टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ट्रम्प पितापुत्र, केअर वर्ल्ड, तटकरे काका-पुतणे, अमित शहा आणि न्यूज टाइम आसाम
  • Mon , 07 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. एनडीटीव्ही इंडियाबरोबर आणखी दोन वाहिन्यांवर एकेक दिवसाची बंदी

अहाहा, केवढा हा निष्पक्षपातीपणा! पण जो बूँद से गयी, वो हौद से नहीं आती आणि एका बंदीने दुसरी बंदी समर्थनीय ठरत नाही. दुसरी एखादी ट्रिक शोधा राव!

......................................

२. काका सुनील तटकरे यांच्यावर नाराज पुतणे संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश

हिंदी फिल्मी डायलॉगच मारायचा, तर ‘जो सगे भतीजे के नहीं हो सके वो किसी और के भतीजे के क्या होंगे?’ अहो संदीपभौ, तुमचा पत्ता चुकला काय? नाराज पुतण्या पक्ष तर वेगळाच आहे.

......................................

३. दिल्लीला प्रदूषणाचा भयंकर विळखा, शाळांना तीन दिवसांची सुटी, कारखान्यांवरही पाच दिवसांची उत्पादनबंदी

त्यापेक्षा राजधानीतल्या सर्वपक्षीय राजकारण्यांना सक्तीने आपापल्या गावी पाठवून दिलं, तर वैचारिक, भावनिक, बौद्धिक आणि ध्वनिप्रदूषणात प्रचंड घट होईल आणि प्रदूषित पर्यावरणातही दिल्लीकरांचं जगणं अधिक सुसह्य होईल, नाही का?

...................................

४. उत्तर प्रदेशाच्या मतदारांनो, सपा आणि बसपला खूप संधी दिलीत, आता भाजपला द्या. भाजपमध्ये गुंड नाहीत : अमित शाह

किमान हे भाषण करायला तरी वेगळ्या कुणाला पाठवायचं होतं राव. आता सगळे फ्यॅ करून हसत असतील पोट धरधरून वेडपटासारखे!

......................................

५. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक याची फ्लोरिडामध्ये मंदिराला भेट, आरतीत सहभाग, भारतीयांची मतं वडलांकडे वळवण्याची धडपड

इतकी काही धडपड करायची गरज नाही एरिकभाऊ, आमच्या अनिवासी बांधवांनाही तोंडाळ, आक्रस्ताळे, द्वेष पसरवणारे नेते फार्फार आवडतात. तुम्ही फक्त रवीशला ‘रबिश’, सेक्युलरला ‘फेक्युलर’, लिबरलला ‘लिबटार्ड’, पुरोगामीला ‘फुरोगामी’, विचारवंतला ‘विचारजंत’ म्हणायला शिका. आमच्या मतांचा पाऊस पडेल तुमच्या पिताश्रींवर.

.........................

६. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी भारत-चीन यांच्यात देवाणघेवाण करण्याचा राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा बैठकीत निर्णय

पाकिस्तानबरोबर लष्करी सराव आणि भारताबरोबर नुसतेच ठराव? बहुत नाइन्साफी है...

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......