‘धूप आने दो’ : हे पुस्तक एक प्रकारे गुलज़ारांचे आत्मचरित्रच आहे. त्यांच्या अनुभूतीचा समृद्ध अवकाश हे पुस्तक उलगडून दाखवते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘धूप आने दो’चे मुखपृष्ठ
  • Sat , 16 April 2022
  • ग्रंथनामा शिफारस धूप आने दो Dhoop Aane Do गुलज़ार Gulzar ऋतुरंग Ruturang अरुण शेवते Arun Shevte करोना Corona

संगीत, नृत्य, साहित्य, शिल्प या कलांना ‘ललितकला’ म्हटले जाते. ललित कलाकृतीला ‘अमर कलाकृती’ असेही म्हणतात. ही कलाकृती व्यक्ती, स्थळ, काळ निरपेक्ष असते. कितीही काळ लोटला तरी ती जुनी होत नाही. शिवाय ती कलाकृती निर्माण करणारा (जात, धर्म, लिंग) कोण आहे?, तो कुठे राहतो? याचा आणि त्याने निर्माण केलेली कलाकृतीचा काही संबंध नसतो. त्यामुळेच इंग्रजाविषयी आपल्या मनात कितीही चिड असली तरी तरी वर्डस्वर्थ, शेक्सपिअर हे आपल्या गळ्यातील ताईत असतात. पाकिस्तानचा आपण कितीही तिरस्कार करत असलो तरी महंमद इक्बाल यांनी लिहिलेले ‘सारे जहाँ से अच्छा...’ हे गीत आपण नेहमी गुणगुणत असतो.

हे सर्व आपणच करतो असे नाही, तर जगातील सर्वच रसिक अशा कलाकृतींना आणि तिचा कर्ता असलेल्या कलावंताला डोक्यावर घेतात. भारतातही अशा कलावंतांची मांदियाळी खूप मोठी आहे. समकाळातील आणि जगभरात लोकप्रिय झालेला एक गीतकार, कवी, कथाकार, पटकथाकार, चित्रकार म्हणजे कवी गुलज़ार.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

वयाच्या ८६व्या वर्षातही ते सातत्याने लेखन करतात. ‘Work is my first love’ हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य आहे. नातेसंबध जपणं हा त्यांचा स्थायीभाव आहे. ग्रेस, नामदेव ढसाळ, कुसुमाग्रज, कुलबर्गी, संजीवकुमार, ओम पुरी, सत्यजित राय, पंडित रविशंकर, भीमसेन जोशी, यांच्याशी असलेला त्यांचा ऋणानुबंध सर्वपरिचित आहे. यातील अजून एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकांचे संपादक व प्रकाशक अरुण शेवते.

‘ऋतुरंग’च्या पहिल्या (१९९३) दिवाळी अंकांपासून ते कालच्या अंकांपर्यंत (२०२१) गुलज़ार यांनी त्यात सातत्याने लेखन केले आहे. करोना महामारीच्या काळातल्या अनुभवावर त्यांनी लिहिलेला ‘धूप आने दो’ हा ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकातील लेख खूप लोकप्रिय झाला होता. आता ‘ऋतुरंग’साठी गुलज़ारांनी लिहिलेल्या सर्व लेखनाचा (कविता, कथा, ललितलेख) साहित्यरसिकांना एकत्रित आस्वाद घेता यावा, यासाठी संपादक अरुण शेवते यांनी ‘धूप आने दो’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. हे पुस्तक एक प्रकारे गुलज़ारांचे आत्मचरित्रच आहे. त्यांच्या अनुभूतीचा समृद्ध अवकाश हे पुस्तक उलगडून दाखवते.

प्रस्तुत पुस्तकात गुलज़ारांच्या बालपणातील आठवणी, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झालेली जातीय दंगल, मोटार गॅरेजमध्ये काम करताना आलेले अनुभव, चित्रपटाच्या निर्मितीत झालेल्या गमतीजमती, लॉकडॉउन काळात आलेले भीषण अनुभव, मुलींविषयी (बोस्की), नातवाविषयी (समय), पत्नीविषयी (राखी) भावनिक साद-प्रतिसाद, झाडाविषयी असलेले प्रेम, कुत्रा पाळताना आलेला अनुभव, स्वप्नात रमताना सुचलेले गीत, वडिलांच्या (अब्बू) आठवणी, मुलगी प्रसुती होताना घेतलेला वेदनेचा अनुभव... अशा विविधांगी अनुभवांचा आलेख वाचायला मिळतो.

त्याविषयी शेवते आपल्या मनोगतात म्हणतात- “ ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकातल्या अनेक लेखांमधून तुम्ही तुमच्या अनुभवाचे पदर उलगडले आहेत. ते पदर उलगडताना तुम्हाला अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळे माझाच मला हेवा वाटतो.” पुस्तक वाचताना ते खरे वाटायला लागते.

चांगले चित्रपट बनवणे ही गुलज़ारांची पहिल्यापासून महत्त्वाकांक्षा होती. त्याविषयी त्यांचे मत फार बोलके आहे. ते म्हणतात- “आयुष्याची आपल्याला आलेली समज अभिव्यक्त करणं मी महत्त्वाचं मानतो. भाषा जिथे मौन धारण करते, तिथेच कलेचा जन्म होतो. संगीत, फोटोग्राफी, अभिनय इत्यादी ज्या कला आहेत, त्या मौन धारण करूनच दुसऱ्यापर्यंत पोहचण्याची माध्यम आहेत.” (पृ.४५)

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आयुष्यात आलेले अनुभव आणि समज यातूनच त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार आणि गुणात्मक गाणी दिली. त्यांचे गाणे पटकथेत ओढूनताणून आणलेले दिसत नाही. ‘इजाजत’ या चित्रपटातले -

‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा हैं..

सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं,

और मेरे एक खत में लिपडी रात पडी हैं,

वो रात बुझा दो,मेरा कुछ...’

हे गाणे त्या पटकथेत अविभाज्य भाग बनतेच. शिवाय प्रेक्षकांच्या मनात घर करून बसते.

चित्रपट, गाणी, झाड, कुत्रा, मुलगी, नातू, याविषयी त्यांचे अनुभव जसे मूळातून वाचण्यासारखे आहेत, तसे ‘स्वप्नाविषयी’ असलेले त्यांचे मतही फार बोलके आहेत. त्यांच्या मते ‘स्वप्नातील कहाणी खोटी असेल; स्वप्नात घडलेल्या घटना भले खोट्या असतील, पण स्वप्न खोटं नसतं.’ ‘स्वप्नाविषयी’ त्यांची कविता आपल्या मनात घर करून जाते-

‘खिडकियां बंद हैं, दरवाजे पे भी ताले लगे हैं.

कैसे यह ख्वाब चले आते हैं फिर कमरे के अंदर?

नींद में कोई तो राजन हैं खुला रहता हैं!’

स्वप्न नेहमीच सुखकारक असे असेही नाही, ते कधीकधी खूप भीतीदायक असते. गुलज़ार आठ-दहा वर्षांचे असताना, त्या कोवळ्या वयात त्यांनी फाळणी अनुभवली, जो नरसंहार पाहिला ते कित्येक वर्षे त्यांचा पाठपुरावा करत होता.

गुलज़ार जसे पटकथालेखक आहेत, तसेच ते संवेदनशील मनाचे कवी आहेत. त्यांचे मूळ जन्मगाव दीना (पाकिस्तान)तल्या बालपणीच्या आठवणी, त्या प्रतिमा त्यांनी आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवल्या आहेत. त्या गावातून अनेकदा निमंत्रण येऊनही ते तेथे गेले नाहीत. कारण आज बदलेले त्यांचे गाव पाहून पूर्वीच्या त्यांच्या मनात तयार झालेल्या प्रतिमा त्यांना बदलायच्या नाहीत. हे फक्त कवीच करू शकतो.

याचा अर्थ ते कुठे प्रवास करत नाहीत असे नाही. उलट प्रवास करणे हा त्यांचा आवडीचा प्रांत आहे. त्याला ते जगण्याची सवय समजतात. त्यातूनच ‘परिचय’ चित्रपटातील गाणे खूप लोकप्रिय झाले-

‘मुसाफिर हूँ यारो

न घर है ना ठिकाणा

बस चलते जाना...’(पृ.१२८)

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

करोना महामारीच्या काळात संपूर्ण जग बंदिस्त झाले होते. या काळातील त्यांचे अनुभव वाचताना संवेदनशील रसिकांना अंगावर काटा उभा राहतो. करोना जावा म्हणून दिवे लावण्यापासून ते थाली वाजवण्यापर्यंत त्यांनी पाहिलेले क्षण, मजुरांची झालेली केविलवाणी अवस्था, डॉक्टर, पोलीस यांनी जीव धोक्यात घालून केलेली कामे... या सर्व बाबी त्यांनी आपल्या लेखनातून उजागर केल्या आहेत. या काळात त्यांनी केलेले लेखनही नवोदित लेखकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. प्रस्तुत पुस्तकांत करोनावर आधारित तीन-चार कविता प्रसिद्ध आहेत.

‘शाम तक ये दिन

बासी होने लगता हैं

थोडा सा बचा हुआ,

शराब में उंडेल कर,

घूंट घूंट पीता रहता हूं!’ (पृ.२३२)

थोडक्यात, गुलज़ारांनी करोना महामारीच्या काळात दिलेली ‘धूप आने दो’ची आर्त हाक आपल्याला अस्वस्थ करून जाते.

‘धूप आने दो’ - गुलज़ार

ऋतुरंग प्रकाशन, मुंबई

मूल्य - ३५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......