‘ते पन्नास दिवस’ : ही कादंबरी काय सांगते, ते महत्त्वाचे आहेच; परंतु ती जे काही सांगत नाही, ते जास्त महत्त्वाचे आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राकेश वानखेडे
  • ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 24 June 2023
  • ग्रंथनामा शिफारस ते पन्नास दिवस Te Pannas Divas पवन भगत Pavan Bhagat करोना Corona करोना व्हायरस Corona Virus कोविड 19 Covid 19

सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांची ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी हातात घेतल्यानंतर ‘हे कोणते पन्नास दिवस?’ असा प्रश्न पडतो? तर हे ५० दिवस आहेत करोना लॉकडाऊन कालावधीत झालेल्या अवर्णनीय अशा होरपळीचे, भूकबळीचे स्थलांतराचे आणि आजच्या संवेदनाहीन अशा अमानवी संहाराचे.

ही कादंबरी म्हणजे रिपोर्ताज आहे दोन जगांमध्ये सापडलेल्या भूकबळींचा. दुसरे वैशिष्ट्य असे की, तिचे तोंड समष्टीकडे आहे. मराठी कादंबरीने जोपासलेला स्व-पुरता वास्तववाद, अस्तित्ववाद न जुमानता, ती समूहाच्या वास्तवाचे प्रखर भान द्यायच्या प्रयोजनाने सज्ज आहे.

या भारतीय समूहात काहीही घडले, तरी कुणाला पापाची टोचणी लागत नाही. परिमार्जन करून मोकळे होण्याची आध्यात्मिक सोय असल्याने नेहमीच्या ‘पळवाटा’ ठरलेल्या आहेत. अशा समकालात ही कादंबरी एक सवाल म्हणून उभी राहते. ती आपल्या समकालाचे केविलवाणे आक्रमण मोजते. मुंबईपासून उत्तर प्रदेशापर्यंतचा सारा भूगोल एका वेदनेच्या सूत्रात बांधते. ब्राह्मणी-अब्राह्मणी अशा चालत आलेल्या ‘डिस्कोर्स’चा मानवी पातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न करते. या दोन परस्पर भिन्न ध्रुवांमधल्या आंतरक्रिया संवेदनेने आणि सहृदयतेने टिपण्यासाठी पुढाकार घेते. ही कादंबरी काय सांगते, ते महत्त्वाचे आहेच, परंतु ती जे काही सांगत नाही, ते जास्त महत्त्वाचे आहे!

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

करोना महामारीने जगाची दोन भिन्न अशा गटांमध्ये वर्गवारी केली. तिचा सामाजिक-राजकीय पोत स्पष्ट करणे, हे या कादंबरीचे गृहीतक आहे. ती आपल्या या ध्येयापासून हटत नाही. बेरोजगारी आणि त्यासोबत येणारी लाचारी, स्वाभिमानास बाधा आणते. मात्र जागोजाग मृत्यू झाले, तरी लोकांचा स्वाभिमानी स्वभाव बदलत नाही. मानवी स्वाभिमानाचे शब्दचित्र किंवा भाषालिपी म्हणून या कादंबरीकडे पाहता येते.

ही कादंबरी पाण्यासाठीचा अखंड संघर्ष पुकारते. सर्वहारा वर्गाच्या अन्नसंस्कृतीचे दर्शन घडवते. आभावातदेखील कणखर होणाऱ्या माणसाच्या जिद्दीची ही कहाणी आहे. काळ थांबत नाही, वेळ थांबत नाही, तशी या कादंबरीतली माणसेदेखील थांबत नाहीत… ती एक एक पाऊल पुढे टाकत राहतात.

दुर्दम्य आशावादाच्या वाटेने जाणारी ही कादंबरी आहे. भौगोलिक तपशिलांशी मानवी संवेदना जोडत गुंफलेली आशयसूत्रे बहुसंवादी होऊन पृष्ठभागावर येतात. इथल्या ब्राह्मणी-अब्राह्मणी ‘डिस्कोर्स’चा पदर विसंवादाकडे न जाता संवादाच्या गाठी मारत पुढे सरकत राहतो. सारेच विस्कळीत झाल्यावर कोलमडून पडणाऱ्या व्यवस्थेला भरभक्कमपणे तोडू पाहणाऱ्या श्रमिकांच्या शक्तिशाली जगाचा ती वाचकांपुढे आरसा धरते.

गर्दी असूनदेखील तिच्यासोबत चालणारा बकालपणा अंगावर येतो. रामस्वरूप नावाच्या प्रातिनिधिक आवाजाला ती बुलंद करते. मुंबईसारख्या महानगरापासून सुरू होत, गाव-खेडेपाडे-वस्त्या ओलांडत रिवा शहर ओलांडून उत्तर प्रदेशापर्यंत जाते. यामुळे या कादंबरीला महानगरी- शहरी- ग्रामीण- दलित अशा कोणत्या संवर्गात बसवता येणे शक्य नाही. भारतीय समूह मनाची कादंबरी म्हणून हिचे मोल कितीतरी पटीने जास्त आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

ही कादंबरी रस्त्यावर उभी राहते आणि कुटुंबसंस्था, जातीसंस्था, विवाहसंस्था, नोकरशाही, इतिहास, भूगोल मापत राहते. कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य यांच्यामध्ये स्वभावत:च असणारा दुजाभाव रेखांकित करते. कायदे मोठे की माणसे, हा मोठा अवघड प्रश्न उभा करते. ५० दिवसांचा दैनंदिन क्रम यात असला तरी ती पन्नास वर्षे मागे जाते आणि आपल्याला यापुढील ५० वर्षं चटके सहन करावे लागतील, हेही अधोरेखित करते.

शेरोशायरी, लालित्य अशी लेखकाची विचारधारा प्रवाहीपणे पात्रांच्या मुखातून नांदते. आशयाने स्वीकारलेल्या शैलीचे ती बोट सोडत नाही. भाषेच्या पातळीवर अनेकदा मिश्किलपणा स्वीकारते. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या उतरंडी एका सरळ रेषेत करून मार्गानुगामी करते. अपरिहार्यता आणि जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती सूचित करते.

भारताच्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक आणि बहुआयामी अशा ‘गंगाजमनी तहेजीब’चे स्वप्न रेखाटण्याचा, कृती करण्याचा ध्यास घेते. काशीच्या घाटावर येऊन मृत झालेल्या मिश्राजींमुळे आपण भूस्वामी आहोत आणि आपल्याला लोकांनी देवाचे प्रेषित मानावे, अशा भ्रमात वावरणाऱ्या समूहाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे किंवा ब्राह्मण असल्याने त्यास नेमकी काशीच्या घाटावरच मुक्ती मिळाली म्हणून, या कादंबरीने स्वीकारलेल्या प्रागतिकतेच्या व्यूहाला धक्कादेखील बसण्याची शक्यता आहे.

या कादंबरीने प्रांतवार केलेली परिक्रमा भौगोलिक नसून सामाजिक सांस्कृतिक आहे. मोठ्या भूभागाला ती आपल्या कवेत घेते. त्यामुळे ही बहुभाषिक समूहाची कादंबरी आहे. अनेक अनोळखी प्रदेशांचे का होईना प्रातिनिधीक चित्र या कादंबरीत येते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..............................................................................................................................................................

लेखकाने जागोजागी केलेली शेरोशायरी जरी आशयाला पुढे ढकलणारी असली, तरी ती अनावश्यक वाटते. कारण वाचकाला तेथे निवेदक मागे हटून लेखक सक्रिय झाल्याचा भास होतो. सामाजिक दायित्वाच्या भावनेने ओतप्रोत कार्यकर्त्याच्या मजबूत बैठकीने केलेल्या कामापुढे अशा थोड्याबहुत त्रुटी आपल्याला डोळ्याआड करता येतात.

ही सामाजिक न्यायाचा आक्रोश शब्दबद्ध करणारी साहित्यकृती आहे. प्रत्यक्ष अनुभव आणि कार्यकर्ता म्हणून निभावलेल्या आजवरच्या वाटचालीतल्या संचितांचे गाठोड घेऊन लेखकाने केलेली ही मेहनत अस्सल वाटते. या अस्सलपणातच या कादंबरीचे यश आहे. राजकीय भूमिकेपासून दूर पळणाऱ्या आणि आत्ममुग्ध अशा पांढरपेशी कादंबरीकारांच्या पंक्तीत आपल्या वेगळेपणाच्या, परिवर्तनाचा आग्रह लावून धरणाऱ्या भूमिकेमुळे ही बाब उठून दिसणारी आहे. हे दायित्व लेखकावर कोणी लादलेले नसून त्यांनी ते आपल्या सामाजिक जीवनजाणीवांचा भाग म्हणून स्वीकारलेले आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनी लालित्यपूर्ण आणि वाङ्मयीन कामगिरी केल्याची गोष्ट दुर्मीळ होत जाण्याच्या काळात ही कादंबरी आली आहे. त्यामुळे तिचे मोल आहे. यापूर्वीदेखील मराठीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखन केले आहे, परंतु त्यांच्या लेखनातला वाङ्मयीन मूल्यांचा अभाव, सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला आहे. चळवळी साहित्याशी जोडायच्या असतात, याचे भान नसल्यामुळे आपण आपला सांस्कृतिक अवकाश गमावून बसलो आहोत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

सांस्कृतिक युद्ध अनेक पातळ्यांवर लढायचे असते. त्यात कादंबरीसारखा लोकशाहीसोबत आलेला प्रकार आपली मदत करू शकतो, तो आपले हत्यार होऊ शकतो. कारण कादंबरी हा अत्यंत खुला असा प्रकार असून, तो अनेक शक्यता मांडत असतो, अनेक जागा खुल्या करतो आणि अनेक पातळींवरच्या चर्चांच्या शक्यता मागे ठेवतो.

कादंबरीचे हे मोठेपण चळवळींनी न ध्यानात घेतल्यामुळे आम्ही सांस्कृतिक युद्धाला सज्जदेखील झालेलो नाही. या सगळ्या बाबी विचारात घेता, मला ही मराठीतली अत्यंत लक्षवेधी अशी कादंबरी वाटते. तिचे आपण मराठी वाचक म्हणून सहृदयतेने स्वागत केले पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये उद्भवलेल्या अराजकसदृश परिस्थितीचा काही एक शोध घेऊन, त्याचे नीटनेटके आकलन करून, त्याचे विश्लेषण करण्याची आणि ज्याची जी चूक असेल, त्याच्या ती पदरात घालण्याची एक भूमिका, ही कादंबरी पार पाडते.

हे असे आराजक डोळ्यासमोर घडत असताना मी गप्प नव्हतो, विरोधासाठी म्हणून माझी तर्जनी उंच होती, हे साहित्यिकाने आपले आद्य कर्तव्य समोर ठेवले पाहिजे. या अपेक्षेला उतरत पवन भगत यांनी या कादंबरीद्वारे सामाजिक न्यायाचे-राजकीय कृतीचे मोठे ‘स्टेटमेंट’ केलेले आहे, असे म्हणता येते.

‘ते पन्नास दिवस’ : पवन भगत

मैत्री पब्लिकेशन, पुणे | पाने : १६८ | मूल्य : ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......