स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणाऱ्या, करुणा आणि मानवता यांना पारख्या न झालेल्या हिंदी साहित्याने मला खूप प्रभावित केलं…
ग्रंथनामा - आगामी
जयप्रकाश सावंत
  • ‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 30 August 2023
  • ग्रंथनामा आगामी भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा ‌Bhaiyya Express aani Itar Katha जयप्रकाश सावंत Jayprakash Sawant

प्रसिद्ध हिंदी-मराठी अनुवादक जयप्रकाश सावंत यांचं ‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ हे अनुवादित पुस्तक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होत आहे. यात हिंदीतील दहा महत्त्वाच्या लेखकांच्या सतरा कथांचा अनुवाद आहे. शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाला सावंत यांनी लिहिलेलं हे मनोगत….

..................................................................................................................................................................

वाढतं वय आणि त्याला जोडून येणाऱ्या व्याधी यांतून अगदी मुंबईतल्या मुंबईत होणाऱ्या प्रवासावरसुद्धा ज्या मर्यादा आल्या, त्यातून गेली काही वर्षं माझं फोर्टमधल्या ‘पीपल्स बुक हाऊस’ला जाणं बंद झालंय. त्याचा मला सर्वांत हळहळ वाटायला लावणारा परिणाम म्हणजे माझा हिंदी नियतकालिकांशी असलेला संबंध पूर्णपणे संपुष्टात आलाय. अगदी थोड्याच वर्षांपूर्वी मी दर महिन्याला ‘पीपल्स’मध्ये जाऊन ‘पहल’, ‘तद्भव’, ‘हंस’, ‘कथादेश’, ‘वागर्थ’, ‘साक्षात्कार’, ‘उद्भावना’ अशी दहा-बारा नियतकालिकं नियमित पाहत होतो. मला नियतकालिकांविषयी नेहमीच फार प्रेम वाटत आलंय.

ऑर्वेलने एके ठिकाणी म्हटलंय की, एखाद्या तद्दन मूर्ख मासिकाचा वर्षभराचा बांधीव अंकही काही काळानंतर बहुसंख्य पुस्तकांपेक्षा जास्त वाचनीय वाटतो. ते मला भावतं. नियतकालिकं मला विविधरंगी फुलांच्या गुच्छांसारखी वाटतात. एखाद्या अंकातली सर्वच फुलं आवडीची निघाली, तर बहारच असते, पण चांगल्या संपादकाने काढलेल्या नियतकालिकात थोड्या तरी आवडत्या गोष्टी मिळतातच. शिवाय दर महिन्याला एखादी तरी चांगली नवजात कविता किंवा कथा वाचायला मिळते. मराठीत सुरुवातीला ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’, ‘वसुधा’, ‘वीणा’ आदी, आणि नंतरच्या काळात ‘सत्यकथा’ अशा मासिकांचा लागलेला नाद आठवतो.  

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी नियतकालिकं क्षीण होत असताना अचानक मला वर उल्लेख केलेल्या हिंदी नियतकालिकांचा शोध लागला आणि त्यांच्या श्रीमंतीने मी हरखून गेलो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीतले आघाडीचे लेखक फक्त दिवाळी अंकांत दिसू लागल्याच्या त्या काळात विनोदकुमार शुक्ल, विष्णु खरे, चंद्रकान्त देवताले, मंगलेश डबराल, अशोक वाजपेयी, असग़र वजाहत, विष्णु नागर, शिवमूर्ति, उदय प्रकाश, जितेन्द्र भाटिया, अखिलेश असे हिंदीतले नामवंत कवी-लेखक, त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांतल्या तरुण लेखकांसोबत हिंदी मासिकांतून वाचायला मिळतायत, हे दृश्य आगळं होतं. या साहित्याचं स्वरूपसुद्धा अनोखं होतं.

महाराष्ट्रात आपल्याला महात्मा जोतीबा आणि सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, न्या. रानडे, साने गुरुजी असे थोर समाजसुधारक आपल्याकडे होऊन गेल्याचा अभिमान असतो. खरं तर ते खरोखरच होऊन गेले की, तो केवळ आभास होता, असा प्रश्न पडावा, अशी आजची विषण्ण करणारी स्थिती आहे.

असो. पण या महामानवांच्या विचारांचा मुख्य धारेतल्या मराठी साहित्याला किती स्पर्श झालाय, हे पाहू गेल्यास हाती काय लागेल? याउलट, अशा सुधारकांच्या बाबतीत जे पिछाडीला आहेत, असं आपल्याकडच्या अहंकारातून मानलं जातं, त्या हिंदी भाषकांचं साहित्य बव्हंशी पुरोगामी, प्रगतिशील असल्याचं मला आढळलं. केवळ स्वतःच्या भावभावनांच्या हिंदोळ्यांवर न झुलणारं, आपल्या जातीपुरतं किंवा वर्गापुरतं मर्यादित नसणारं, स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणारं, करुणा आणि मानवता यांना पारखं न झालेलं – अशा प्रकारच्या या हिंदी साहित्यानं मला खूप प्रभावित केलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्यातल्या उत्कृष्ट कथा, कविता निवडून त्या मराठीत आणणं, हा या दोन्ही भाषांच्या न फिटणाऱ्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचा मार्ग आहे, असं मला वाटलं आणि त्यातून हे अनुवाद सुरू झाले.

सुरुवातीला उदय प्रकाश यांच्या कथांच्या केलेल्या अनुवादाला चांगला प्रतिसाद लाभला. सुमती लांडे यांनी प्रकाशित केलेलं ‘तिरिछ आणि इतर कथा’ लोकप्रिय झालं – विशेषतः मराठीतल्या तरुण कवी-कथाकारांना ते खूप आवडून गेलं. त्यानंतर केलेले रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथांचे अनुवादही वाचकांना आवडले. यामुळे मला एकूणच समकालीन हिंदी कथेचं एक चित्र समोर आणावं, असं वाटलं.

२०१०च्या मे महिन्यात आरंभ झालेल्या ‘मुक्त शब्द’ या मनाजोगत्या स्वरूपाच्या मासिकामुळे हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला. २०१०-११च्या दरम्यान मी हिंदीतील आठ कथाकारांच्या बारा कथांचे अनुवाद करून ‘मुक्त शब्द’ला दिले आणि त्या मासिकाच्या येशू पाटील यांनी ते अगत्याने छापले. हिंदी साहित्याला जास्त महत्त्व दिल्याबद्दल ज्येष्ठ लेखक गो. पु. देशपांडे यांनी व्यक्त केलेली नाराजी सोडल्यास या योजनेलाही चांगला प्रतिसाद लाभला. विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांची ‘मुक्त शब्द’च्या पत्रव्यवहार सदरात आलेली अत्यंत उमदी प्रतिक्रिया कृतज्ञतापूर्वक लक्षात राहिलीय. त्यांनी लिहिलं होतं, ‘हिंदी कथांचा अनुवाद देणे तत्काळ बंद करावे. कारण मराठी कथाकारांना कॉम्प्लेक्स येईल, अशी भीती वाटते.’

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

त्या बारा कथा आणि नंतरच्या काळात अनुवादित केलेल्या आणखी काही कथा, अशा एकूण बारा कथालेखकांच्या बावीस कथा मी ‘मुक्त शब्द’ला देऊ शकलो. त्यांतल्या उदय प्रकाश आणि रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा वगळून उरलेल्या दहा कथाकारांच्या एकूण सतरा कथा प्रस्तुत संग्रहाद्वारे पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. हा संग्रह काढायचा ठरल्यानंतर प्रत्यक्षात तो प्रकाशित व्हायला अनेक वर्षं लागलीयत, पण इतक्या ‘देरी’नंतरही तो वाचकांना ‘दुरुस्त’ वाटेल, अशी मला आशा आहे.

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ - अनुवाद : जयप्रकाश सावंत

शब्द पब्लिकेशन, मुंबई | मूल्य - ३८५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......