‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’ : दुष्ट प्रवृत्तींचा विजय झाला, तर मग माणूस काय किंवा समाज काय, सर्वनाश होणारच…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन साळुंखे
  • ‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 10 February 2023
  • ग्रंथनामा शिफारस द स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड The Strange Case of Dr. Jekyll and Mr Hyde रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन Robert Louis Stevenson

मानवी मनाला गूढ गोष्टींचं कायम आकर्षण वाटत आलेलं आहे. ज्यांचा कार्यकारणभाव, परिणाम निश्चित माहीत नसतो, ते दुरून का होईना, पण निरखणं बहुतेकांना आवडतं. यामागे असलेली औत्सुक्याची भावना, काही वेळा मात्र सुरक्षेची सीमारेषा ओलांडायला माणसाला भाग पाडतं.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, मानसशास्त्र आताइतकं विकसित झालं नव्हतं, तेव्हापासून ते अगदी आजही मानवी मनोव्यापार समजावून घेण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे एखाद्या अंधाऱ्या गुहेच्या गूढ काळोखात डोकावण्यासारखंच आहे. सामाजिक नीतीनियम पाळत, मन मारत जगणारं एक मन असतं. आणि समाजाला धुडकावून स्वतःला हवं तसं जगू पाहणारं एक मन असतं. प्रत्येक व्यक्तिमत्त्वात हे द्वैत असतं. चांगल्या आणि वाईट अशा दोन मनांचा संघर्ष सतत चालू असतो. शक्यतो सामाजिक नियमांच्या चौकटीत चालण्याचा बहुतांश लोकांचा प्रयत्न असतो. पण काही लोक कधीतरी दुसऱ्या मनाच्या आहारी जातात. आणि मग सुरू होते अनपेक्षित, अतर्क्य घटनांची मालिका. सुरुवातीला त्या व्यक्तीला उन्मुक्त जगण्याचा आनंद मिळाला, तरी कालांतरानं हा आनंद ओसरत जातो. आणि त्या व्यक्तीसह तिच्या सहवासात आलेल्या अनेकांच्या वाट्याला येते असीम वेदना.

जगात सर्वांत जास्त अनुवाद ज्यांच्या लेखनाचे झाले आहेत, ‘वर्ल्ड क्लासिक्स’मध्ये ज्यांच्या लिखाणाचा समावेश होतो, अशा निवडक लेखकांपैकी एक, स्कॉटिश लेखक रॉबर्ट लुई स्टीव्हनसन. रोजचं जगणं जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या आत चांगल्या आणि दुष्ट प्रवृत्ती यांच्यात एकमेकांवरील प्रभावासाठी चालत आलेल्या आदिम झगड्याचं अंगावर येणारं चित्रण ‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’ या रूपककथेच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे. तरल, संवेदनशील लेखिका आणि वक्त्या सोनाली नवांगुळ यांनी या पुस्तकाचा त्याच नावानं अक्षरशः खिळवून ठेवणारा अनुवाद केला आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

अकरा प्रकरणांच्या या लघुकादंबरीच्या सुरुवातीला, ज्यांना घेऊन ही गोष्ट पुढे सरकत राहते, त्या अटरसन वकिलांची  ओळख होते. आणि ती कथा जेथे घडते, त्या वातावरणाचीसुद्धा. वातावरणसुद्धा या पुस्तकात प्रतीकात्मक रीतीनं वापरलं आहे. या वेळी ज्या उपमा वापरल्या आहेत, त्या वाचताना जी.ए. कुलकर्णी यांची आठवण येते. अर्थात, जीएंच्या उपमा म्हणजे घनदाट काळोखात बघण्याच्या प्रयत्नानं डोळ्यांच्या खाचा व्हाव्यात आणि चाचपडताना हात खरवडून रक्ताळावेत, आणि मग आपल्याच आतून एक अंधुक कवडसा बाहेर पडून पायाखालचा अणकुचीदार रस्ता क्षणभरासाठी झळाळून उठावा, असं वाटायला लावणाऱ्या असतात.

संपूर्ण काळ्या रंगात रंगवलेला, माणसाच्या मनातल्या वाईट प्रवृत्तींचा प्रतिनिधी, या गोष्टीतला खलनायक, एका रहस्यमय घरातून बाहेर पडणारा मि. हाईड याचा उल्लेख अटरसन आणि त्यांच्याबरोबर रस्त्यावर फेरफटका मारायला आलेले त्यांचे मित्र, या दोघांच्या बोलण्यात येतो. त्याच्याबद्दलच्या एकाच घटनेच्या वर्णनानं हा इतरांप्रमाणे करड्या नाही, संपूर्ण काळ्या, अमानुष मनोवृत्तीचा आहे, हे लक्षात येतं.

दुसऱ्या प्रकरणात ओळख होते चांगल्या प्रवृत्तीचे प्रतिनिधी, समाजात आदराचे स्थान असलेले डॉ. जेकिल या, या गोष्टीच्या नायकाची. हाईडने डॉ. जेकिल यांना ब्लॅकमेल करण्याचा कसा प्रयत्न चालवला आहे, हे वाचताना वाचक हळूच गूढ काळोखात जाऊन उभा राहतो. तिथं त्याच्यासमोर उभं राहत जातं मि. हाईडने डॉ. जेकिल यांना कैचीत पकडल्यानंतर घडत जाणारं करुण नाट्य. त्याच्या शेजारी उभे असतात, हे गूढ सोडवून त्यांचा मित्र डॉ. जेकिल यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे अटरसन वकील.

अटरसन वकील त्यांचे दुसरे समान मित्र डॉ. लान्योन यांना भेटतात. डॉ. जेकिल गेल्या दहा वर्षांपासून चमत्कारिक वागताहेत. विज्ञानाचा आधार नसलेली निरर्थक बडबड करताहेत, अशी डॉ. लान्योन यांची तक्रार आहे. यातून एक धागा तर मिळाला. पण त्याचं दुसरं टोक कुठं जोडायचं, हे अटरसन वकिलांना समजत नाहीये. अखेर त्या घरावर पाळत ठेवून अटरसन या मि. हाईडला गाठतातच. पण यातून डॉ. जेकिल यांच्याबद्दल अटरसन यांना वाटणारी काळजी वाढतच जाते.

अटरसनची अखेर डॉ. जेकिल यांच्याशी भेट होते. ते हाईडपासून दूर राहण्याबाबत जेकिल यांना परोपरीने सांगत राहतात. पण जेकिल यांच्या हट्टापुढे मान तुकवून अखेर, त्यांच्या इच्छापत्रानुसार, जेकिल यांचे काही बरं-वाईट झाल्यास जेकिल यांची सर्व इस्टेट हाईड याला देण्याची जबाबदारी पूर्ण करण्याचं वचन देतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

यानंतर शहरातलं आणखी एक मोठं प्रस्थ या हाईडच्या हल्याला बळी पडते. या वेळी मात्र जेकिल अटरसन यांना सांगतात की, आता याउपर माझा आणि त्या हाईडचा काहीही संबंध नाही. पोलिसांनी हाईडचा भूतकाळ खणून काढला, तेव्हा त्याच्या क्रौर्याच्या, निर्दय हिंसेच्या अनेक भयंकर गोष्टी समोर आल्या. पण हाईड जणू अदृश्य झाला. त्याच्या सैतानी सावलीतून बाहेर आल्यामुळे जेकिलसुद्धा पुन्हा माणसांत रमायला लागतात.

पण दोनेक महिन्यांनी जेकिल यांनी स्वतःला जणू कोंडूनच घेतलं. यानंतर अतिशय वेगवान घटना घडतात. त्या वेगानं भोवंडलेला वाचक अटरसनबरोबर जेकिलच्या घरी जातो. आणि जेकिलच्या खोलीचे दार फोडल्यावर त्याला समोर येतो तो लोळागोळा झालेला देह. हाईडचा. आणि अटरसन यांच्यासाठी दोन पत्रे. जेकिलची. त्यातलं एक आहे, जेकिलने त्यांची सगळी संपत्ती अटरसन यांना दिल्याचं. आणि दुसरं आहे…

ते मुळातच पुस्तकात वाचायला हवं. गूढ उकलतानासुद्धा अखेरच्या काही ओळींपर्यंत ते कायम ठेवण्याचं, आणि तोवर वाचकाला त्या सगळ्या घटनाक्रमात स्वतःबरोबर फरफटत नेण्याचं लेखक आणि अनुवादक या दोघांचंही कसब लक्षात राहण्यासारखेच. यशस्वी कथेचं एक परिमाण म्हणजे, ती वाचल्यावरसुद्धा आणखी बराच काळ मनात रेंगाळत, मध्येच डोकावत राहणे. हा परिणाम तर इथं साधला जातोच, पण लक्षात राहतो तो रूपकांच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला मानवी मनातला सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा, त्या मनावर ताबा मिळवण्यासाठी सतत चाललेला संघर्ष.

माणसाच्या मनात आणि समाजातही त्यावर ताबा मिळवण्यासाठी असाच या दोन प्रवृत्तींमध्ये सतत संघर्ष चालू असतो. अशा वेळी चांगल्याच्या बाजूनं असणारे अटरसनसारखे लोक, प्रवृत्ती बरोबर असणं आवश्यक. तसे ते नसतील, आणि यात दुष्ट प्रवृत्तींचा विजय झाला तर मग माणूस काय, किंवा समाज काय, सर्वनाश होणार, हे ठरलेलंच.

‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’ : रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन

मराठी अनुवाद : सोनाली नवांगुळ | डायमंड पब्लिकेशन्स, पुणे | मूल्य : १२५ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5376/The-Strange-Case-of-Dr.-Jekyll-and-Mr-Hyde

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......