आजच्या लेखकाला मराठीच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन झाले नाही, तर भिकार लेखकांनी लटपटी करून अध्यक्ष होण्याचे हे समारंभ बिनकामाचे ठरतात
ग्रंथनामा - झलक
भालचंद्र नेमाडे
  • ‘साहित्य-संचित’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 30 September 2023
  • ग्रंथनामा झलक साहित्य-संचित Sahitya-Sanchit भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade

२०१६मध्ये पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड येथे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात झालेले विचारमंथन ‘साहित्य-संचित’ या पुस्तकाच्या रूपाने डी. वाय. पाटील विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहे. या पुस्तकाचे संपादन सुनील चव्हाण व श्रीधर लोणी यांनी केले आहे, तर प्रस्तावना लिहिली आहे प्रख्यात कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी. तिचं हे पुनर्मुद्रण...

.................................................................................................................................................................

पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काळात मी आसामात करबी लोकांच्या वाल्मिकीपूर्वी चारपाचशे वर्षे जुन्या मौखिक रामायणाच्या संशोधन प्रकल्पावर काम करत होतो. अशा वेळी माझे मित्र पुण्याचे रा. सुनील चव्हाण यांचा अचानक निरोप आला की, ‘नेमाडे, तुम्ही साहित्य संमेलनाला कधीही जात नाही, हे माहीत असूनही डॉ. पी. डी. पाटील आणि आमची सर्वांची इच्छा आहे की, तुमची निदान एक मुलाखत आम्हाला मिळावी. त्यासाठी आपण असाल तिथे मंगला खाडिलकर येतील आणि त्या मुलाखत टेप करून घेतील. कळवा.’

आता इतक्या समजूतदारीने मला विचारले आणि विशेषतः माझे स्नेही रा. डॉ. पी.डी. पाटील, ज्यांच्या कर्तृत्वाबद्दल मला अत्यंत आदर वाटतो, त्यांच्या कुशल देखरेखीखाली हे संमेलन देहू-आळंदीच्या परिसरात होणार आहे म्हटल्यावर मी रा. सुनील यांना होकार दिला आणि मंगलाताई खाडिलकर यांना गोहाती येथे येण्याचा पत्ता कळवला. संमेलनासाठी आखलेल्या कार्यक्रमांची तयारी उत्तम रीतीने चालू असल्याचे त्यांनी मोठ्या उभारीने सांगितले.

रा. पी. डी. पाटील यांच्या धुरीणत्वाचा मला चांगला अनुभव असल्याने ते काहीतरी लक्षणीय करतील, याची मला खात्री होतीच. ते स्वतः महाराष्ट्रभर हिंडून निमंत्रितांना, संस्था, ग्रंथालये, प्रकाशक, लेखक, लोककलाकार-कीर्तनकार, आदिवासी कलाकार अशा सर्वांना निमंत्रणं देत आहेत. देशातले ज्ञानपीठ प्राप्त हयात लेखक, नवे-जुने समीक्षक, पुस्तक विक्रेते-सगळ्यांनी संमेलनात आस्थेने भाग घ्यावा म्हणून रात्रंदिवस धडपडत आहेत, हे सगळे मला मुलाखतीच्या वेळात मंगलाताईंनी सांगितले. यामुळे मलाही उत्साहाने मुलाखत देता आली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

महिनाभराने मी महाराष्ट्रात आल्यावर तेव्हा संपून गेलेल्या साहित्य संमेलनाचे नेहमीप्रमाणे विनोदी किस्से ऐकायला मिळण्याऐवजी ‘हे संमेलन दृष्ट लागण्यासारखे होते’, अशा प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवडला जाऊन येणार्‍या सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या.

आमचे मित्र ज्ञानपीठावाले केदारनाथ सिंह, रघुवीर चौधरी, एम.टी. वासुदेवन नायर यांनी तर ‘तुम्ही का नाही गेलात’, असेही विचारले आणि मराठीच्या साहित्य गौरवाबद्दल वाखाणणी केली. माझे संमेलनाला जाऊन आलेले विद्यार्थी, लेखकमित्र, पुस्तक विक्रेते-सगळे या संमेलनाच्या नियोजनावर संतुष्ट होते. तीस हजारांहून आसनांच्या आणि अर्धा डझन लहानमोठ्या सभामंडपांमध्ये एकाच वेळी सर्वत्र चाललेले परिसंवाद, कवीसंमेलने, खाण्यापिण्याच्या, निवासाच्या उत्तम सोयी, लाखोंचा मदतनिधी व मानधने, पुस्तकांच्या संचांचे शाळांना मुक्तहस्ताने वितरण, नव्या पिढीलाही मार्गदर्शक असे तंत्रज्ञान, उद्योगजगावर परिसंवाद, ऑडिओ स्वरूपात लोकप्रिय पुस्तके, ध्वनिफिती, चित्रफिती यांची उपलब्धी, महाराष्ट्राबाहेरच्या मराठी संस्थांना मराठीच्या वृद्धीसाठी लाखोंचे मदतनिधी-असा लक्ष्मी आणि सरस्वती यांचा दुर्लभ संयोग उपस्थितांना स्तिमित करून गेला.

पुस्तकांच्या विक्रीसाठी गाळ्यांच्या आलेल्या भाड्यात आयोजकांनी स्वतःची रक्कम टाकून झालेला एक कोटी रुपयांचा निधी कुणाला द्यावा - तर त्या वर्षी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणासाठी हा निधी वाटला; शेतकर्‍याचा मुलगाच इतका परहितदक्ष होऊ शकतो. डॉ. पी. डी. पाटील यांचे हे सामाजिक बांधीलकीचे उदाहरण अपवादात्मक ठरेल.

सरकार दरवर्षी साहित्य संमेलनाला देते, तो २५ लाखांचा निधी त्यांनी मराठीच्या वृद्धीसाठी साहित्य महामंडळाकडे सुपूर्त केला. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या संशोधनासाठी एक अध्यासन डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सुरू झाले, हाही एक नवा पायंडा इथे पाडला, याचा सर्व मराठीप्रेमींना अभिमान वाटेल.

या संमेलनात तीन पिढ्यांचे नावाजलेले लेखक एका व्यासपीठावर दिसले. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, सदानंद मोरे, शेषराव मोहिते, संजय भास्कर जोशी, ज्ञानेश्‍वर मुळे असे वेगवेगळ्या क्षेत्रांतले आणि विचारांचे प्रतिनिधी आलेले म्हणजे बोलावलेले दिसतात. हाही पुढील साहित्य संमेलनांना आदर्श ठरावा. अहोरात्र राबणारे पडद्यामागचे कार्यकर्ते यांनाही हे श्रेय दिले पाहिजे.

शेवटी आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे मराठीच्या अन्य भाषाभगिनींशी रसिकांचा थोडा तरी थेट संपर्क घडला आणि संमेलनाचे परिप्रेक्ष्य विस्तारलेः गुलजारांच्या हस्ते उद्घाटन, चेतन भगत यांची मुलाखत, जावेद अख्तरांनी केलेला समारोप - यामुळे संमेलनाला तौलनिक परिप्रेक्ष्य प्राप्त झाले. न्या. म. गो. रानडे यांनी सुरू केलेली, दीडशेक वर्षे आता होतील अशी ही चळवळ पुढे रटाळ समारंभ होऊन बसली.

आजच्या लेखकाला मराठीच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन झाले नाही, तर भिकार लेखकांनी लटपटी करून अध्यक्ष होण्याचे हे समारंभ बिनकामाचे ठरतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मराठीची अखिल भारतीय संदर्भातली कामगिरी स्पष्ट होणे गरजेचे आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे दुर्दैवाने मराठीची एक स्वतंत्र संकुचित कोटी होत गेल्याचे आमच्या पिढीला लहानपणीच दिसून आले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपण नेहमी एका विशाल उपखंडाच्या भाषिक कुटुंबात वावरत असतो, याची नव्या पिढ्यांना जाणीवही राहिली नाही. ‘कानडीने केला मराठी भ्रतार’ हा आपला व्यवहार होता. संत नामदेव, काशीला संत तुलसीदासांबरोबर शिकलेले संत एकनाथ, रामदास स्वामी, थोर सुफी परंपरा जिचे एकनाथ, तुकाराम हे स्वतःला अनुयायी मानत.

संत विनोबा म्हणाले तसे-आपले पहिले पाऊल महाराष्ट्री, दुसरे हिंदुस्थानी आणि तिसरे आंतरराष्ट्रीय असले पाहिजे. महाराष्ट्र धर्म हा केवळ मराठी भाषिकांनीच रचलेला नाहीः श्रीचक्रधरस्वामींपासून काबूलपर्यंत महानुभाव, नाथसंप्रदाय, वारकरी, दत्तसंप्रदाय, शीख गुरू गोविंदसिंग, महाराष्ट्र अस्मितेचे निर्माते मलिक अंबर-अशी कितीतरी नावे घेऊन महाराष्ट्राचा इतिहास सातवाहनांपासून पाहता येतो. जैन, बौद्ध, शीख, ज्यू, पारशी, मुसलमान, ख्रिस्ती - सर्वांची ही भाषा राहिली आहे.

आता एकभाषिक राजकारण फोफावले असले, तरी मराठी ही एका विशाल हिंदू महाव्यवस्थेत या उपखंडात विकसित झालेली एक व्यवस्था आहे, आणि आपल्या पोटभाषा - खानदेशी, अहिराणी, वर्‍हाडी, झाडी, कोंकणी याही मराठीच्या उपव्यवस्था म्हणून विकसित झाल्या पाहिजे. तरच मराठी ही प्रबळ होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ह्या सगळ्या मराठीच्या बोलींचाही सहभाग वाढवावा, असेही पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनाचा आढावा घेताना सुचवावेसे वाटते.

एकंदरीत मराठीने आपल्या उपखंडातल्या भाषिक महाव्यवस्थेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. प्राचीन महाराष्ट्रीतल्या वसुदेवहिंडी, तरंगलोला यासारख्या अनेक शतकांपूर्वीच्या कादंबर्‍या, सट्टक हा असामान्य नाट्यप्रकार, बृहत्कथा सारखे असाधारण कथावाड्मय, कोशवाड्मय, व्याकरणे, महाकाव्ये, खंडकाव्ये, चरित्रकाव्ये - अशी समृद्ध आणि एवढा प्रचंड अवकाश असलेली मराठी जगातली एक प्रमुख भाषा ठरते.

अलीकडेही हिंदी काव्यात नव्या युगाचे निर्माते गजानन माधव मुक्तिबोध, ओडिया भाषेतील आधुनिक साहित्याचे प्रवर्तक कवीवर राधाकृष्ण राव, कन्नड कवितेत क्रांती घडवणारे द. रा. बेंद्रे, डोग्रा भाषेचे आद्यप्रवर्तक साहित्यिक मधुसूदन साठे - असे देशातल्या अनेक भाषांमध्ये युगप्रवर्तक मराठी भाषक होऊन गेले.

तेलंगण, तमिळनाडू, केरळ, कारवार, मंगळूर, गोवा, ग्वाल्हेर, बडोदा, इंदूर वगैरे प्रदेशात मराठी भाषकांनी मोठे योगदान केले आहे. उर्दूचा तर उगमच महाराष्ट्रात आहे. हा आपला वारसा तरुण पिढ्यांनी सतत डोळ्यासमोर ठेवावा, इतका थोर आहे.

प्रस्तुत साहित्य संमेलनात जे विचारमंथन झाले, ते संपादित करून आपल्या स्मरणात राहील अशा स्वरूपात दिल्याबद्दल आयोजकांचे मी अभिनंदन करतो. ज्यांनी अनेक चांगले पायंडे पाडले आहेत! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा दर्जा असाच वाढावा आणि डॉ. पी. डी. पाटील यांनी साहित्याच्या क्षेत्रातही त्यांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवत राहावा, अशी उमेद बाळगून मी प्रस्तुत ग्रंथासाठी शुभेच्छा देतो.

‘साहित्य-संचित’ - संपादक सुनील चव्हाण, श्रीधर लोणी

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे | पाने - ४२४, मूल्य - १२५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......