‘पिढीजात’ आत्मचरित्रात्मक कादंबरी वाटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही!
ग्रंथनामा - झलक
श्रीकांत देशमुख
  • ‘पिढीजात’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Wed , 25 May 2022
  • ग्रंथनामा झलक पिढीजात Pidheejat श्रीकांत देशमुख पिढीजात Shrikant Deshmukh साखर कारखाना Sugar Factory शेती Farm शेतकरी Farmer

प्रसिद्ध कवी व लेखक श्रीकांत देशमुख यांची ‘पिढीजात’ ही सहाशेहून अधिक पानांची कादंबरी अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला देशमुख यांनी लिहिलेलं हे प्रास्ताविक...

..................................................................................................................................................................

एखादा कवी, लेखक लिहितो, व्यक्त होतो - म्हणजे नेमकं काय होतं? कलावंताची अभिव्यक्ती ही त्याला अंतर्बाह्य उसवून काढणारी असते. आपला भूतकाळ आणि वर्तमान कवेत घेऊन सभोवतालाबद्दल व्यक्त होणं, मला स्वत:ला आवडतं. विशिष्ट पातळीवरील मनाची तरलता नेमकी किती प्रमाणात अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरते, हा तसा मलाही पडणारा प्रश्न आहे.

‘पिढीजात’ ही माझी पहिलीच कादंबरी. याआधी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वेगळ्या कादंबरीचा एक खर्डा लिहून ठेवलेला, तो अनेक वर्षांपासून तसाच पडलेला आहे. ‘पिढीजात’ ही त्यानंतर गेल्या काही वर्षांत लिहायला हाती घेतली. कवी म्हणून माझं असणं या कादंबरीचा प्रदीर्घ पट हाताळताना बहुतांशी माझ्यासाठी उपकारकच ठरलं असावं. गद्यलेखनातही कवितेची संप्रक्तता, तरलता, टोकदारपणा टिकणं तसं कठीणच असतं. तशी अपेक्षाही नसते. भोवतालचं गद्यप्राय जगणं आपल्याही जगण्याचा नकळतपणे भाग बनून जातं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लेखनाच्या पातळीवर स्वत:ला कितीही घुसळून काढलं, तरी त्याचं अभेद्यपण वेगळं नाही करता येत. लेखक, कलावंत म्हणून आपण बरंच काही पाहत असतो. बहुतेकदा कलावंत हा त्याचे विषय निवडत नाही, तर सभोवताल ते विषय निवडण्यास त्याला भाग पाडत असतो. मनाच्या तळाशी जपलेली काही एक मूल्यव्यवस्था असते. तिला धक्का देणारे अनेक घटक आपल्याभोवती असतात. त्याचबरोबर कलावंताचं जगण्याच्या पातळीवरचं व्यावहारिकपण हाही एक महत्त्वाचा घटक असतोच.

माणूस म्हणून जगत असताना या दोन घटकांतील संघर्षाची अटळता नाकारता येत नाही. हीच अवस्था सामाजिक पातळीवरही पाहावयास मिळते. आपला समाज हा अनेकार्थांनी दुविधेत सापडलेला समाज आहे. आजच्या भोवतालाकडे नजर टाकली, तर भय आणि अनिश्चिततेची सावली सगळीकडे दृश्य-अदृश्यपणे फिरताना आपल्याला दिसेल. कलावंताची आणि कलेची स्वायत्तता या पार्श्वभूमीवर निश्चितपणे विशेष महत्त्वाची ठरावी, असा हा कालखंड आहे.

नवनाथ शेळके हा या कादंबरीचा नायक. तो बोलतो, चालतो, कामं करतो आणि बहुतेकदा ऐकतो, पाहतो. त्याच्या जगण्याचा, विचारांचा असा एक परिप्रेक्ष्य आहे, जो त्याच्या मनातल्या भूमीशी जोडला गेला आहे. खेड्यातून अभावात शिक्षण घेऊन तो एका व्यवस्थेचा अपरिहार्य घटक बनला आहे. खरे तर त्याच्यासाठी ती अनिवार्य आपत्तीसारखी व्यवस्था आहे. त्या अर्थाने नवनाथ हा एकटा नाही, तो अनेकार्थांनी प्रातिनिधिक असा ठरावा. त्याचं प्रातिनिधिक असणं हाच त्याच्या संवेदनेचा सर्वोच्च बिंदू मानावा लागेल.

असंख्य पात्रं नवनाथभोवती फिरत आहेत. कितीतरी प्रसंग अंगावर येणारे, सोलून काढणारे, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारे. त्यातही त्याचं टिकून असणं हे त्याचं मूलत: शेतकरी असण्यातून घडणारं. आपण या व्यवस्थेत ना-लायक आहोत, असंही त्याला खुपदा वाटून जातं. तरीही आलेल्या परिस्थितीला, संकटांना धीटपणाने सामोरं जाणं हा त्याचा स्वभाव आहे.

‘पिढीजात’ ही या अर्थाने कोणाला आत्मचरित्रात्मक कादंबरी वाटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. व्यापक अर्थानं कोणत्याही कलाकृतीबद्दल असं विधान करता येईल. नवनाथभोवती फिरणाऱ्या पात्रांबद्दलही कोणाला असंच वाटू शकेल. कथा-कादंबऱ्यांतील पात्रांत वास्तवातील पात्रं अकारण शोधण्याची अनेकांची सवय तशी नवी नाही. तसा ताण उगाचच कोणी घेऊ नये, अशी इच्छा. शेवटी पात्रांचं बोट धरूनच लेखक व्यक्त होत असतो. ते होताना वास्तवाचा एक पदर हातात असला, तरी कादंबरीच्या पात्रात कोणाचा चरित्रशोध घेणं गैर ठरावं. समकालाचा शोध त्यात कोणी घेतल्यास अधिकच योग्य.

महात्मा जोतीराव फुले यांचा असा कयास होता की, शूद्र सत्तेवर आले, तर शूद्रांची दु:ख दूर होतील. लोकशाहीकरणाचा एक भाग म्हणून प्रशासकीय, राजकीय सत्तेवर शूद्र येऊनही यात कितपत फरक पडला आहे, याचा शोध घेणं अपरिहार्य ठरावं. वाढत्या शेतकरी आत्महत्या, स्त्री-दलित अत्याचार या साऱ्या बाबी आपल्या भोवताली आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग म्हणून फिरताना दिसतात. शेती आणि शेतीव्यवस्था, त्याला जोडून असणारी प्रशासकीय व्यवस्था, सहकार चळवळ यातली घुसमटही नवनाथला त्रासदायक ठरणारी आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘पिढीजात’चे माझे लेखन सलग चार ते पाच वर्षे चालले. एकदा लिहून झाल्यानंतर पुन्हा परकं होऊन आपलीच कलाकृती वाचणं हेही तसं तापदायक काम. माझ्या काही आत्यंतिक जवळच्या मित्रांनीही कादंबरी वाचून अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या. लेखक म्हणून मी राजहंस परिवाराचा भाग होणं, ही माझ्यासाठी आनंददायी बाब. कादंबरीचे काही खर्डे गेल्या दोनेक वर्षांत काही दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेले. मुखपृष्ठ साकारणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रं हा नेहमीच माझ्या आस्थेचा आणि प्रेमाचा विषय राहत आलेला आहे. सर्वांचे मन:पूर्वक आभार.

‘पिढीजात’ – श्रीकांत देशमुख

राजहंस प्रकाशन, पुणे

पाने – ६१२

मूल्य – ६०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......