळखळून हसल्याचं बातमीत का लिहिलेलं नाही? काळा पैसा कमावणारे तो नोटांच्या स्वरूपात साठवून ठेवतात, अशी बाळबोध आर्थिक समज असलेल्या देशात आपण राहतो आहोत, याचं त्यांना किती बरं वाटलं असेल.

६. एसटीच्या निवडक मार्गांवर एसटीने करार केलेल्या हॉटेलांत प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, इडली, वडापाव, मेदूवडा यातला एक नाश्‍ता आणि एक चहा फक्त तीस रुपयांत मिळणार

बातमी चांगलीच आहे. फक्त ही हॉटेलं टाळून चालक-वाहकांची सगळीच 'सोय' फुकटात करणाऱ्या हॉटेलांपुढे एसटी नेण्याच्या प्रकारांना आळा कसा घालणार? शिवाय तीस रुपयांत द्यायचंय म्हणून नैवेद्याच्या वाटीत शिरा, पोहे आणि मरतुकडे वडे खपवले जाणार नाहीत, हे कोण पाहणार?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......