‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे
ग्रंथनामा - झलक
ज्ञानेश्वर मुळे
  • ‘भिंतीआडचा चीन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 15 December 2024
  • ग्रंथनामा झलक भिंतीआडचा चीन Bhintiaadacha Cheen श्रीराम कुंटे Shreeram Kunte

चीनमधल्या साम्राज्यशाहीच्या इतिहासापासून ते आजच्या उत्तुंग प्रगतीपर्यंतचा आढावा घेत श्रीराम कुंटे यांनी आपल्या या पहिल्याच पुस्तकात चीनची कुंडली मांडली आहे. त्याला भारत सरकारचे माजी सचिव व राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

भारताशी ३५०० किलोमीटरपेक्षा दीर्घ सीमा असणारा देश. स्वातंत्र्यानंतर झालेल्या १९६२च्या युद्धात भारताला निर्णायकपणे हरवणारा देश. संपूर्ण जगातील प्रबळ सत्ता म्हणून पुढे येऊ पाहणारा देश. भारताशी सातत्याने शत्रूची भावना बाळगून प्रत्येक क्षेत्रात भारतावर कुरघोडी करू पाहणारा देश. सख्खे शेजारी असूनही बहुसंख्य भारतीय ज्यांच्याविषयी अनभिज्ञ आहेत असा देश. या देशाचे नाव आहे चीन.

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव (किंवा प्रत्यक्षात पाहिलेल्या) प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात. अनेकदा त्या ऐकीव किंवा एकांगी माहितीच्या आधाराने उभारलेल्या असतात.

शिवाय स्वदेशाविषयीच्या प्रेमापोटी आणि वृत्तपत्रे, सोशल मीडिया, पुस्तकं यांच्या गैरप्रभावातूनही काही प्रतिमा तयार होतात. त्यांचे खोलवर जाऊन चिकित्सा आणि विश्लेषण केल्याशिवाय चिनी लोकांची भारताकडे पाहण्याची नेमकी दृष्टी काय आहे? ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असे आयाम काय आहेत? याचं उत्तर मिळणं कठीण आहे. १४० कोटीच्या देशात चीनचा गंभीरपणे अभ्यास करणारे विद्वान किती आहेत? चिनी भाषा किती भारतीय लोक बोलतात, वाचतात, अनुवाद करतात आणि सातत्याने अभ्यासतात?

या प्रश्नांचा थोडा जरी विचार केला, तरी एक गोष्ट लक्षात येते की, आपला ‘ज्ञानाचा अनुशेष` भरायला कित्येक दशकं लागतील. शत्रूच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आपली माहिती जितकी शत्रूला असते त्यापेक्षा अधिक माहिती आपल्याला शत्रूची असली पाहिजे! आज तरी आपण चीनविषयीच्या वरवरच्या ज्ञानापासूनही वंचित आहोत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आज जगातल्या महासत्तांच्या पंक्तीतही चीन वरच्या स्थानावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणूनही तो पहिल्या-दुसऱ्या स्थानावर आहे. सुरक्षा परिषद ही एक जागतिक ‘पंचायत’ आहे. त्यातील अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे पाच स्थायी सदस्य आहेत आणि ते संपूर्ण जगासाठीचे महत्त्वाचे ठराव करतात.

युक्रेन-रशिया युद्ध असो वा इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष; प्रत्येक निर्णय या पाच सदस्यांवर अवलंबून असतात. भारत अनेकदा अस्थायी सदस्य झाला आहे, पण स्थायी सदस्यत्वापदी पोहोचण्याचा मार्ग अजूनही दृष्टिपथात नाही. जेव्हा केव्हा हे शक्य होईल तेव्हा ही पंचायत कोणता ‘खेळ’ खेळेल सांगता येत नाही.

श्रीराम कुंटे यांनी या व अशा सर्वच आयामांची तपशीलपूर्वक चर्चा व मांडणी केली आहे. एक शेजारी राष्ट्र म्हणून आपल्यासमोर चीनचं कायमचं आव्हान असणार आहे. चार भागांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात तटस्थपणे केलेल्या चिकित्सेतून पुढे आलेलं चीनचं एक समग्र चित्र लेखकाने आपल्यासमोर सादर केलं आहे.

यातल्या चौथ्या भागात भारतापुढे असणाऱ्या चीनच्या आव्हानांचे तपशीलवार वर्णन केलं आहे. त्यातलं पहिलं आव्हान विचारसरणीचं आहे. इतर आव्हानांप्रमाणे हे आव्हान जगातल्या समग्र लोकशाहीवादी देशांसमोरही आहे. विशेषत: अमेरिका, यु.के, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांसमोरही ते आहे. विसाव्या शतकात रशियासह अनेक ठिकाणच्या साम्यवादी किंवा तत्सम राजवटी कोसळल्या.

पूर्व आणि पश्चिम युरोपमधल्या सगळ्या विचारप्रणालीच्या आणि दगडविटांच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदावर आधारित अपार्थेड व्यवस्था संपुष्टात आली. पण विचारसरणीच्या बाबतीत चीन साम्यवादापासून तसूभरही हटला नाही. प्रागतिक विचारसरणी, लोकशाही व्यवस्था, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बाबतीत चीन आजही माओयुगात आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. बदलली ती फक्त आर्थिक नीती.

...........................................................................................................................................

भारत-चीन यांच्यातही आतापर्यंत सीमाप्रश्नावर अनेक बैठका झाल्या आहेत. पण वाद मिटत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुत्सद्देगिरीत आपण कमी पडतो असं नाही, तर वाटाघाटीच्या पातळीवर कमी पडतो त्याच्या स्वरूपात बदल आवश्‍यक वाटतो. हीच आपल्या विदेशी धोरणाची परीक्षा आहे. आपण भारतीय जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवू शकतो, कारण लोकशाहीत जनता आणि संसद यांना प्रशासनाला सामोरं जावं लागतं. श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. सर्वसामान्य वाचकांबरोबरच चीनच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

...........................................................................................................................................

दंग शाओपिंगने १९७९पासून उदार आर्थिक धोरण आणलं आणि पुढच्या तीनेक दशकात चीनमध्ये आर्थिक क्रांती घडून आली. पण विचारसरणीतील मतभेदाचं आव्हान जगासमोर आणि भारतासमोर निश्चित राहणार आहे.

दुसरं आव्हान आर्थिक क्षेत्रातील स्पर्धेचं आहे. आपण अगदी उत्साहाने चीनच्या उत्पादनावर ‘बहिष्कार’ अशा बातम्या वाचतो. प्रत्यक्षात आपल्या देशाच्या बाजारावर चीनचं नियंत्रण व प्रभाव हाताबाहेर गेलेला आहे. द्विपक्षीय व्यापारातील संतुलन पूर्णपणे चीनच्या बाजूने आहे, हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाही. या क्षणी चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. 

चीनबरोबरचा सर्व व्यापार ११८.४ मिलियन डॉलरचा आहे. त्यात भारताची निर्यात फक्त १६.६७ टक्के इतकीच आहे. चीनमधून होणारी आयात ही १०१.७ बिलियन डॉलर एवढी प्रचंड आहे. सध्या चीनबरोबरचे आपले संबंध बिघडलेले असतानाची ही स्थिती आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार क्रमांक दोनवर गेला आहे.

चीनच्या भारतातील गुंतवणुकीचाही आपण गंभीरपणे विचार करणं आवश्‍यक आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने भारतातील स्टार्टअपमध्ये ४ बिलियन डॉलर गुंतवलेत. इतकंच नाही तर भारतातील ३०पैकी १८ युनिकॉर्नमध्ये चीनची गुंतवणूक आहे. आपल्या देशातील बौद्धिक संपदेचे वारस म्हणजे हे स्टार्टअप्स आहेत हेच आपण विसरलो की काय?

‘बेल्ट आणि रोड` या चीनच्या विदेशी आर्थिक धोरणाला भारताने विरोध केला असेलही पण प्रत्यक्षात हा बेल्ट भारताभोवती आवळला गेला आहे. हे आव्हान पेलण्यासाठी नेमकं काय धोरण आहे व त्यात जनता व उद्योग यांची भूमिका काय असावी, याची स्पष्टता आज घडीला दिसत नाही. मात्र चीनचा हा प्रभाव भारतापुरता मर्यादित नाही. जगातील अनेक प्रगत आणि अप्रगत देशांत चीनने आपला पगडा बसवला आहे. कुठे मदत, कुठे कर्ज, कुठे गुंतवणूक, कुठे बाजारात स्वस्त वस्तूंचे ढीग अशा अनेक पद्धतींनी चीन आपला प्रभाव वाढवतोय. सोबतच शेकडो ‘कन्फ्यूशियस` केंद्राच्या माध्यमातून चिनी भाषा, संस्कृती आणि विचारसरणीच्या प्रचार-प्रसाराचं काम सुरू आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

भारतासाठी तिसरं महत्त्वाचं आव्हान लष्करी आणि सामाजिक आहे. आपल्या ३०८० किलोमीटरच्या सीमेवर चीन पहारा ठेवून कशा प्रकारे घुसखोरी करता येईल ते पाहतोय. जून २०२०ला गलवानमध्ये झालेला संघर्ष गाजला. तरीही चीन वेगवेगळ्या प्रकारे घुसखोरी करतच आहे. सीमेलगतचे रस्ते, वस्त्या, तिबेटमधील रेल्वे आणि 2 लाख सैनिक उभे करून भारताला सतत कोंडीत पकडण्याचा प्र्रयत्न सुरू आहे. अर्थात चीन अशा प्रकारचं आक्रमक धोरण भारताबरोबरच फिलिपिन्स, जपान, तैवान, तिबेट, भूतान, व्हिएतनाम या देशांबरोबरही राबवतो आहे. पण चीनने किर्गिझस्तान, लाओ, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान व कझाकस्तान या देशांबरोबरचे सीमावाद मिटवले आहेत, हेही ध्यानात ठेवलं पाहिजे.

भारत-चीन यांच्यातही आतापर्यंत सीमाप्रश्नावर अनेक बैठका झाल्या आहेत. पण वाद मिटत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुत्सद्देगिरीत आपण कमी पडतो असं नाही, तर वाटाघाटीच्या पातळीवर कमी पडतो त्याच्या स्वरूपात बदल आवश्‍यक वाटतो. हीच आपल्या विदेशी धोरणाची परीक्षा आहे. आपण भारतीय जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवू शकतो, कारण लोकशाहीत जनता आणि संसद यांना प्रशासनाला सामोरं जावं लागतं.

श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. सर्वसामान्य वाचकांबरोबरच चीनच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे | मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ३६० | मूल्य - ४३० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......