टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रामचंद्र गुहा, झहीर खान, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, मनोहर पर्रीकर, डोनाल्ड ट्रम्प आणि रॉजर फेडरर
  • Wed , 19 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रामचंद्र गुहा Ramchandra Guha झहीर खान Zaheer Khan राहुल द्रविड Rahul Dravid विरेंद्र सेहवाग Virender Sehwag मनोहर पर्रीकर Manohar Parrikar डोनाल्ड ट्रम्प Donald Trump रॉजर फेडरर Roger Federer

१. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या 'क्रिकेट प्रशासक समिती'चे माजी सदस्य रामचंद्र गुहा पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. राहुल द्रविड व झहीर खान यांची सल्लागारपदी नियुक्ती रोखण्यात आल्याचं गुहा यांचं म्हणणं आहे. ही नियुक्ती रोखणं म्हणजे राहुल द्रविड व झहीर यांचा एक प्रकारे 'सार्वजनिक अपमान' असल्याचं गुहा यांना वाटतंय. गुहा यांनी एका ट्विटद्वारे आपली ही नाराजी जाहीर केली आहे. यापूर्वी अनिल कुंबळेसोबत असा व्यवहार केला गेला, त्यानंतर आता झहीर खान आणि राहुल द्रविड यांचा अपमान करण्यात आला आला, असं गुहा यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे म्हटलंय. कुंबळे, द्रविड आणि झहीर हे क्रिकटचे दूत आहेत असंही गुहांनी पुढं म्हटलंय.

आयपीएल सामन्यातल्या फिक्स्ड चेंडूच्या पूर्वनिश्चित परिणामावरही अनभिज्ञपणे टाळ्या पिटणाऱ्या सर्वसामान्य क्रिकेटरसिकांप्रमाणेच गुहा वागतायत, हे मनोज्ञ आहे. ते स्वयंप्रज्ञ इतिहासकार आणि लेखक असले, तरी क्रिकेटच्या बाबतीत खेळाडूंना दैवतं वगैरे मानून विस्फारल्या डोळ्यांनी पाहण्याची त्यांची वृत्ती दिसते. ज्या खेळाडूंच्या अपमानानं गुहा व्यथित झाले आहेत, त्यांच्यातल्या एकानेही त्याबद्दल तोंड उघडलेलं नाही. क्रिकेटचा खेळ फिक्सिंगनं पोखरून काढला, तेव्हा यांची सगळी दैवतं खेळत होती, समालोचन करत होती; त्यांनी चकार शब्द काढला नाही. त्यांना सवय आहे हो असल्या अपमानांची. ते सहन केल्यावर मिळणारे लाभ महत्त्वाचे वाटतात त्यांना. आपल्याला अडचण काय?

.............................................................................................................................................

२. ब्रिटनमध्ये आपलं जंगी स्वागत होईल, अशी हमी जोवर दिली जात नाही तोपर्यंत ब्रिटनचा अधिकृत दौरा करणार नाही, असा अजब निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांना एका प्रकारे जंगी स्वागताचा आदेशच दिला आहे.

तात्या, तुमच्या दौऱ्याच्या वेळी अमेरिकेच्या नागरिकांनी ब्रिटनचा प्रवास करून तिथं तुमच्यावर अंडी आणि टमाटे फेकले नाहीत, तरी तेच पुष्कळ, अशी परिस्थिती आहे. जंगी स्वागताचे आग्रह कसले धरता? तुमच्या दिव्य कारकीर्दीनं ब्रिटिशांचे डोळे दिपले असतील, अशी तुमची समजूत आहे का? तुम्ही आपल्या वेडसर चाळ्यांनी अख्ख्या अमेरिकेचे आणि निम्म्या जगाचे डोळे पांढरे केले आहेत!

.............................................................................................................................................

३. गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करू, असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं आहे. ते मंगळवारी गोवा विधानसभेत बोलत होते. गेल्या काही महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये गोहत्याबंदीचा कायदा लागू करण्यात आला होता. केंद्र सरकारसह देशातील सर्वच राज्यांमध्ये भाजपने गोवंश हत्याबंदीचा पुरस्कार केला आहे. मात्र गोवा सरकारने सुरुवातीपासूनच केंद्र सरकार आणि भाजपच्या गोमांसाविषयीच्या भूमिकेच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी गोव्यातील नागरिकांना आश्वस्त केलं.

मान्यवर पर्रीकर आता कोणत्या राज्यातून गोमांस आणणार आहेत? त्यांच्याच पक्षानं बहुतेक राज्यांमध्ये गोहत्याबंदी केली आहे. ईशान्य भारत, गोवा आणि केरळ यांच्यात एखादा गोमांस कॉरिडॉर तयार करावा लागेल आणि गोगुंडांपासून या वाहनांना संरक्षण द्यायला लागेल. नितीन गडकरींना सांगितलं तर ते हवेतल्या हवेत चौपदरी गोमांस हायवे उभारूनही देतील. राज्योराज्यीचे गोगुंड आता पर्रीकरांना कधी जाहीर चोप द्यायला जातात, ते पाहायला हवं.

.............................................................................................................................................

४. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल नाक्यावरच्या रांगेत तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागलं, तर टोल भरावा लागत नाही, असा सरकारी नियम असल्याचं स्पष्ट झालं आहे. टोलनाक्यांच्या माध्यमातून वाहनमालकांना भरपूर लुटून झाल्यानंतर हा नियम पुढे आला आहे. अॅड. हरिओम जिंदाल यांनी गेल्या वर्षी जुलै २०१६ मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. या अर्जाला प्राधिकरणाने २९ ऑगस्ट २०१६ रोजी पाठवलेल्या उत्तरात ही बाब समोर आली आहे.

त्यामुळेच की काय, आता दहिसरच्या टोलनाक्यांच्या मागे काही अंतरापलीकडे वाहतूक काही तास रेंगाळलेली असताना टोलनाक्यांवर मात्र गर्दी नसते. पिवळ्या रेषेपलीकडे वाहनं जाताच कामा नयेत, असं नियमन करून सगळ्यांकडून टोल वसूल केला जातोच. खरं तर अनेक रस्त्यांची अवस्था आणि वाहतूक कोंडी पाहता टोलनाक्यांवर पेट्रोल-डिझेलचे पंप बसवून कोंडीच्या वेळी भरपाई म्हणून काही लिटर इंधन भरून दिलं पाहिजे गाड्यांमध्ये.

.............................................................................................................................................

५. भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर आणि सध्याचा ट्विटर सेलिब्रिटी वीरेंद्र सेहवाग याने महान टेनिसपटू रॉजर फेडरर याला गायीबद्दल कसा जिव्हाळा आहे, याचे फोटो टाकले आहेत. नुकतीच आठव्यांदा विम्बल्डनला गवसणी घालणाऱ्या फेडररचे तीन फोटो सेहवागने ट्विटमध्ये पोस्ट केले आहेत आणि गाय दोहणाऱ्या 'महान रॉजर फेडररचं गोप्रेम पाहून आनंद झाला', असं म्हटलं आहे.

फेडररला गाय पवित्र वाटते, अशी सेहवागने गोड गैरसमजूत करून घेतलेली दिसते. वयाच्या १४व्या वर्षापर्यंत शाकाहारी असलेला फेडरर नंतर मिश्राहारी बनला, हे त्याला माहिती नसणार. त्यामुळे गोमांसाचा समावेश असलेल्या सुप्रसिद्ध स्विस स्टेकबद्दलही त्याला काही कल्पना असायची शक्यता नाही. फेडरर ज्या गायीचं दूध काढतोय, ती देशी गाय नाही, आपल्या गोरक्षकांना जिच्याबद्दल शून्य जिव्हाळा आहे, अशी ती परदेशी गाय आहे. शिवाय, गायीला कापून खाण्याइतकंच तिचं, तिच्या वासरांसाठी असलेलं दूध, वासरांना उपाशी ठेवून चोरणंही हिंस्त्रच आहे, त्याचं काय?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......