‘चाकोरीपलीकडचा’ या पुस्तकाच्या नावाप्रमाणे लामखडे सर चाकोरी मोडीत जगले. सरांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!
ग्रंथनामा - आगामी
राजा कांदळकर
  • शिक्षक आणि समाजवादी कार्यकर्ते प्रा.मा.रा. लामखडे यांच्या आज प्रकाशित होत असलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Sat , 27 July 2024
  • ग्रंथनामा आगामी मा.रा. लामखडे M. R. Lamkhade

मराठीचे ख्यातनाम शिक्षक, प्रख्यात लेखक, संशोधक, पक्षीनिरिक्षक, समाजवादी कार्यकर्ते प्रा.मा.रा. लामखडे यांचा अमृतमहोत्सव आज, शनिवार, २७ जुलै २०२४ संगमनेरमध्ये साजरा होत आहे. निरागस, निर्मळ मनाचे, सदैव आनंदी असणारे लामखडे सर. त्यांच्या लेखनकार्यात, उपक्रमांत व्यस्त असतात. त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ‘सांस्कृतिक राजकारण’, ‘चाकोरी पलीकडचा’, ‘लोकवाटा’ या लामखडे सरांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी होत आहे…

.................................................................................................................................................................

संगमनेर तालुक्यातील बोटा गावाजवळ केळेवाडी हे छोटेसे गाव. प्रा. मा.रा.लामखडे सरांचे हे गाव निसर्गाच्या कुशीत आहे. निसर्गप्रेमी लामखडे सरांचे वास्तव्यही सेवानिवृत्तीनंतर तेथेच शेतात आहे. प्राणी, पक्षी, झाडे, डोंगर, माती यामध्ये रमणारे प्रा.लामखडे सर लहानपणापासूनच निसर्गात घडत गेले. सरांचे वडील मेंढपाळ असल्याने लहानपणी मेंढ्यांची कोकरे सांभाळण्याचे काम त्यांना करावे लागले.

त्या कोकरांचे गुण सरांनी घेतले असावेत. लहान मुलासारखी मनाची निरागसता जपायची, सदा आनंदी राहायचं, दुसऱ्यांवर माया करायची, कुणाशी स्पर्धा करायची नाही, वैर धरायचे नाही, अखंड कुतूहलाने या जगाकडे बघायचं, हे गुण सरांनी आयुष्यभर जपले.

मुलाने शिकावे असे वडिलांना वाटत असल्याने शिक्षणासाठी त्यांना जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे आत्याकडे जावे लागले. आत्यांच्या घरी देव्हार्‍यात महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. सर त्या देव्हार्‍यातील देवांना आंघोळ घालत असताना गांधींच्या छायाचित्राचीही स्वच्छता करायचे. सरांना महात्म्याचा झालेला तो पहिला स्पर्श.

सर शिकत असलेल्या शाळेत मूलोद्योग हा विषय शिकवला जायचा. मूलोद्योग म्हणजे सुतकताई कापसापासून चरख्यावर सूत काढणे. त्याचे विणकाम करून कापड बनवणे, असा स्वावलंबी संस्कार करणारा हा विषय म्हणजे गांधीजींची शिकवण होती. सहावीचे वर्गात असतांना सरांनी स्वत: सूत काढून टॉवेल बनविला. सरांना गांधी इथे भेटले. हा आनंद म्हणजे गांधी विचारांचा थेट स्पर्श होता. पुढील काळात शिक्षण घेताना, शिकवताना, वाचन करताना महात्मा गांधींचा एवढा प्रभाव वाढला की, आजही लामखडे सर ‘गांधीमय’च राहतात.

प्रा.लामखडे सरांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण राजुरी, ओतुर येथे झाले. राजुरीतील अतिशय प्रसिद्ध समाजवादी विचारांचे शाहीर होते. त्यांच्या शेजारी सरांचे वास्तव्य असल्याने प्रबोधन गीते व विचारांचा प्रभाव सरांवर निर्माण झाला. स्वातंत्र्य चळवळीचा काळ असल्याने चळवळीतील नेत्यांची भाषणे ऐकणे, पर्वणी असायची. १९७१ साली यशवंतराव चव्हाणांची सभा ऐकण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण व देशात जवाहरलाल नेहरू यांचे विचारांचा प्रभाव होता. तो लामखडे सरांच्या मनामध्ये आजतागायत राहिला आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील स्वातंत्र्यसंग्रमात अग्रणी होते, तसेच तरुण पिढीचे आवडते पुढारी होते. त्यांची भाषणे ऐकणे ही पर्वणी असायची. क्रांतीसिंहाचे जुन्नरमधील भाषण ऐकण्यासाठी राजुरीहून तीस मित्रांसह सर सायकलवर जुन्नरला गेले. १९६२ साली जुन्नरचे माजी आमदार व समाजवादी पक्षाचे नेते वि.म. आवटे काँग्रेस पक्षात गेले. त्यांचा निषेध करणारी सभा डॉ. बाबा आढव यांनी राजुरीत घेतली, तेव्हा त्यांचे भाषण ऐकूण लामखडे सर त्यांच्या प्रेमात पडले.

बाबा आढाव यांच्या चळवळीत सर आजही काम करत आहेत. बाबा आमटे, ग. प्र. प्रधान, अशोक मेहता यांच्यासह अनेक तत्कालीन विचारवंतांच्या कार्याने लामखडे भारावून गेले. अगदी कमी वयात त्यांना अनेक वक्त्यांच्या विचारांचा लाभ झाला. लेखनाची स्फूर्ती निर्माण झाली. डॉ. बाबा आढावांच्या कार्यास समर्थन देणारा पहिला लेख त्यांनी आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ दैनिकात लिहिला. त्यानंतर सामाहिक ‘साधना’चे संपादक यदुनाथ थत्ते संगमनेरला आले. लामखडे सरांकडून त्यांनी लेख लिहून घेतला व ‘साधना’त प्रसिद्ध केला. त्यांच्यातील वैचारिकता लेखन स्वरूपात शब्दबद्ध होऊ लागली.

समाजवादी विचाराने प्रभावीत झालेले प्रा. लामखडे सर राष्ट्रसेवा दलात उशिरा आले. त्याआधी संगमनेर कॉलेजमध्ये बी.ए.चे शिक्षण घेत असताना त्यांनी ‘कमवा व शिका’ योजनेत काम केले. कॉलेजचे तेव्हाचे प्राचार्य मधुसुदन कौंडीण्य यांचा फार मोठा सहवास, मार्गदर्शन सरांना लाभले. पदवीचे शिक्षण संपल्यानंतर एम.ए.चे शिक्षण घेण्यासाठी ते पुणे विद्यापीठात गेले. खर्चाचा प्रश्‍न कठीण होता. त्यांना समाजवादी पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस पन्नालाल सुराणा यांनी पक्ष कार्यालयात सेक्रेटरीचे काम दिले. मिळणार्‍या आर्थिक रकमेपेक्षा तेथे विचारवंतांचा संपर्क, ज्ञान, मार्गदर्शनाने त्यांचे पुढील आयुष्य अधिक विचार संपन्न झाले.

याच काळात त्यांचा भाई वैद्य, यदुनाथ थत्ते यांच्याशी संपर्क आला. याच काळात ते सत्यशोधक चळवळीशी जोडले गेले. महात्मा फुलेंचे सहकारी शाहीर भीमराव महामुनी यांच्या प्रभावाने ते ‘सत्यशोधक चळवळी’त काम करत राहिले. महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार त्यांनी अंगीकारून पुढेही अनुकरण केले. शाहीर भीमराव महामुनींचे कोल्हापूर विद्यापीठात अध्यासन असल्याचे प्रा.लामखडे सरांनी नमूद केले आहे. दोन वर्षे पुण्यात शिक्षण घेताना लामखडे सरांना खूप शिकायला अनुभवयाला मिळाले. एम.ए. झाल्यानंतर प्राचार्य कौंडीण्य यांच्या शिफारसीने ते जुन्नर कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक झाले. अगदी काही वर्षांतच कौडींण्य सरांनी लामखडे सरांना संगमनेर कॉलेजला नोकरीची संधी दिली. संगमनेर महाविद्यालयात सेवानिवृत्तीपर्यंतचे लामखडे सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य म्हणजे खर्‍या अर्थाने कृतीशील व आनंदी जीवनाचा समृद्ध प्रवास आहे.

समाजवादी, सत्यशोधक, राष्ट्र सेवादल कार्य विचारातून घडलेले लामखडे सर विद्यार्थ्यांना शिकवताना स्वतःला विसरून कृतीशिल शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह कॉलेजबाहेर पडायचे. निसर्ग, प्रकाश, प्राणी, पक्षी, समाजजीवन यामध्ये विद्यार्थ्यांना कृतीशिल शिक्षण द्यायचे. ‘नवा प्रयोग’ ही साने गुरुजींची कादंबरी सरांच्या वाचनात आली आणि सरांनी संपूर्ण साने गुरुजी वाचले. त्यांच्या विचारांशी एकरुप झाले. वर्ध्याच्या आश्रमात जाऊन त्यांनी ‘गिताई’चे वाचन केले आणि विनोबा यांच्या विचारांशी एकरूप झाले. आनंदवन, हेमलकसा येथे सर अनेक वेळा बाबा आमटेंना भेटले आणि त्यांच्या कार्याशी एकरूप झाले.

सरांच्या जीवनाची जडणघडण करणारे दोन गुरू आहेत. एक प्राचार्य कौंडीण्य आणि दुसरे साथी दुर्वे नाना. बी.ए.च्या शिक्षणापासून कौंडीण्य सरांचे मार्गदर्शन मिळाल्यापासून ते कौंडीण्य सरांच्या निधनापर्यंत आणि साथी भास्करराव दुर्वेंच्या पहिल्या परिचयापासून ते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाची वास्तू संगमनेरमध्ये उभारण्यापर्यंत लामखडे सर या गुरूंच्या अखंड सेवेत, विचारात कार्यरत राहिले.

प्राचार्य कौंडीण्य म्हणजे अभिनव व लोकउपयुक्त कृती कार्याची गंगोत्री होते. शेकडो उपक्रम त्यांनी विद्यार्थी व स्थानिक समाज विकासासाठी केले. कौंडीण्य सरांनी सहकारी प्राध्यापकांना विविध उपक्रमांसाठी सतत प्रोत्साहित केले. त्यांच्या कलागुण वृद्धीसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि म्हणूनच संगमनेर महाविद्यालय संपूर्ण देशात नावाजले. राज्यस्तरीय लेखक व विचारवंत निर्माण झाले. लामखडे सर त्यांच्यातीलच एक अतिशय समृद्ध निसर्ग अभ्यासक व पर्यटन लेखक म्हणून सुपरिचित झाले. हजारो विद्यार्थ्यांच्या आदरस्थानी असलेले लामखडे सर आजही वयाच्या ७५व्या वर्षी नव्या उमेदीने आपल्या शेतामध्ये लेखन कार्य करत आहेत.

साथी भास्करराव दुर्वे नाना यांनी लामखडे सरांमधील कार्यकर्ता घडवला. बी.ए.ला असताना ते नानांच्या शेजारीच रहायला होते. त्यामुळे अनेक वेळी, अनेक कारणांसाठी नानांचा त्यांचा संपर्क व्हायचा. नानांचे विचार सामाजिक कार्य आणि व्यक्तिमत्त्व म्हणून लामखडे सर नानांचे कार्यकर्ते म्हणून समाजवादी पक्ष, राष्ट्र सेवादल आणि समविचारी संस्थांच्या कार्यासाठी समर्पित राहिले. दुर्वेनानांच्या कार्याचा वारसा वृद्धींगत होण्यासाठी त्यांनी संगमनेर-अकोले परिसरातील सर्व जुने नवे कार्यकर्ते एकत्र करून अनेक उपक्रम राबवले. साने गुरुजी अभ्यासिका, चर्चक मंडळ, परिसर भेटी, साथी दुर्वेनाना प्रतिष्ठान, साथी दुर्वे नाना पतसंस्था घुलेवाडी यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फार मोठे योगदान लामखडे सरांनी दिले आहे.

वयाची ७५ वर्षे पूर्ण करताना लामखडे सरांचे मन थकले नाही, लेखणी थकली नाही, विचार थकले नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरील तेज निरागसपणा आणि आनंद आजही स्फूर्तीदायी आहे. त्यांना अजूनही फार लिहायचे आहे. निसर्गात रहायचे आहे. बाबा आढाव, बाबा आमटे, ग.प्र.प्रधान, भाई वैद्य, महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे. त्या विचारांचे वारसदार घडवायचे आहेत. सरांनी केळेवाडीच्या घराला नाव दिलंय- ‘गाथा’. संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचं हे अभिनव स्मारक. आणि संगमनेरच्या आपल्या घराला ‘एसेम’ असं नाव दिलं आहे. समाजवादी विचारांना प्रसारित करत असताना ते संतांचे विचारही अनुसरतात. कर्मकांड नाकारून सत्यशोधनाचे वारकरी होतात.

वर्षातला एक पगार समाजकार्यावर, वर्गातल्या, कॉलेजातील मुलांवर खर्च करणारा हा शिक्षक आहे. यावर कुणाचा आज विश्वास बसणार नाही. सरांनी आयुषभर चाकोरी मोडीत जगणं पसंत केलं. तसे जगले. आज प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘चाकोरीपलीकडचा’ या पुस्तकाच्या नावाप्रमाणे लामखडे सर चाकोरी मोडीत जगले. सरांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!

.................................................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......