टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरविंद केजरीवाल, गौतम गंभीर, एनडीटीव्ही आणि अली जफर
  • Sat , 05 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

. करण जोहरच्या आगामी ‘डियर जिंदगी’मध्येही अली जफर हा पाकिस्तानी कलाकार; त्याची भूमिका कायम राहणार.

म्हणजे या सिनेमाच्याही जाहिरातीचं कंत्राट मनसेलाच मिळणार तर!

२. संवेदनशील कारवाईची दृश्ये दाखवल्याच्या नावाखाली एनडीटीव्हीवर केंद्र सरकारची ‘ब्लॅकआउट’ कारवाई

अरेरे, फक्त एकच दिवस? उद्यापासून त्या देशद्रोही, फेक्युलर, फुर्रोगाम्यांची देशविघातक बडबड पुन्हा सुरू होणार? छ्या!! मोदी फारच मवाळैत बुवा! जरा पर्रीकरांकडून शिका म्हणावं काहीतरी.

३. भाजपवाले ना हिंदूंचे आहेत ना मुस्लिमांचे; ते आपल्या बापाचेही होऊ शकत नाहीत. त्यांना फक्त मतं मिळवायची आहेत : केजरीवालांची असभ्य टीका

केजरीवाल भाऊ, स्वपाय स्वमुखात घालण्याचा (फूट इन माउथ) रोग जडवून घेऊ नका… आता तुम्ही किती सडेतोड युक्तिवादाचा मुद्दा मांडलाय, हे कोणी पाहणारच नाही, सगळे ‘बाप’च डोक्यावर घेऊन नाचणार. फुकट गेला ना बार!!

४. लंडनचा तरुण चिंचपोकळीच्या गणपती मंडळाचे टी शर्ट घालून जगप्रदक्षिणा करणार

अरेरे, इतकी जबरदस्त बातमी थोडी उशिराने आली… पत्रकारितेतले सर्वोच्च पुरस्कार नुकतेच देऊन झाले… पुढच्या वर्षी चान्स पक्का आहे पण. आता हा तरुण सायकलवरून जिथे जाईल तिथे लोक त्याची वास्तपुस्त करण्याआधी त्याचं टी शर्ट पाहून त्याचीच विचारणा करणार – ‘कुठून घेतलं? कुणी दिलं?’ आपल्याकडच्या मंडळाची ख्याती जगभर पसरणार… वाजवा रे वाजवा!

५.वायूप्रदूषणाने श्वास कोंडलेल्या दिल्लीत दिवाळीत वाजलेल्या फटाक्यांवर क्रिकेटपटू गौतम गंभीरची जोरदार टीका; दिल्लीकरांचे कान उपटले.

बा गौतमा, क्रिकेटपटू आहेस ना तू? तरी इतकी सेन्सिबल आणि जनमानसाच्या विरोधात जाणारी भूमिका कशी घेतोस? घरचे, दारचे, आसपासचे सगळे लोक फुप्फुसं फुटून किंवा कान किटून मेले, तरी हरकत नाही, पण फटाके वाजवणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते फार महान धार्मिक कृत्यही आहे. आता चीनमध्ये जन्मलेले फटाके दिव्यांच्या सणात कुठून घुसले, असे देशद्रोही प्रश्न विचारू नकोस. पुढच्या सीझनमध्ये हिरव्या जर्सीत खेळायचंय का?

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......