टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरविंद केजरीवाल, गौतम गंभीर, एनडीटीव्ही आणि अली जफर
  • Sat , 05 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

. करण जोहरच्या आगामी ‘डियर जिंदगी’मध्येही अली जफर हा पाकिस्तानी कलाकार; त्याची भूमिका कायम राहणार.

म्हणजे या सिनेमाच्याही जाहिरातीचं कंत्राट मनसेलाच मिळणार तर!

२. संवेदनशील कारवाईची दृश्ये दाखवल्याच्या नावाखाली एनडीटीव्हीवर केंद्र सरकारची ‘ब्लॅकआउट’ कारवाई

अरेरे, फक्त एकच दिवस? उद्यापासून त्या देशद्रोही, फेक्युलर, फुर्रोगाम्यांची देशविघातक बडबड पुन्हा सुरू होणार? छ्या!! मोदी फारच मवाळैत बुवा! जरा पर्रीकरांकडून शिका म्हणावं काहीतरी.

३. भाजपवाले ना हिंदूंचे आहेत ना मुस्लिमांचे; ते आपल्या बापाचेही होऊ शकत नाहीत. त्यांना फक्त मतं मिळवायची आहेत : केजरीवालांची असभ्य टीका

केजरीवाल भाऊ, स्वपाय स्वमुखात घालण्याचा (फूट इन माउथ) रोग जडवून घेऊ नका… आता तुम्ही किती सडेतोड युक्तिवादाचा मुद्दा मांडलाय, हे कोणी पाहणारच नाही, सगळे ‘बाप’च डोक्यावर घेऊन नाचणार. फुकट गेला ना बार!!

४. लंडनचा तरुण चिंचपोकळीच्या गणपती मंडळाचे टी शर्ट घालून जगप्रदक्षिणा करणार

अरेरे, इतकी जबरदस्त बातमी थोडी उशिराने आली… पत्रकारितेतले सर्वोच्च पुरस्कार नुकतेच देऊन झाले… पुढच्या वर्षी चान्स पक्का आहे पण. आता हा तरुण सायकलवरून जिथे जाईल तिथे लोक त्याची वास्तपुस्त करण्याआधी त्याचं टी शर्ट पाहून त्याचीच विचारणा करणार – ‘कुठून घेतलं? कुणी दिलं?’ आपल्याकडच्या मंडळाची ख्याती जगभर पसरणार… वाजवा रे वाजवा!

५.वायूप्रदूषणाने श्वास कोंडलेल्या दिल्लीत दिवाळीत वाजलेल्या फटाक्यांवर क्रिकेटपटू गौतम गंभीरची जोरदार टीका; दिल्लीकरांचे कान उपटले.

बा गौतमा, क्रिकेटपटू आहेस ना तू? तरी इतकी सेन्सिबल आणि जनमानसाच्या विरोधात जाणारी भूमिका कशी घेतोस? घरचे, दारचे, आसपासचे सगळे लोक फुप्फुसं फुटून किंवा कान किटून मेले, तरी हरकत नाही, पण फटाके वाजवणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते फार महान धार्मिक कृत्यही आहे. आता चीनमध्ये जन्मलेले फटाके दिव्यांच्या सणात कुठून घुसले, असे देशद्रोही प्रश्न विचारू नकोस. पुढच्या सीझनमध्ये हिरव्या जर्सीत खेळायचंय का?

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......