टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मुंबईतील ट्रम्पपूजा, जेएनयू, पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि सुभाषचंद्र गोयल
  • Tue , 08 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात पिस्तुल आणि काडतुसं सापडली.

हिंदी सिनेमांमध्ये खूप वेळा पाहिलेली गोष्ट आहे ही… आता जेएनयूमध्ये लवकरच रॉकेट लाँचर, मिग २१ विमानं आणि दोन-चार अण्वस्त्रधारी पाणबुड्याही सापडतील!

...

२. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय व्हावा म्हणून मुंबईत होमहवन.

ट्रम्पच्या मुलाने तिकडे आरती केली, इकडे होमहवन! लवकरच व्हाइट हाऊसमध्ये सत्यनारायणाची पूजा होण्याचा योग दिसतोय. अब की बार, ट्रम्प सरकार!

...

३. केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ या प्रचारमोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर खुद्द नरेंद्र मोदी; त्यांच्या विदेशवाऱ्यांच्या ध्वनिचित्रफिती वापरणार...

नेमकी गडबड काय आहे? ही अतुल्य भारताची जाहिरात मोहीम आहे ना? मग तो सोडून पंतप्रधान वारंवार परदेशांत जातात, असं चित्रण का दाखवणार आहेत जाहिरातींमध्ये? त्यांनी देशांतर्गत पर्यटन काय कमी केलंय का?

...

४. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपद स्वीकारावं, काँग्रेस कार्यकारिणीची गळ

ते मागे कोण बरं म्हणतंय की, रोज रोज मरने से एक ही बार आत्महत्या अच्छी!!

...

५. एनडीटीव्हीवर एक दिवसाची नाही, कायमची बंदी हवी; झी टीव्हीवर यूपीएने बंदी घातली होती, तेव्हा कुठे होते बंदीविरोधक विचारवंत‌? : झीसम्राट सुभाषचंद्र

खासदारकी बोलू लागली. यूपीएच्या काळात घडलेल्या त्या प्रकरणाची पाठराखण कशी झाली असती झीचंद्रसाहेब? त्यात खुद्द आपण आणि आपले वरिष्ठ संपादक यांच्यावर उद्योगसमूहाकडून १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याचे आरोप होते. तुरुंगवाऱ्याही घडल्या होत्या. तुमचाही चॅनेल टीव्हीवरच दिसतो आणि त्यांचाही टीव्हीवरच दिसतो, यापलीकडे काही साम्य आहे का तुमच्यात?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......