लाल श्याम शाह यांचा वारसा चालवण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारतासाठी आणि प्रेरणा मिळवण्यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे!
ग्रंथनामा - झलक
रामचंद्र गुहा
  • ‘लाल श्याम शाह’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 22 June 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक लाल श्याम शाह Lal Shyam Shah सुदीप ठाकूर Sudeep Thakur रामचंद्र गुहा Ramachandra Guha

“लाल श्याम शाह यांचे सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले चरित्र वाचून मला खूप आनंद झाला. हे पुस्तक वाचकांना कुशलतेने त्या काळाशी जोडते. प्रवाही निवेदन आणि सुबोध लेखन यांच्या साह्याने सुदीप ठाकूर आदिवासींच्या एका असाधारण नायकाची कहाणी या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम शाह यांना गोंडवाना प्रदेशात चांगल्या प्रकारे ओळखले जात होते. पण त्यांनी केलेले काम आणि त्यांनी घालून दिलेली उदाहरणे मात्र भारतभरात परिचित झाले पाहिजे. त्यामुळे त्यांचा आदर्श पूर्ण देशात सगळ्यांसमोर ठेवला जाऊ शकतो,” असे इतिहासकार, चरित्रकार, स्तंभलेखक रामचंद्र गुहा ज्या पुस्तकाबद्दल म्हणाले आहेत, त्याचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. मूळ पुस्तकाला गुहा यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

...............................................................................................................................................................

चरित्रलेखन हा आपल्या देशातील एक अविकसित साहित्यप्रकार आहे. आपण भारतीय लोक जिवंत असलेल्या माणसांचे गुणगान करतो. पण कुणा दिवंगत व्यक्तीच्या बाबतीत अधिकारवाणीने लिहिणे आपल्याला जमत नाही. अर्थात, आपल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांची चरित्रात्मक म्हणावीत अशी पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्यातील थोडीच पुस्तके विद्वत्ता आणि साहित्य या कसोट्यांवर उतरतात. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद व अन्य काही नायकांवर अशी पुस्तके लिहिली गेली आहेत. परंतु अशा अनेक उल्लेखनीय व्यक्ती आहेत, ज्यांना अखिल भारतीय पातळीवर ओळख प्राप्त झालेली नाही आणि त्यांच्या जीवनाच्या बाबतीत योग्य प्रकारे लिहिलेही गेलेले नाही. उदाहरणेच सांगायची तर ई.एम.एस. नंबूद्रीपाद, मास्टर तारासिंह, वाय.एस. परमार, ज्योती बसू, एन.टी. रामाराव आणि शेख अब्दुल्ला. वरील प्रत्येकाने अनुक्रमे केरळ, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांच्या इतिहासाला आकार देण्यासाठी गांभीर्याने योगदान दिले आहे. मात्र या मोठ्या व्यक्तींपैकी कुणाच्याही बाबतीत संशोधनपर किंवा अभ्यासपूर्ण लिहिले गेलेले चरित्र अद्याप उपलब्ध झालेले नाही.

ही कमतरता केवळ राजकीय किंवा सार्वजनिक जीवनापुरतीच मर्यादित नाही. आपला साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहासदेखील इतक्याच विपन्नावस्थेत आहे. उदाहरणार्थ बहुश्रुत शिवराम कारंथ, बांगला लेखिका व कार्यकर्त्या महाश्वेतादेवी, जागतिक स्तरावर ठसा उमटवणारे संगीतकार रविशंकर यांची चांगली चरित्रे वाचायला मला आवडतील, पण ती उपलब्ध नाहीत.

भारतातील उत्तम चरित्रलेखनाच्या अभावाबद्दल दु:ख व्यक्त केल्यानंतर, मला हेही सांगितले पाहिजे की, लाल श्याम शाह यांचे सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले चरित्र वाचून मला खूप आनंद झाला. हे पुस्तक वाचकांना कुशलतेने त्या काळाशी जोडते. प्रवाही निवेदन आणि सुबोध लेखन यांच्या साह्याने सुदीप ठाकूर आदिवासींच्या एका असाधारण नायकाची कहाणी या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम शाह यांना गोंडवाना प्रदेशात चांगल्या प्रकारे ओळखले जात होते. पण त्यांनी केलेले काम आणि त्यांनी घालून दिलेली उदाहरणे मात्र भारतभरात परिचित झाले पाहिजे. त्यामुळे त्यांचा आदर्श पूर्ण देशात सगळ्यांसमोर ठेवला जाऊ शकतो.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

आदिवासी हा भारतीय समाजातील सगळ्यात वंचित वर्ग आहे. त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती, ही मुसलमानांपेक्षा आणि दलितांपेक्षाही अधिक अनिश्चित आहे. आपल्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये ते अधिकच काठावर ढकलले गेलेले आहेत. जमीनदार घराण्यात जन्मलेले लाल श्याम शाह, स्वतः विलासी आणि आरामदायक जीवन जगू शकले असते. तरीही त्यांनी आपल्या समाजातील लोकांची सेवा करणे पसंत केले. आदिवासी सभेचे नेता या नात्याने त्यांनी, जमीन आणि जंगलावरील आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण केले. आदिवासींचा इतिहास आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी संघर्ष केला. मध्य भारतातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात दौरे केले. आदिवासी लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्यांचा खूप सन्मान करत होते.

लाल श्याम शाह यांनी दशकानुदशके ज्या विभिन्न चळवळी केल्या, त्याबाबत सुदीप ठाकूर या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका लढवल्या, त्याच्या हकिगतीही या पुस्तकात आहेत. काही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय प्राप्त केला होता, तर काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र निवडणुका जिंकल्यानंतरही त्यांनी सिद्धान्ताच्या आधारावर राजीनामे दिले हेही यात आले आहे. आदिवासींना संविधानाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारे अपयशी ठरली, हेच मुख्य कारण त्यामागे होते. निवडणुकीच्या राजकारणाव्यतिरिक्त ज्या आंदोलनांचे नेतृत्व शाह यांनी केले होते, त्यात नैसर्गिक संसाधनांवरील आदिवासींचे हक्क व अधिकार यावर त्यांनी जोर दिला होता. विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात जी आंदोलने झाली होती, त्यातही लाल श्याम शाह आघाडीवर होते. यासंदर्भात सुदीप ठाकूर यांनी बरीच तपशीलासह माहिती दिलेली आहे.

लाल श्याम शाह हे विचारवंत तर होतेच, पण कार्यकर्तादेखील होते. त्यांना आदिवासींच्या स्थितीबरोबरच कायदेशीर चौकटीचीही चांगली समज होती. ते नेहमीच (आणि हे खरेही आहे) असा युक्तिवाद करत असत की, एकीकडे संविधानाने देशाचे राष्ट्रपती व विविध राज्यांचे राज्यपाल यांना आदिवासींच्या अधिकारांचे संरक्षक बनवले आहे, तर दुसरीकडे या उच्च पदावर बसलेल्यांनी आपल्या जबाबदारीपासून तोंड फिरवून आदिवासींना अधिक शक्तिशाली आर्थिक वर्गाच्या दयेवर सोडून दिलेले आहे.

स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेल्या लाल श्याम शाह यांनी स्वतःला कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधून घेणे अविवेकपूर्ण मानले. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते, पण आयुष्यभर ते राजकीयदृष्ट्या सक्रीय राहिले. त्यामुळेच, १९७५ च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेस सरकारने त्यांना अटक केली होती आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवले होते. पण अशा घटनांमुळे ते घाबरले नाहीत आणि थांबलेही नाहीत. १९८०च्या दशकात (तेव्हा त्यांच्या वयाची साठी उलटलेली होती) ते ‘जंगल बचाओ, मानव बचाओ’ या आंदोलनात सक्रीय झाले. आणि जल, जंगल, जमीन यावरील आदिवासींच्या अधिकारासाठी लढा दिला. कारण स्थानिक अर्थव्यवस्थेचे हे तीन आधारस्तंभ आहेत. शिवाय, ही अशी तीन संसाधने आहेत, ज्यांची लूटमार बाहेरील माणसे सातत्याने करत असतात. मार्च १९८६मध्ये लाल श्याम शाह यांचे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते सक्रीय राहिले, लढत राहिले.

सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके आणि अहवाल यावर आधारित आहे. खूप सावधपणे केलेल्या संशोधनाबरोबरच खूप प्रेमाने लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एका असाधारण भारतीयाला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे. लाल श्याम शाह हे मध्य भारतातील आदिवासींचा आवाज होते, त्यांचा अंतरात्मा होते. ते सही करताना स्वत:च्या नावाच्या बरोबर ‘आदिवासी’ हा शब्दही लिहीत असत. ‘लाल श्याम शाह, आदिवासी’ असे ते गर्वाने आणि निर्भयतापूर्वक लिहीत असत. आपल्या लोकांविषयी, समाजाविषयी पूर्ण एकरूपता आणि बांधिलकी दाखवण्याचा तो एक मार्ग होता. आजच्या राजकीय नेत्यांच्या विपरीत त्यांचे वर्तन म्हणावे लागेल. कारण त्यांनी स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाच्या स्वभिमानासाठी संघर्ष केला.

लाल श्याम शाह यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटावे व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......