‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ : निखळ महानुभावीय परंपरेतलं २०० वर्षांपूर्वीचं भागवत
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
इंद्रजित भालेराव
  • ‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 19 March 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो श्रीकृष्णलीलामृतसिंधू Shreekrushnaleelamrutsindhu दामोदर धाराशिवकर Damoddar Dharashivkar महानुभवा Mahanubhav

परवा बा.भो. शास्त्री घरी आले होते, तेव्हा त्यांनी ‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ ही अनमोल ग्रंथभेट माझ्या हातावर ठेवली. दामोदर धाराशिवकर या महानुभाव कवीने लिहिलेला हा महानुभावीय भागवताचा ओवीबद्ध ग्रंथ आहे. तो ७६ अध्यायाचा असून त्याची ओवी संख्या २०,३५५ आहे.

गेली अनेक वर्ष बा.भो. शास्त्री यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनाचा ध्यास घेतला होता. एवढा मोठा ग्रंथ संपादित कोण करणार? प्रकाशित कोण करणार? हे प्रश्न होतेच. पण बा.भो. शास्त्री अत्यंत चिकाटीचे  आहेत. त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली आणि हा ग्रंथराज आता उपलब्ध करून दिला आहे.

बा.भो. शास्त्री दरवर्षी चिंतनीचं अधिवेशन घेतात. त्याला आता २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं या वर्षी हे अधिवेशन पांचाळेश्वरला रौप्यमहोत्सवी म्हणून होणार होतं. सगळा खर्च अहमदनगरच्या नागेबाबा सोसायटीचे कडुभाऊ काळे उचलणार होते. पण करोनामुळे ते अधिवेशन रद्द करावं लागलं. बा.भो. शास्त्री यांनी त्यांच्या दातृत्वाचा ओघ ग्रंथप्रकाशनाकडे वळवला आणि हा प्रश्न सोडवला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

काळे यांनी रॉयल डेमी आकारातला, शुभ्र मॅपलिथो कागदावरचा ८०० पानांचा, पुठ्ठा बांधणीचा हा ग्रंथ केवळ ३०० रुपयांत उपलब्ध करून दिलेला आहे. बाजार भावाने या ग्रंथाचं मूल्य कमीत कमी २००० असायला हवं. महानुभाव पंथ आणि मराठी वाङ्मयविश्व कडूभाऊंचं कायम ऋणी राहील.

या ग्रंथाचे कर्ते महाकवी दामोदर धाराशिवकर हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पारद या गावचे. त्यांचा जन्म १७६४ साली एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना वयाच्या नवव्या वर्षी महानुभाव साधू ओंकार मुनी यांना अर्पण करण्यात आलं. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. आणि ‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ हा ग्रंथ वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी लिहून पूर्ण केला.

त्यांचे गुरू ओंकार मुनी हेदेखील कवी होते आणि त्यांनी ‘लिलानिधी’ नावाचा १०० अध्यायांचा ग्रंथ लिहिलेला होता. तो अजून अप्रकाशित आहे. दामोदर धाराशिवकर यांनी आपल्या गुरूकडूनच काव्याची प्रेरणा घेतलेली असावी. त्यांनी पुसद तालुक्यातल्या शिरपूर या गावी हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे १८१४ साली, बुधवारी, श्रावण वद्य अष्टमीला, तिसऱ्या प्रहरी लिहून पूर्ण केला.

या ग्रंथाला आता २०८ वर्षं झाली. तेव्हा देशावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झालेली नव्हती. आणि आपल्याकडं तर निजामाचं राज्य होतं. या काळातला असा हा महाग्रंथ सध्यातरी मराठीत एकमेव असावा. कारण हा प्रामुख्यानं शाहिरी वाङ्मयाचा कालखंड होता. अशा काळात निजाम राजवटीतल्या एका महानुभाव साधूने या महाकाव्याची निर्मिती करावी, ही गोष्ट विशेष आहे. त्यामुळे या ग्रंथाचा अनेक अंगांनी अभ्यास व्हायला हवा.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................ 

तो काळ बोरू आणि शाई हाताने करावी लागायची असा होता. कागदही दुर्मीळच असायचा. शिवाय या ग्रंथाचे कवी दामोदर धाराशिवकर दीक्षित महानुभाव असल्याने सतत फिरतीवर राहून भिक्षेवर जगणारे. त्या काळात ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत, भिक्षा मागत, रानावनात झाडाखाली बसून लिहिलेला हा ग्रंथ. ती भाग्यवंत झाडंदेखील आता कदाचित नसतील आणि असली तरी कुणाला माहीत नसतील!

मुरलीधर शास्त्री आराध्य यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीला ‘श्रीमद्‍भागवताचे पंथीय महत्त्व’ नावाचे एक अभ्यासपूर्ण टिपण लिहिले आहे. त्यात संपूर्ण इतिहासाचा धांडोळा घेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्यापासून पुढे पाच शतकं कुणीकुणी भागवत आधारित काव्याच्या रचना केल्या आहे, ते साधार सांगितलं आहे. आणि निष्कर्ष काढला आहे की, महानुभावांच्या साहित्यनिर्मितीमध्ये श्रीमद्भागवत पुराणांतर्गत दशम स्कंध आणि एकादश स्कंध यांचा सिंहाचा वाटा आहे.

या ग्रंथाचे प्रास्ताविक दि.कों. माळवे यांनी लिहिले आहे. माळवे हे महानुभाव साहित्याचे संशोधक आणि हस्तलिखितांचे संकलक आहेत. प्रस्तुत भागवत हे त्यांच्याच संकलित संग्रहालयातून मिळालेले आहे. त्यांना ते हस्तलिखित खानदेशातील शिरपूर तालुक्यातील जतोडे या गावचे श्री.रामचंद्र लोंढाजी ब्राह्मण पाटील यांच्याकडून मिळालेले होते. श्री.माळवे यांनी ते बा.भो. शास्त्री यांना दाखवले. शास्त्रींनी ते प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि संपादकीय संस्कारासाठी अहमदनगरचे प्राचार्य श्री खासेराव शितोळे यांच्याकडे दिले.

खासेराव शितोळे यांनी अखंड आणि अथक मेहनत घेऊन त्याची मुद्रण प्रत तयार केली. एक सविस्तर प्रस्तावना लिहून कविचा परिचय आणि या काव्याचे वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवले. खासेराव शितोळे यांचे हे पंथावर आणि मराठी वाङ्मयविश्वावर हे मोठेच उपकार आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महानुभाव लोक श्रीकृष्णाचे भक्त. परंतु महानुभाव कवींनी लिहिलेले श्रीकृष्णाचे चरित्रग्रंथ इतके दिवस उपलब्ध नव्हते. त्यामुळे श्रीधर कवीचे ‘हरिविजय’ आणि ‘पांडवप्रताप’ हेच ग्रंथ महानुभाव मठातून श्रावण महिन्यात वाचले जात असत. पण अलीकडच्या काळात महानुभावीयांनीही भागवत लावायला सुरुवात केली.

आता या ग्रंथाच्या रूपाने त्यांना महानुभावीय भागवत उपलब्ध झालेलं आहे. कारण चक्रधर निरुपित श्रीकृष्णचरित्राचा आधार हाच या ग्रंथाचा मूळ पाया आहे. त्यामुळे निखळ महानुभावीय परंपरेतलं भागवत ज्याला म्हणता येईल, असा हा ग्रंथ आता महानुभावीयांना खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि इतरांना २०० वर्षांपूर्वीच्या भाषेचा नमुना म्हणून अभ्यासता येणार आहे.

.................................................................................................................................................................

लेखक इंद्रजित भालेराव प्रसिद्ध कवी आहेत.

ibhalerao@yahoo.com
.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......