लेखक प्रत्येक कथेत मानवी भावभावनांची हळूवार उकल करतात, म्हणून ती केवळ विज्ञानकथा राहत नाही, तर माणसाची कथा-व्यथा होऊन जाते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रमिला देशमुख
  • ‘मिरॅकल’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 02 June 2023
  • ग्रंथनामा शिफारस मिरॅकल Miracle सुनील विभुते Sunil Vibhute विज्ञानकथा Science fiction

‘मिरॅकल’ हा प्रा. डॉ. सुनील विभुते यांचा विज्ञानकथासंग्रह मानवी मन, भावना व विज्ञानातील शोध यांचा सुरेख संगम वा गोफ आहे. विज्ञानातील शोध व त्याचा मानवी आयुष्यात अंतर्भाव असा आशय या संग्रहात पाहायला मिळतो.

‘सर्जिकल स्ट्राईक’ ही पहिली कथा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे. वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात प्रचंड उलथापालथ झालेल्या दहा जणी सॉफ्टवेअर संगणक तज्ज्ञ  आहेत. त्या सर्वांचे पती आणि मुले दहशतवादी हल्ल्यात मारली गेली आहेत. त्या सर्व जणींनी तंत्रज्ञानाचा वापर करून हिमालयातील दहशतवाद्यांचे अड्डे शोधले आहेत. आपल्या ज्ञानाचा वापर करून कुठलीही जीवित हानी होऊ न देता त्यांचा समूळ बीमोड त्यांनी कसा केला, याची ती कथा आहे.

या कथेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दहा नायिका कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल अशा भारतातील अनेक प्रांतातल्या आहेत. त्यातून भारतातील एकात्मता, भारतीयत्व याचे दर्शन घडते. वैयक्तिक दुःखाचे रूपांतर सामाजिक दुःखात होते. तंत्रज्ञान-विज्ञान सोपे करून मांडल्यामुळे समजण्यास सुकर होते.

दुसरी कथा वनस्पतीशास्त्रावर आधारित आहे. काही वनस्पती किती भयंकर असतात? त्यांचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो? माणसाचे राक्षसात रूपांतर होऊ शकते, तो नरभक्षक होऊ शकतो, या वास्तव ज्ञानावर आधारित आहे. पण हे सत्य सांगताना लेखकाने एक हळूवार प्रेमकथा फुलवली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मायरा व शंतनु यांची प्रेमकथा, त्यांचा विरह, शंतनुचे दुःख व त्यामुळे झालेले त्याचे उद्ध्वस्त जीवन, यातून चुकून त्या वनस्पती रसाचे प्राशन की, ज्यामुळे तो राक्षसी रूप धारण करतो. तो अंतर्बाह्य बदलून जातो. कथेचा शेवट शंतनुच्या मरणाने होतो. ही कथा चटका लावून जाते.

परग्रहावरील मानवी जीवन व त्यांना माणसांविषयी असणारी इर्ष्या, पृथ्वी जिंकण्याची जिद्द, त्यांचे मानवापेक्षा पुढे गेलेले विज्ञान आणि त्यांनी पृथ्वी जिंकण्यासाठी केलेला आटापिटा ‘फॉलसोबो’ या कथेत येतो. माणसाचे मन व मेंदू यांचे परिवर्तन घडवण्याची ताकद विज्ञानात–तंत्रज्ञानात आहे, हे तत्त्व या कथेचा प्राण आहे. ‘कूटनीती’ने प्रतिस्पर्ध्याला चीत करणे, याचे उदाहरण म्हणजे ही कथा. पण प्रतिस्पर्धीही त्यांच्या वरचढ आहे. शास्त्रज्ञ, त्यांची बुद्धिमत्ता, ज्ञान, कौशल्य याचे अतिशय भयकंपित करणारे दर्शन ही कथा घडवते.

‘कार्डिओ’ कथेतून भारतीय परंपरेचे दर्शन घडते. ‘वैष्णवजन तो तेणे कहिए। पीर पराई जाने रे।’ हे तथ्य सत्यकथेत व्यक्त झाले आहे. कथेच्या आत्म्यानुसार लेखकाने महाभारतातील कर्णाच्या दानशूरतेचा आधार घेतला आहे. कर्णाने ज्याप्रमाणे कवचकुंडले गेल्यावर मृत्यू अटळ आहे, हे ठाऊक असूनदेखील ती इंद्ररूपी ब्राह्मणाला देऊन टाकली, त्याप्रमाणे कथेतील निवेदकाचे वडील आपले कृत्रिम हृदय एका गरीब व संसाराचा आधार असणाऱ्या स्त्रीला देऊन टाकतात आणि मरणाचा आनंदाने स्वीकार करतात.

‘फायर फ्लाय अॅक्शन’ ही कथा अत्यंत उत्कंठावर्धक आहे. तंत्रज्ञानातील सूक्ष्म शोध व त्यांच्या द्वारे शत्रूचा बीमोड हा कथेचा विषय आहे. येथेही पहिल्या कथेप्रमाणे कुणाल श्रीवास्तव या तरुण शास्त्रज्ञाचे आई-वडील बॉम्बस्फोटात मारले जातात. या अनुभवाने तो होरपळला जातो. मग तो आपला शोध सुरू करतो आणि अतिरेक्यांचा शोध घेता येईल, असे कृत्रिम काजवे तयार करतो. पुढे अतिरेक्यांचा तळ, त्यांची क्रूर करणी, भारतीयांबद्दलचा द्वेष, त्यांचे डावपेच इ. गोष्टी समजण्यासाठी मूळ कथाच वाचली पाहिजे. वातावरण निर्मितीसाठी केलेले वर्णन इतके तंतोतंत असते की, तो परिसर डोळ्यापुढे उभा राहतो. उदा. बसस्टँडवरील वातावरण, अतिरेक्यांचे तळ, झालेल्या चकमकी इ. सामान्य वाचकाला त्यातील तंत्रज्ञान कळेलच असे नाही, पण कथेचा रसास्वाद घेता येऊ शकतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘मिरॅकल’ ही कथा प्रेमाची ताकद दाखवणारी आहे. दोन प्रेमी जीव एका अपघातात जखमी होतात. त्यातील तरुणी सुमी अपघातात ठार होते. तरुण जबर जखमी होऊन मृत्यूच्या दारात असतो. डॉक्टरांची त्याला वाचवण्यासाठी पराकाष्ठा चाललेली असते. त्या तरुणाला सुमी येऊन धीर देते. सतत त्याच्याभोवती असते, त्याला आपल्या प्रेमाच्या आठवणी देते. जाणीव-नेणीवेच्या पातळीवर तो सतत हेलकावे खात असतो. नेणीवेत सुमी सतत सोबत असते. अर्धवट जाणीवेत आई-वडील, मित्रमंडळी यांचे बोलणे, प्रेम कळत असते. त्या बोलण्यातूनच त्याला सुमी आता जिवंत नाही, हे कळते व तो प्राण सोडतो. एक हळवी प्रेमकथा असून ती मनात रुंजी घालते.

शेवटची कथा ‘गुरूमहाराज’ ही तंत्रज्ञान, विनोद, माणुसकी, मानवीस्वभाव या वैशिष्ट्यांचे अनेक पदर उलगडणारी आहे. तिपण्णा, राचू व चंदव्वा असे तीन यंत्रमानव (रोबो) अनय पाटील तयार करतो आणि आई-वडिलांकडे पाठवून देतो. धनाजी पाटील व गोदाक्का हे दोघेच घरात, शेतीचा व्याप मोठा, एकूलता एक मुलगा अमेरिकेत. धनाजी पाटलांना आता हा व्याप आवरत नव्हता. अनयला हे माहीत असते, म्हणूनच तो हे तीन पाठवतो. शेतीतील सर्व कामे, दरोडेखोरांना चोप देऊन पाठवणे, साप मारणे अशी अचाट कामे हे रोबो करतात. त्यांचा ‘रिमोट कंट्रोल’ अनयच्या हातात असतो. कथेच्या शेवटी या रहस्याचा उलगडा होतो. आपली उत्सुकता शेवटपर्यंत ताणली जाते, हे या कथेचे यश!

थोडक्यात, या संग्रहातील सर्वच कथा मनोवेधक, उत्कंठा वाढवणाऱ्या आहेत. सर्वच कथांमध्ये ‘मानवता’ हा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. लेखकाला उर्दू, हिंदी, कानडी भाषेचा लहेजा चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे कथेतील पात्रे खरीखुरी वाटतात. लेखक प्रत्येक कथेत मानवी भावभावनांची हळूवार उकल करतात, म्हणून ती केवळ विज्ञानकथा राहत नाही, तर माणसाची कथा-व्यथा होऊन जाते.

‘मिरॅकल’ - सुनील विभुते

राजहंस प्रकाशन, पुणे\ पृष्ठे – १२० \ मूल्य - २०० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखिका प्रा. सौ. प्रमिला मा. देशमुख बार्शी (जि. सोलापूर)च्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत.                   

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now                               

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......