राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का?
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘भारत जोडो पदयात्रे’ची ही सर्व छायाचित्रं त्यांच्या फेसबुक पेजवरून घेतली आहेत
  • Sat , 05 November 2022
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress

शेकडोंची गळाभेट, हजारोंना सोबतीला घेत आणि लाखो लोकांचे लक्ष वेधून घेणारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. १५० दिवस चालणारी ही पदयात्रा १२ राज्यांतून जाणार आहे आणि ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही पदयात्रा बरोबर दोन महिन्यांनी महाराष्ट्रात प्रवेश करेल. दरम्यानच्या काळात गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजवले गेलेलं आहे. गेल्या जवळपास ६० दिवसांत राहुल गांधी सुमारे १३०० कि.मी. पायी चालले आहेत. हे सोपं काम नाही. त्यासाठी विलक्षण जिद्द, संयम, राजकीय तळमळ व अव्यभिचारी निष्ठा, शारीरिक क्षमता  लागते. आणि ते सर्व या निमित्तानं राहुल गांधी यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळेच या पदयात्रेमुळे देशाच्या राजकीय वातावरणात बदलाचे तरंग उठत आहेत… त्या तरंगांच्या लवकरच लाटा होतील. 

नि:संशय राहुल गांधी यांची टाकलेल्या प्रत्येक पावलाबरोबर लोकप्रियता वाढत आहे. समाजमाध्यमांवर या पदयात्रेच्या अनेक कथा प्रकाशित होत आहेत. मुख्य माध्यमं मात्र त्याबद्दल चोरटेपणाने बातम्या देत आहेत. नि:ष्पक्ष म्हणवणारी, कायम काँग्रेसच्या वळचणीला पडलेली, प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्षाचा आवाज उठवण्याचा दावा करणारी, स्वत:ला विवेकी म्हणवणारी, अशा विविध पठडीतली ही मुख्य प्रवाहातील माध्यमं आहेत. यापैकी कुणालाही राहुल गांधी यांच्या पदयात्रेला ठळक बातमीचं स्थान द्यावंसं वाटत नाही. ही कुणाची तरी दहशत आहे म्हणायचं की, ही माध्यमं कुणाच्या तरी दावणीला बांधली गेली आहे म्हणायचं, हे ज्याचं त्यानं आपापल्या आकलनाप्रमाणं ठरवावं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मात्र गेल्या सुमारे दोन महिन्यांत ही यात्रा एक मोठा ‘कारवाँ’ बनलेली आहे, हे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही. बाय द वे, मी काँग्रेसचा सदस्य नाही, समर्थकही नाही. अनेकदा काँग्रेसवर कठोर टीका करणारा एक पत्रकार आहे. सायटिकाच्या त्रासानं त्रस्त नसतो, तर एक पत्रकार म्हणून वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर असूनही या यात्रेत (व्यवस्थापनाचा विरोध झुगारून) सहभागी झालो असतो,  आणि वाचकांपर्यंत तो वृतान्त नक्कीच पोहोचवला असता, कारण या पदयात्रेला एक वृत्तमूल्यही आहे. पण ते असो.

राहुल गांधी यांच्या या पदयात्रेमुळे काँग्रेस पक्षाला संजीवनी प्राप्त झाली, असं म्हणणं फारसं योग्य ठरणार नाही, मात्र निश्चेष्ट पडलेल्या या पक्षात चेतना जागवली गेल्याचं अनुभवायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे ही यात्रा ज्या मार्गावरून आतापर्यंत चालत आली आहे, तिथं तरुणांचा भरभक्कम आणि व्यापक प्रतिसाद मिळत आहे. शेकडो, हजारो स्थानिक तरुण या पदयात्रेत सहभागी होतं असल्याचं दृष्टीस पडत आहे. शिवाय काँग्रेसपासून विविध कारणानं दुरावलेले राजकीय पक्ष आणि अ-राजकीय संस्था-संघटना या पदयात्रेशी जोडल्या गेल्याचं दिसून येतंय.

याचा एक अर्थ दुरावलेल्यांना जवळ करण्याचं कामही राहुल गांधी यांची पदयात्रा करत आहे. या पदयात्रेला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना किती जनाधार असलेल्या आहेत, याच्या तपशिलात जाण्याचा वावदूकपणा करण्याचं काहीच कारण नाही. कारण एक एक काडी जोडूनच शेवटी मोळी तयार होत जाते, हे विसरता येणार नाही.

या पदयात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी सरळमार्गी, मितभाषी आहेत, बेरके नाहीत, अशा समाजमाध्यमांत प्रकाशित होणाऱ्या मजकुराकडे फार गंभीरपणे बघण्याची फारशी गरज नाही. एक राजकारणी म्हणून राहुल गांधी यांना २०१४पर्यंत पुरेसं गांभीर्य नव्हतं. स्पष्टच सांगायचं तर काहीसा बालिशपणाही असल्याचं तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा जाहीररित्या पाणउतारा करून त्यांनी सिद्ध केलं होतं.

तेव्हापासून आतापर्यंत ‘शहजादा’, ‘पप्पू’, ‘मम्माज् बॉय’ अशा शेलक्या शब्दांत राहुल गांधी यांच्यावर टीका झालेली आहे. ही पदयात्रा सुरू झाल्यावर त्यांची प्रतिमा एकेकाळी कशी ड्रगिस्ट व खुशालचेंडू होती, याबद्दल व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठांत पोस्टसचा रतीबच घातला गेला. त्या ट्रोलिंग व सर्व समज-गैरसमज आणि प्रतिमांना मूठमाती देत एक नवा व धोरणी राजकारणी उदयाला आला आहे, असंच राहुल गांधी यांचं अलीकडची काही वर्षं आणि विशेषत: या पदयात्रेतलं वर्तन आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

धोरणी आणि बेरकेपणा, आक्रमकता आणि आतातायीपणा, यांतली सीमारेषा ठाऊक झालेला सुसंस्कृत नेता, असंही त्यांचं हे वर्तन आहे. धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानं ते धार्मिक होत असल्याचीही टीका मधल्या काळात झाली. राजकारण म्हटलं की, मतांसाठीच जात-धर्म येणारच, पण देशात दुही माजवणारी धर्मांधता मात्र त्यांनी मुळीच दाखवलेली नाही, याचीही नोंद आवर्जून करून ठेवायला हवी.

राहुल गांधी यांनी राजकारण लहानपणापासूनच पाहिलंय. पूर्वजांचा स्वातंत्र्य संग्रामातील त्याग, सहभाग आणि नंतर सत्तेचं फार मोठं संचित त्यांच्याकडे आहे. पंतप्रधान असलेल्या आजी आणि वडिलांना देशासाठी हुतात्मा होण्याची किंमत त्यांनी चुकवलेली आहे. अशी पार्श्वभूमी असली तरी राजकारण काय असतं, हे त्यांना ठाऊक नाही, अशी टीका विरोधी पक्षीयांकडून कायमच झाली. सलग दोन लोकसभा आणि काही विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तर राजकारण कसं करायचं, हे राहुल गांधींना खरंच कळलेलं नाही आणि त्यांच्यात नेतृत्व गुण नाहीत, असा ठपका ठेवत स्वपक्षातूनही त्यांना विरोध होऊ लागला. मात्र याच काळात एका वेगळ्या मुशीतला राजकीय नेता घडण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि आहे, हे ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या निमित्तानं समोर आलेलं आहे.

आज केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजप सत्तेत आहे. सत्तेत येण्यासाठी त्या पक्षातील नेतेही राजकीय प्रक्रियेच्या अशाच मुशीत घडले. लोकशाहीत सत्ताधाऱ्यासोबतच विरोधी पक्षातही नेत्यांची ‘अशी’ जडणघडण ही एक अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य प्रक्रिया असते. ती प्रक्रिया राहुल गांधी यशस्वीपणे पार पाडत आहेत, असाही या या यात्रेचा आणखी  एक अर्थ आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

देशात आज बेरोजगारी, रुपयांचं अवमूल्यन, मातीमोल होणारी कृषी व्यवस्था, वाढती बेरोजगारी, अशा अनेक मूलभूत प्रश्नांची चर्चाच होत नाही. हे प्रश्न विचारणारे पत्रकार नाहीत आणि समजा कुणी पत्रकार त्यासाठी सज्ज झाला, तर त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सत्ताधारी उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती आहे.

मंदिर, काश्मीरचा स्वायत्त दर्जा काढणं, देशातून विरोधी पक्ष संपवणं भाषा (की धमकी?) उघडपणे होणं आणि त्या दृष्टीकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्नही होणं, यामुळे आपल्या देशातील लोकशाहीचा प्रवास एक पक्षीयत्व आणि बहुमताकडून धार्मिकतेच्या आधारावर बहुसंख्याकवादाकडे होणं, असे धोके उभे राहिलेले आहेत. हे कुणाही संवेदनशील लोकशाहीवादी माणसाला समजतं. या धोक्याच्या विरोधात फार कमी लोक निर्भयपणे बोलतात. त्यात राहुल गांधी आघाडीवर आहेत. अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि रा. स्व. संघाच्या विरोधात उघडपणे आणि बेडरपणे भूमिका घेणारे ते एकमेव राजकीय नेते आहेत. 

भारताची ‘सेक्युलर’ ही प्रतिमा या पुढेही जपली जाण्यासाठी आणि लोकशाहीचं निधर्मीकरण अबाधित राहण्यासाठी खरं तर अनेकांनी संघटित होत पुढे येण्याची नितांत गरज असल्याचा हा काळ आहे. ते काम राहुल गांधी करत आहेत. ‘भारत जोडो’ पदयात्रेमुळे देशाचं राजकारण करायचं म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पक्षाची आणि त्या पक्षाच्या नेत्याची पाळंमुळं घट्ट असावी लागतात. काँग्रेस पक्षाची मुळं देशात घट्ट रुजलेली आहेत, पण काँग्रेसच्या नेत्यांची आणि त्यातही राहुल गांधी यांची पाळंमुळं तशी घट्ट नाहीत, असं नेहमीच बोललं जातं. शिवाय गांधी घराण्यातील व्यक्ती तर केवळ ‘गांधी’ नावाच्या करिष्म्यावर स्वत:ला आणि पक्षालाही तारून नेते, अशी टीका होतच असते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या पदयात्रेमुळे राहुल गांधी यांची पाळंमुळं या देशाच्या मातीत पक्की रुजली जातील आणि भाजपला समर्थ पर्याय म्हणून काँग्रेस पक्षाला उभं करण्याची कर्तबगारी ते नक्कीच दाखवतील, असे संकेत मिळत आहेत. एक लोकशाहीवादी नागरिक म्हणून सर्वांनी या संकेतांचं स्वागत करायला हवं.

जाता जाता - राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पक्ष हादरला आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे, अशाही चर्चा ऐकायला मिळत आहेत, पण हा एक शुद्ध भाबडेपणा आहे. एका पक्षाच्या एका पदयात्रेनं प्रतिस्पर्धी पक्ष पूर्ण उखडला जात नसतो, याचं भान बाळगलं जायला हवं. भाजपचीही मुळं आता देशभर पसरली आहेत. शिवाय या पक्षाची संघटनात्मक वीण घट्ट आहे. ती मुळं आणि ती वीण सैल करण्यासाठीची ‘भारत जोडो’ यात्रा ही एक सुरुवात आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

काँग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी एकटे राहुल गांधी आणि नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी सक्रिय होऊन भागणार नाही, तर उगाच भ्रमात न राहता काँग्रेसच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना कामाला जुंपून घ्यावं लागणार आहे.    

..................................................................................................................................................................

हेही पाहावाचाअनुभवा -

‘भारत जोडो’ ही काँग्रेसची आणि एका अर्थाने राहुल गांधींची पदयात्रा आहे आणि या यात्रेचा उद्देश देशाला जोडणं आणि सर्वांनी एकत्र येऊन देश बळकट करणं हा आहे, पण... - विवेक कोरडे

काँग्रेसची सर्वस्तरीय वेगवान घसरण सुरू आहे, ती थांबता थांबत नाही. ‘बुडत्याचा पाय खोलात’ याप्रमाणेच ती स्थिती आहे - विनोद शिरसाठ

काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य ठरवणारी पदयात्रा... - प्रवीण बर्दापूरकर

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्राद्वारे जनतेची मनं आपल्या बाजूनं जरी वळवली, तरी त्याचा उपयोग तो काय? - कॉ. भीमराव बनसोड

राहुल गांधी काही महात्मा गांधी नव्हे, परंतु तो महात्म्याच्या पदचिन्हांचा शोध घेत निघाला आहे, हे नक्की! - श्याम पाखरे

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत... - शंकर सोलापूरकर

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......