दहा चित्रपट, दहा क्लायमॅक्स
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
आशुतोष जरंडीकर
  • लेखातील दहा सिनेमांची पोस्टर्स
  • Sun , 11 December 2016
  • हिंदी सिनेमा बॉलिवुड Bollywood हॉलिवुड Hollywood क्लायमॅक्स Climax

आपण एखाद्या नवीन चित्रपटाबद्दल कुणाशी बोलायला लागलो, तर समोरची व्यक्ती एक-दोन प्रश्नानंतर  आपसूकच ‘चित्रपटाचा शेवट कसा आहे?’ याकडे वळते. त्याला चित्रपटाच्या कथेपेक्षा त्याच्या शेवटाचं जास्त आकर्षण असतं. एखादं पुस्तक वाचताना जसं शेवटाचं कुतूहल वाटायला लागतं, अगदी तसंच! शेवट खरोखरच इतका महत्त्वाचा असतो का? तर हो, नक्कीच!!

‘चित्रपट कसा असावा?’ असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर मी विचार करून असं काहीसं उत्तर देईन...‘चित्रपटाची सुरुवात प्रॉमिसिंग हवी, त्याचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असावा आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स (शेवट) हा 'लक्षात राहणारा'!’ आजकालचे बरेच चित्रपट सुरुवात प्रॉमिसिंग करतात, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतात, पण नंतर मात्र त्या अपेक्षांना ते फारसे पात्र ठरत नाहीत. काहींची पटकथा फसते, तर काहींचा शेवट.

चित्रपटाचा क्लायमॅक्स फार महत्त्वाचा, म्हणजे त्याचा प्रवास कमी महत्त्वाचा नाही, असं नाही. पण तरीही प्रेक्षकांच्या मनावर ठळक अशी छाप पाडण्याच्या कामात ‘क्लायमॅक्स’ महत्त्वाची भूमिका बजावतो. बॉलिवुडमध्ये सहसा गोड शेवटाची प्रथा आहे. वास्तवाला दूर, कोसावर ठेवून पटकथा लिहायची आणि मग अपेक्षित असा अगदी गोड, बेचव शेवट करून दिवसेंदिवस चालू असलेल्या प्रथेनुसार सोपस्कार उरकून टाकायचे, असं आपल्या लेखक-दिग्दर्शक द्वयींचं काम असतं.

हॉलिवुडमध्ये मात्र अशी काही प्रथा नाही. ते आपापल्या पद्धतीने वेगळेपण दाखवत असतात. पण या प्रथा नसलेल्या पद्धतींमध्येच एक प्रमुख पायंडा पडला...'ट्विस्टेड एण्डिंग चित्रपटांचा. हिचकॉकच्या 'सायको'नं ही वेगळीच, पण सुखावणारी प्रथा सुरू केली. चित्रपटाचं कथानक एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवायचं आणि प्रेक्षकांच्या सर्व कल्पनाशक्तीला मधोमध छेद देत, त्यांना बुचकळ्यात पाडणारं असं काहीतरी पडद्यावर पेश करायचं की, तो अवाकच झाला पाहिजे. ‘सायको’नंतर अशा यशस्वी प्रयत्नांमध्ये ‘द युज्वल सस्पेक्ट्स’, ‘फाईट क्लब’, ‘सिक्सथ सेन्स’, ‘द अदर्स’, ‘शटर आयलंड’ आणि अशी काही नावं हमखास घेता येतील. ‘मेमेंटो’, ‘रिझर्वायर डॉग्ज’, ‘इनसेप्शन’, ‘द डिपार्टेड’ अशा चित्रपटांनीदेखील क्लायमॅक्समध्ये वेगळे आणि उल्लेखनीय अनुभव दिले. त्यांचे काही पायंडे पडले नाहीत, हा वेगळा भाग झाला. आजसुद्धा काही संकेतस्थळांवर हॉलिवुड चित्रपटांच्या क्लायमॅक्सची चर्चा रंगताना दिसते. 

अशा चर्चेपासून हिंदी चित्रपटांचे क्लायमॅक्स मात्र नेहमीच वंचित राहत आले आहेत. हिंदीमध्येसुद्धा सर्व रीती-रिवाजाच्या चौकटी मोडून केलेले हटके क्लायमॅक्स आहेत! ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात. चित्रपटाचं नाव घेतलं की, लगेचच त्यातील शेवटची दृश्यं आपल्या डोळ्यासमोर हळुवार अथवा प्रखरपणे येऊन जातात. आपले डोळेसुद्धा वास्तवाची झळ बसल्याने अश्रूंनी पाणावतात अथवा आनंदाश्रूंनी सुखावतात.

… २१व्या शतकातील अशाच काही दहा 'पाथ-ब्रेकिंग' चित्रपटांच्या क्लायमॅक्सचा आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या कथानकाचा हा धावता आढावा...

तारे जमीन पर

२००७ मध्ये आलेला हा चित्रपट अजूनही रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून आहे. आमीर खान आणि अमोल गुप्ते यांच्या या चित्रपटानं एका गहन विषयाला हात घातला आणि तो अगदी लीलया पेललाही. 'Every Child is Special' हा संदेश पोहोचवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला. 

या चित्रपटाचा क्लायमॅक्स अविस्मरणीय आहे. रहिवासी शाळेतील कला विषयाचे निकुंभ सर (आमीर खान) शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करतात. हॉस्टेलमधून पहाटेच बाहेर पडलेला ईशान अवस्थी (दर्शिल सफारी) स्पर्धेला काहीसा उशिरा पोहोचतो. पण मग जेव्हा तो हातात कुंचला घेतो, तेव्हा अदभुत कलाकृती कागदावर उमटते. पहाटे पाहिलेलं तळ्याकाठचं रम्य चित्र असं काही रंगतं की बस्स! दुसरीकडे निकुंभ सर स्वतः ईशानचं तैलचित्र काढत असतात. ईशान जेव्हा निकुंभ सरांनी काढलेलं चित्र पाहतो तेव्हाच्या त्याच्या आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या वेळी तो विजेता 'विद्यार्थी' आहे, हे ऐकल्यानंतरच्या निकुंभ सरांच्या चेहऱ्यावरचे भाव, डोळे शांतपणे मिटून आठवत राहावेत असेच आहेत!

वार्षिक परीक्षा संपल्यावर ईशानचे पालक त्याला न्यायला येतात. गाडीत बसताना तो निकुंभ सरांकडे धाव घेतो आणि ते त्याला हवेत झेपावतात… आणि मग पार्श्वसंगीत सुरू होतं...

तू धूप है, झम से बिखर

तू है नदी.. ओ बेख़बर
बह चल कहीं, उड़ चल कहीं
दिल खुश जहाँ… 

तेरी तो मंज़िल है वहीं…

जिंदगी ना मिलेगी दोबारा

नाव वाचल्यावरचं किती छान वाटतं! चित्रपटसुद्धा तसाच सहज-सुंदर. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे तीन मित्रांची गोष्ट. हे तीन भिन्न स्वभावांचे बालमित्र बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटतात. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातील समस्या, काम आणि भूतकाळ यांना पुरता कंटाळला आहे. म्हणून ते सुट्टीसाठी स्पेनला जाण्याचा प्लॅन करतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात भन्नाट असं एकदा तरी करायचंच आहे, ते करण्याची ही शेवटची संधी म्हणून प्रत्येक जण आपापला साहसी खेळ निवडतो. कबीर (अभय) आणि अर्जुन (हृतिक) अनुक्रमे स्कुबा डायव्हिंग व स्काय डायव्हिंग निवडतात, तर इम्रान (फरहान) बुल रन नावाचा सर्वांत साहसी (भयानक) खेळ निवडतो. प्रत्येक जण या खेळामधून आपण जिवंत राहिलो, तर एकमेकांना दिलेलं वचन पूर्ण करणार असं ठरवतो. आणि मग तोपर्यंत संपलेल्या सर्व समस्या, नवीन खुललेलं प्रेम आणि प्रवासातील व आयुष्यातील खूप सारं थ्रिल साथीला घेऊन धाव घेतात. इम्रानची जगण्याची नवी व्याख्या सांगणारी कविता कानी पडते...

दिलों  में  तुम  अपनी  बेताबियाँ  लेके  चल  रहे  हो

तोह  जिंदा  हो  तुम
नज़र  में  ख़्वाबों  की  बिजलियाँ  लेके  चल  रहे  हो
तोह  जिंदा  हो  तुम
हवा  के  झोंकों  के  जैसे  आजाद  रहना  सीखो
तुम  एक  दरिया  के  जैसे  लहरों  में  बहना  सीखो

हर  एक  लम्हे  से  तुम  मिलो  खोले  अपनी  बाहें

हर  एक  पल  इक  नया  समां देखें  यह  निगाहें

जो  अपनी  आँखों  में  हैरानियाँ  लेके  चल  रहे  हो
तोह  जिंदा  हो  तुम

दिलों  में  तुम  अपनी  बेताबियाँ  लेके  चल  रहे  हो

तोह  जिंदा  हो  तुम

कहानी

या चित्रपटाबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर... ‘बाप ऑफ थ्रिलर’! सुजोय घोषच्या लेखणी आणि कॅमेऱ्यातून उतरलेलं अदभुत रसायन आणि त्याला तितक्याच ताकदीची मिळालेली विद्या बालनची साथ. शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी, कमालीच्या ताकदीची पटकथा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ट्विस्टेड एंडिंग आणि सर्वोत्कृष्ट क्लायमॅक्स.

नवऱ्याच्या शोधात असणाऱ्या प्रेग्नन्ट बिद्या बागचीचा शोध शेवटाकडे येतो. मिलन दामजी आणि अर्णब बागची यातील गुंता व त्यातील थरार टिकवण्यात दिग्दर्शकाला कमालीचं यश येतं. त्या रहस्याचा उलगडा कसा होणार, याचा अंदाज सरसावून बसलेला प्रेक्षक मनामध्ये बांधत असतो… पण त्याला मधोमध छेद देत, एक वेगळीच कहानी सुजोय मांडतो आणि प्रेक्षक अवाक होऊन जातो.

कोलकात्यातील दुर्गापूजेचं उत्सवी वातावरण आणि त्या साऱ्या गर्दीत उलगडणारं सत्य! बिद्या आणि मिलनच्या शोधात असणारे सत्योकी व खान हे पोलीस, मिलन दामजीचं तिथं येणं, प्रेग्नन्ट बिद्याच्या उदरावर मिलन दामजीने त्वेषानं लाथ मारणं, त्यानंतर होणारा बिद्याचा अविश्वसनीय प्रतिकार, तिचं ते कृत्रिम पोट, हेअर क्लिप, तिचे खऱ्या अर्थानं भेदक असणारे डोळे आणि त्यानंतर बिद्याने मिलन दामजीवर झाडलेल्या गोळ्या... आणि त्यानंतर होणारा रहस्याचा उलगडा… दुर्गामातेचं होणारं विसर्जन आणि अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं ‘एकला चलो रे…’ ही कविता…

जोदी तोर डाक सुने केउ ना आसे

तोबे एकला चलो रे

तोबे एकला चलो, एकला चलो,

एकला चलो, एकला चलो रे...

(जर कोणी तुझ्याशी बोलत नसेल, 

त्या दिशेकडे पाहून, भयभीत होऊन जर ते पाठ फिरवत असेल तर हे माझ्या दुर्दैवी मित्रा...

तू त्या मार्गावरून एकट्याने चालण्याचे सामर्थ्य दाखव. जो काही मनातील कोलाहल आहे त्याच्याशी तू स्वतः संवाद साध.)

जोदी केउ कोथा ना कोए

ओरे… ओ ओभागा

केउ कोथा न कोए …

जोदी सोबाई थाके मुख फिराए

सोबाई कोरे भोई

तोबे पोरान खुले …

ओ तुई मुख फूटे तोर मोनेर कोथा

एकला बोलो रे...

(जेव्हा गडद ढगांनी, निरभ्र आकाश झाकोळले असेल.

जेव्हा सत्याने असत्याला गिळंकृत केलं असेल.

जेव्हा हे सारं जग भयभीत होऊन, शस्त्रे म्यान करून बसले असेल...

तेव्हा तू आशेची अशी ज्योत हो, जी स्वतः तेवत राहून सभोवतालचा संपूर्ण अंधःकार नाहीसा करेल.)

रंग दे बसंती

२००६ मध्ये आलेला हा सर्वांगसुंदर चित्रपट. समाजाच्या भिन्न स्तरातून आलेले, व्यसनाधीन झालेले, मस्तीमध्ये आयुष्य जगणारे आपल्या पिढीचे खुशालचेंडू तरुण आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आझाद अशा क्रांतिकारकांच्या खळबळजनक आयुष्याचा हा प्रवास. 

या मित्रांच्या टोळीमध्ये असणाऱ्या एकमेव सभ्य आणि इंडियन एअरफोर्समध्ये असणाऱ्या अजय राठोडचा अपघात होतो आणि या मित्रांचं चैनीखोर आयुष्य रातोरात बदलतं. या अपघाताचे सूत्रधार असणारे भारतीय नेते आणि व्यवस्था यांच्या विरोधात या तरुणांनी दिलेला लढा म्हणजे हा चित्रपट. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आझाद यांच्या स्वातंत्र्यलढ्याला समांतर असा हा चित्रपट.

याचा क्लायमॅक्स भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम म्हणावा असा! अपघाताशी संबंधित भारतीय नेत्यांची हत्या केल्यानंतर हे सर्व तरुण मित्र कुठेही पळून न जाता एक रेडिओ सेंटर ताब्यात घेतात. आणि घडलेली घटना जाहीरपणे सांगून टाकतात. त्यानंतर पोलीस फोर्स त्या रेडिओ सेंटरला घेरतो आणि गोळीबार सुरू करतो. हा प्रसंग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या फाशीशी आणि आझाद यांच्यावर होणाऱ्या गोळीबाराशी असा काही जोडला गेला आहे की, तो पाहताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकले नाही तरच नवल. मृत्यूला बेधडक सामोरे जातानाचं त्यांचं हसू आपल्या डोळ्यात पाणी आणतं. नंतर त्यांच्या मैत्रिणीच्या कल्पनेमध्ये सर्व मित्र जमतात. त्या ठिकाणी लहानपणीचे भगतसिंग आपल्या वडिलांना ‘रोपांच्या बिया पेरण्याऐवजी बंदुकीच्या गोळ्या पेरा’ असं सांगतात. हे पाहून होणारं तरुण मित्रांचं स्मितहास्य आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची अविश्वसनीय ताकद देऊन जातं. चित्रपट पडद्यावर संपतो, पण हे गीत मनामध्ये रुंजी घालतं...

ए साला...

अभी अभी हुआ यकीन

की आग है मुझ में कही

हुई सुबहा में चल गया

सूरज को में निगल गया

रु-बा-रु रोशनी।

जो गुमशुदा सा ख्वाब था

वोह मिल गया

वोह खिल गया

वोह लोहा था, पिघल गया

किछा किछा मचल गया

सितार में बदल गया

रु-बा-रु रोशनी।

अगली 

अनुराग कश्यप हे हिंदी चित्रपटसृष्टीमधील घोंघावणारं वादळ. तो कधी कोणता विषय समोर घेऊन येईल आणि कोणत्या पद्धतीने मांडेल हे नेहमीच पाहण्यासारखं असतं. २०१४ च्या अगदी शेवटी शेवटी आलेल्या ‘अगली’ या त्याच्या चित्रपटानं फारसं यश मिळवलं नसलं, तरी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांना त्यानं प्रचंड अस्वस्थ केलं.

हरवलेल्या मुलीची तक्रार घेऊन तिचे सावत्र वडील पोलिसांकडे जातात. तिथून पुढे तिच्या शोधाच्या मागे लागलेले तिचे पोलीस अधिकारी (वडील), भ्रष्ट पोलीस यंत्रणा, पैशासाठी कोणत्याही थराला पोहोचणारी मानवी प्रवृत्ती, परिस्थितीनुसार बदलत जाणारी नाती, नात्यांमधील गुंतागुंत, भीषण गरिबी, आत्मसन्मानासाठीचे हेवेदावे या साऱ्यावर ‘अगली’ भाष्य करतो. मुलीच्या शोधाचा हा प्रवास नातेसंबंध, पैशांची अफरातफर आणि भ्रष्ट यंत्रणा यांचा बळी ठरतो. सभोवतालच्या समाजाचं अति गडद चित्र अगदी नकोसं वाटतं.  क्लायमॅक्सला जे काही सत्य समोर येतं, ते पाहून तर अस्वस्थतेचा कहर होतो. ती हरवलेली मुलगी एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अत्यंत वाईट अवस्थेमध्ये सापडते. काही वेळातच तिथं पाऊस येतो. पण हे जळजळीत वास्तव या पावसाच्या थेंबांनी शांत होणारं नसतं...

क्या वहाँ दिन है अभी भी 

पापा तुम रहते जहाँ हो 
औस बन के मैं गिरूंगी 
देखना तुम आसमाँ हो 
टीम के टूटे कनस्तर से ज़रा बूंदी चुराकर 
भागती है कोई लड़की 
क्या तुम्हें अब भी चिढ़कर 
फर्श अब भी थाम उंगली 
साथ चलता है क्यों पापा?
भाग के देखो रे आगन 

भी मचलता है क्या पापा?

अ वेन्सडे

भारतीय चित्रपटसृष्टीतील गेलं दशक ज्या काही मोजक्या चित्रपटांनी ओळखलं गेलं, त्यात नीरज पांडेच्या ‘अ वेन्सडे’चं नाव अग्रक्रमी येईल. अतिशय बंदिस्त पटकथा, प्रचंड वेग, संवाद, अनुपम खेर-नसिरुद्दीन शाह यांचा अभिनय आणि अनपेक्षित क्लायमॅक्स, यामुळे हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जातो. दहशतवादाला आणि रोजच्याच धकाधकीला कंटाळलेला 'स्टुपिड कॉमन मॅन' एकदम आर.डी.एक्स. घेऊन हजर होतो म्हटल्यावर काय! ट्रेन बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी असलेल्या अतिरेक्यांना मारल्यानंतर प्रेक्षकांना बसणारा धक्का आणि त्यानंतरचा स्टुपिड कॉमन मॅन (नसिरुद्दीन शाह) आणि प्रकाश राठोड (अनुपम खेर) यांच्यातील संवाद म्हणजे पर्वणीच! त्यानंतर जेव्हा प्रकाश राठोड स्टुपिड कॉमन मॅनला भेटतात, तेव्हाचा केवळ दोन ओळींचा संवाद, वास्तविकता, मानसिकता आणि दहशतवाद यावर असे काही ताशेरे ओढतो की, काय बोलावं!

प्रकाश राठोड : आय अॅम प्रकाश राठोड.

स्टुपिड कॉमन मॅन : आय एम...

(प्रकाश राठोड : उसने मुझे अपना नाम बताया। लेकीन में वो नाम किसीको बता नही सकता। इन्सान नाम मे मजहब ढुंढ लेता है। हम सब जानते थे, की आम आदमी परेशान है इन सब चिजोन्से। लेकीन एक आम आदमी, ए रास्ता भी ले सकता है, ए अंदाजा बिलकुल नहीं था। One Common Man had the Guts.)

मुंबई मेरी जान

२००६ मध्ये झालेल्या ट्रेन ब्लास्टवर अगदीच वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा हा चित्रपट. हा ट्रेन ब्लास्ट झाल्यानंतर समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चार-पाच व्यक्तींच्या आयुष्यात कोणते बदल होतात, याविषयीचा हा चित्रपट आहे. रुपाली जोशी (सोहा अली खान) ही एक न्यूज रिपोर्टर आहे. निखिल अग्रवाल (आर माधवन) हा रोज ट्रेनने प्रवास करणारा कर्मचारी आहे. सुरेश (के. के. मेनन) हा नोकरीसाठी झगडणारा इंजीनिअर आहे. सुनील कदम (विजय मौर्य) हा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा व या सर्व गोष्टी स्वीकारलेला तुकाराम (परेश रावल) हे दोघं पोलिसात असतात आणि थॉमस (इरफान) हा एक चहावाला असतो.

ट्रेन ब्लास्ट झाल्यानंतर प्रत्येक जण येणाऱ्या परिस्थितीला सामोरा जातो. प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य कमालीचं बदलून जातं. रुपाली जोशीला ती जिथं काम करते, त्याच मिडियाचं नवीनच चित्र दिसून येतं. निखिल अग्रवालला ट्रेनमध्ये असणारी नवीन माणसं आणि आजूबाजूचं विस्कळीत झालेलं जीवन कमालीचं अस्वस्थ करून जातं. सुरेशला दिसणाऱ्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीबद्दल संशय वाटू लागतो. हे सारे फक्त रफींचीच गाणी ऐकणार, इथपर्यंत तो येऊन पोहोचतो. सुनील कदम तर परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतो. थॉमस मात्र बदललेल्या परिस्थितीचा आणि लोकांच्या मनातील भीतीचा वेगळाच फायदा उठवतो.

या चित्रपटाचा क्लायमॅक्स म्हणजे एक धाडसी प्रयत्न आहे. आता सर्वांनीच परिस्थितीला स्वीकारलं आहे. सर्वांचे गैरसमज, तेढ दूर झाले आहेत. आपल्या चुकांची त्यांना जाणीव झाली आहे. मग शेवटी ब्लास्टमध्ये निधन झालेल्या प्रत्येकासाठी आदरांजली म्हणून सर्व मुंबई पाच मिनिटांसाठी स्तब्ध राहते आणि त्याला प्रतिसाद म्हणून चित्रपटगृहातील प्रत्येक प्रेक्षकसुद्धा आपोआप उभा राहतो… आणि किशोरदांचं हे गाणं कानावर पडतं...

ए दिल है मुश्किल जीना यहाँ

जरा हटके, जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान

ए दिल है...

कही बिल्डिंग, काही ट्रामे

कही मोटर, कही मिल,

मिलता हैं यहा सब कुछ

इक मिलता नही दिल

इन्सान का नही कही नाम-ओ-निशा

जरा हटके, जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान

ए दिल है...

आंखों देखी

रजत कपूरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट Absolute Gem आहे! आपल्या आजूबाजूचे सारं विश्व आभासी आहे, आपल्या डोळ्याला जे काही दिसेल ते आणि फक्त तेच खरं आहे, वास्तव आहे, असं मत असलेल्या बाऊजींचा (संजय मिश्रा) आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे हा चित्रपट. या चित्रपटाचं कथानक 'पाहण्यात' जो अनुभव आहे, तो सांगण्यात नाही. प्रत्येक शक्य असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधण्याचा ध्यास घेतलेले, जे काही आजूबाजूला घडत आहे, त्या सर्वांचा स्वतः अनुभव घ्यावा या ध्येयाने झपाटलेले बाऊजी सर्वच गोष्टी पडताळून बघतात. एक दिवस आपल्या पत्नीला घेऊन ते सुट्टीला जातात. रात्री अशाच गप्पा मारत असताना, आपण हवेमध्ये उडण्याचा अनुभव कुठे घेतला आहे, असा प्रश्न पत्नीने केला असता, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी बाऊजी भल्या पहाटे एका कड्यावर पोहोचतात…

कुछ अनुभव अभी बाकी है।

जो कि सिर्फ सपनों मे भोगे थे...

जैसे की ये सपना मुझे बार बार आता था

की में हवा मे तैर रहा हूं।

नही उड रहा हूं।

पंछी के जैसे...

असं म्हणून बाऊजी त्या कड्यावरून खोल दरीत उडी मारतात. ती त्यांची उडी जीवनाचं सार सांगून जाते. ती उडी म्हणजे नवीन बाळाचा जन्म. उडी मारल्यानंतर जो काही आक्रोश होतो, तो म्हणजे त्या बाळाचं पहिलं रडणं. तो आक्रोश थांबतो...

लेकीन ये सपना नही वास्तविकता है।

ये हवा जो मेरे चेहरे को चुम रही है...

ये सांय सांय की आवाज मेरी कानो मे...

यही यथार्थ है। सच है।

में वाकही गगन को चिरता चला जा रहा हूं

चिरता चला जा रहा हूं

जैसे मख्खन मे गरम छुरी।

आपल्या आयुष्यातील साऱ्या काही समस्या म्हणजे हवेचा प्रतिरोध. आपण अनुभवातून शिकत, समस्यांवर मात करत, छान आठवणी सोबत घेऊन मोठे होतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील समाधान म्हणजेच बाऊजींच्या चेहऱ्यावरील शेवटचं स्मित हास्य.

ए सपना नही

में उड रहा हूं...

में उड रहा हूं।

मदारी

निशिकांत कामतचा २०१६ मध्ये आलेला ‘मदारी’ भारतातील राजकारण, भ्रष्टाचार, पैशांचा गैरव्यवहार या पारंपरिक विषयांवर भाष्य करतो. निर्मल (इरफान) हा इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आपला मुलगा (सर्वस्व) गमावून बसलेला हतबल मनुष्य, गृहमंत्र्याच्या मुलालाच किडनॅप करतो. ही कल्पना चांगली असली तरी मध्ये मध्ये चित्रपट काहीसा संथ होतो किंवा नेहमीच्या मार्गावरून चालत राहतो. पण क्लायमॅक्समध्ये निशिकांत कामतमधील दिग्दर्शक असा काही उफाळून येतो की, चित्रपटातील सर्व चुका क्षम्य होतात. वेल क्राफ्टेड आणि हुशारीनं बनवलेला क्लायमॅक्स असं याचं वर्णन करता येईल.

सर्व जनतेच्या समोर आपल्या चुकांबद्दल माफी मागायची अशी अट घालूनच निर्मल गृहमंत्री, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि अपघाताशी संबंधित बिल्डर यांना भेटायचं ठरवतो. तेव्हा तो मुंबईमध्ये आल्याबरोबर निर्मलला मारून टाकायचे आदेश सर्व पोलिसांना मिळतात. होतंदेखील तसंच... निर्मल बसमधून गृहमंत्र्यांच्या मुलाला घेऊन खाली उतरतो आणि तेवढ्यात त्याच्यावर गोळीबार होतो. आणि हा संवाद ऐकू येतो...

बाझ चुजे पे झपटा... उठा ले गया।

कहानी सच्ची लगती है लेकीन अच्छी नही लगती।

या भयानक वास्तवाला दिग्दर्शक आपला स्वतःचा युक्तिवाद जोडतो. जे काही घडलं आहे ते सगळं मागे-मागे नेतो. निर्मल थेट त्या मुलाला घेऊन स्वतःच्या घरी पोहोचतो. तिथे प्रसारमाध्यमांच्या मदतीनं या भ्रष्ट लोकांकडून सर्व गोष्टी हुशारीने वदवून घेतो. हे कल्पनेतील वास्तव खऱ्या आयुष्यामध्ये का नाही, असा प्रश्न प्रेक्षकांपुढे ठेवतो.

बाज पे पलटवार हुआ।

कहानी सच्ची नही लगती, लेकीन खुदा कसम बहुत अच्छी लगती है।

एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी

नीरज पांडे या दिग्दर्शकाचा थ्रिलर ड्रामा हा हातखंडाच! ‘अ वेन्सडे’, ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’  या चित्रपटांतून ते सिद्ध झालेलंच आहे. आता असा दिग्दर्शक बायोपिक दिग्दर्शित करणार आणि तोही भारताच्या सर्वोत्तम क्रिकेट कर्णधारावर. सर्वांना प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा होती. या अपेक्षांना हा चित्रपट सर्वार्थाने पात्र झाला असं म्हणता येणार नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध लख्ख सोन्यासारखा, झळाळणारा आहे. उत्तरार्धामध्ये मात्र प्रेमकथेमध्ये अडकणारा चित्रपट काहीसा भ्रमनिरास करतो. पण क्लायमॅक्सला दिग्दर्शक चेंडू प्रेक्षकांच्या कोर्टमध्ये भिरकावतो... क्या बात है!

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द ऐनभरात असताना चित्रपटाचा शेवट कसा करणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न प्रेक्षकांच्या समोर होता. पण क्लायमॅक्सला चित्रपट अगदीचं अफलातून खेळी करतो आणि प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलते. २०१६ मध्ये आलेल्या या चित्रपटात '२०११ वर्ल्ड कप फायनल'च्या अविस्मरणीय आठवणी अशा काही जाग्या करतो की, ती पडद्यावर पाहण्याची मजा औरच! महेंद्रसिंग धोनी षटकार ठोकून प्रत्येक भारतीयाने उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करतो. रवी शास्त्रीची ही कमेंट्री त्याला चोख साथ देते...“Absolutely magnificent, Dhoni finishes off in his style, A magnificent stroke into the crowd ! India lift the world cup after 28 years. And it's the Indian Captain who's been absolutely magnificent in the night of the final.”

लेखक एमबीबीएस करत असून चित्रपट आस्वादक आहेत.

ashutosh.jarandikar@gmail.com

Post Comment

Kumar Thoke

Mon , 12 December 2016

खूप छान लेख आहे. अग्ली सिनेमाच्या शेवटी जे " पापा " हे गाणं येतं ते खरचं खूप अस्वस्थ करतं....


Bhagyashree Bhagwat

Sun , 11 December 2016

लेख फारच तपशीलवजा आहे. त्यामुळे संकल्पना चांगली असली, तरी वाचताना अजिबात मजा येत नाही. तसंच एकूण मांडणीही थोडी भावुक आणि अप्रगल्भ आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......