टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मुंबईतील ट्रम्पपूजा, जेएनयू, पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि सुभाषचंद्र गोयल
  • Tue , 08 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात पिस्तुल आणि काडतुसं सापडली.

हिंदी सिनेमांमध्ये खूप वेळा पाहिलेली गोष्ट आहे ही… आता जेएनयूमध्ये लवकरच रॉकेट लाँचर, मिग २१ विमानं आणि दोन-चार अण्वस्त्रधारी पाणबुड्याही सापडतील!

...

२. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय व्हावा म्हणून मुंबईत होमहवन.

ट्रम्पच्या मुलाने तिकडे आरती केली, इकडे होमहवन! लवकरच व्हाइट हाऊसमध्ये सत्यनारायणाची पूजा होण्याचा योग दिसतोय. अब की बार, ट्रम्प सरकार!

...

३. केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ या प्रचारमोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर खुद्द नरेंद्र मोदी; त्यांच्या विदेशवाऱ्यांच्या ध्वनिचित्रफिती वापरणार...

नेमकी गडबड काय आहे? ही अतुल्य भारताची जाहिरात मोहीम आहे ना? मग तो सोडून पंतप्रधान वारंवार परदेशांत जातात, असं चित्रण का दाखवणार आहेत जाहिरातींमध्ये? त्यांनी देशांतर्गत पर्यटन काय कमी केलंय का?

...

४. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपद स्वीकारावं, काँग्रेस कार्यकारिणीची गळ

ते मागे कोण बरं म्हणतंय की, रोज रोज मरने से एक ही बार आत्महत्या अच्छी!!

...

५. एनडीटीव्हीवर एक दिवसाची नाही, कायमची बंदी हवी; झी टीव्हीवर यूपीएने बंदी घातली होती, तेव्हा कुठे होते बंदीविरोधक विचारवंत‌? : झीसम्राट सुभाषचंद्र

खासदारकी बोलू लागली. यूपीएच्या काळात घडलेल्या त्या प्रकरणाची पाठराखण कशी झाली असती झीचंद्रसाहेब? त्यात खुद्द आपण आणि आपले वरिष्ठ संपादक यांच्यावर उद्योगसमूहाकडून १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याचे आरोप होते. तुरुंगवाऱ्याही घडल्या होत्या. तुमचाही चॅनेल टीव्हीवरच दिसतो आणि त्यांचाही टीव्हीवरच दिसतो, यापलीकडे काही साम्य आहे का तुमच्यात?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......